शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 22:32 IST

पाटोदा : दुष्काळी परिस्थितीचा फटका येवला तालुक्यातील डाळिंब व द्राक्ष बागांना बसला आहे.पाण्याअभावी या बागा अखेरच्या घटका मोजत आहे. विकतचे पाणी आणूनही त्यांची पूर्तता होत नसल्याने या भागातील शेतकर्यांनी शेकडो एकर द्राक्ष व डाळिंब बागा नष्ट केल्या आहे.उर्विरत बागा जगविण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरु आहे. काही शेतकऱ्यांनी थोड्याशा पाण्यावर फळ धरले आहे मात्र कमी पाण्यामुळे फळ पोसण्यास अडचणी निर्माण झाल्या आहे.अनेक शेतकरी झाडांच्या बुडांना पालापाचोळा व उसाचे पाचटाचे आच्छादन करून व उपलब्ध होईल तेथून मोठा खर्च करून पाणी आणून बागा वाचिवण्याचे केविलवाणे प्रयत्न करतांना दिसत आहे.

ठळक मुद्देपाटोदा : पाणी टँकरचे वाढले ; झाडाखाली पाचटाचे आच्छादन

पाटोदा : दुष्काळी परिस्थितीचा फटका येवला तालुक्यातील डाळिंब व द्राक्ष बागांना बसला आहे.पाण्याअभावी या बागा अखेरच्या घटका मोजत आहे. विकतचे पाणी आणूनही त्यांची पूर्तता होत नसल्याने या भागातील शेतकर्यांनी शेकडो एकर द्राक्ष व डाळिंब बागा नष्ट केल्या आहे.उर्विरत बागा जगविण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरु आहे. काही शेतकऱ्यांनी थोड्याशा पाण्यावर फळ धरले आहे मात्र कमी पाण्यामुळे फळ पोसण्यास अडचणी निर्माण झाल्या आहे.अनेक शेतकरी झाडांच्या बुडांना पालापाचोळा व उसाचे पाचटाचे आच्छादन करून व उपलब्ध होईल तेथून मोठा खर्च करून पाणी आणून बागा वाचिवण्याचे केविलवाणे प्रयत्न करतांना दिसत आहे.येवल्याच्या पश्चिम पट्यात पाटोदा,ठाणगाव,धुळगाव,पिंपरी,कानडी,विखरणी,कातरणी,आडगावरेपाळ,मुरमी ,निलखेडे,सोमठाणदेश, दहेगाव पाटोदा,शिरसगाव,वळदगाव, पिंपळगाव,व परिसरातील गावांमध्ये हजारो एकर द्राक्ष व डाळिंब बागा आहेत.आधुनिक शेतीची कास धरत येथील शेतकर्यांनी बागांचे मोठया प्रमाणात संगोपन करीत व निर्यातक्षम द्राक्ष व डाळिंब उत्पादन करून आपल्या मालाची परदेशात छाप पाडली आहे.असे असतांना दरवर्षी कमी कमी होत चाललेल्या पर्जन्यमानामुळे या बागांना पाणी टंचाईचा धोका निर्माण झाला आहे.आशाही परिस्थितीत शेतकरी कमी पाण्यावर बागा जागवीत आहे.यावर्षी तर दुष्काळाने उग्र रूप धारण केले असून पिण्याच्या पाण्याची इथे कमतरता असतांना बागा कशा जगवाव्यात हा प्रश्न निर्माण झाला आहे.या भागातील शेतकरी आजमतिीस उपलब्ध होईल तेथून टँकरने एका खेपेस पाच ते सहा हजार रु पये खर्च करून पाणी आणून ते ड्रीप द्वारे बागांना देत आहेत.तसेच उसाचे पाचट हे पाच रु पये किलो प्रमाणे विकत आणून झाडांच्या बुडांना आच्छादन करीत आहे त्यामुळे झाड गारवा निर्माण होण्यास मदत होत आहे. सध्या या भागात उन्हाचे प्रमाण वाढले असून सूर्य मोठया प्रमाणात आग ओकू लागल्याने बागा अखेरच्या घटका मोजीत असून शेतकर्यांची मजुरांकरवी झाडे जगविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. या पुढे पाणी उपलब्ध झाले नाही तर हा खर्च करूनही बागा वाचतील का या चिंतेने शेतकर्यांना ग्रासले आहे.तीन एकर डाळिंब बाग असून या भागात उन्हाचे प्रमाण वाढले आहे.मुबलक पाणी नसल्याने बागा सुकून चालल्या आहेत .झाडांच्या बुडांना गारवा राहावा म्हणून उसाचे पाचट विकत आणून झाडांच्या बुडांना आच्छादन केले आहे त्यामुळे गारवा टिकून राहात आहे.रामदास दौंडे,संतोष दौंडे डाळिंब उत्पादक शेतकरी दहेगाव पाटोदा(फोटो १४ पाटोदा फोटो,१४ पाटोदा फोटो १)