शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 22:32 IST

पाटोदा : दुष्काळी परिस्थितीचा फटका येवला तालुक्यातील डाळिंब व द्राक्ष बागांना बसला आहे.पाण्याअभावी या बागा अखेरच्या घटका मोजत आहे. विकतचे पाणी आणूनही त्यांची पूर्तता होत नसल्याने या भागातील शेतकर्यांनी शेकडो एकर द्राक्ष व डाळिंब बागा नष्ट केल्या आहे.उर्विरत बागा जगविण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरु आहे. काही शेतकऱ्यांनी थोड्याशा पाण्यावर फळ धरले आहे मात्र कमी पाण्यामुळे फळ पोसण्यास अडचणी निर्माण झाल्या आहे.अनेक शेतकरी झाडांच्या बुडांना पालापाचोळा व उसाचे पाचटाचे आच्छादन करून व उपलब्ध होईल तेथून मोठा खर्च करून पाणी आणून बागा वाचिवण्याचे केविलवाणे प्रयत्न करतांना दिसत आहे.

ठळक मुद्देपाटोदा : पाणी टँकरचे वाढले ; झाडाखाली पाचटाचे आच्छादन

पाटोदा : दुष्काळी परिस्थितीचा फटका येवला तालुक्यातील डाळिंब व द्राक्ष बागांना बसला आहे.पाण्याअभावी या बागा अखेरच्या घटका मोजत आहे. विकतचे पाणी आणूनही त्यांची पूर्तता होत नसल्याने या भागातील शेतकर्यांनी शेकडो एकर द्राक्ष व डाळिंब बागा नष्ट केल्या आहे.उर्विरत बागा जगविण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरु आहे. काही शेतकऱ्यांनी थोड्याशा पाण्यावर फळ धरले आहे मात्र कमी पाण्यामुळे फळ पोसण्यास अडचणी निर्माण झाल्या आहे.अनेक शेतकरी झाडांच्या बुडांना पालापाचोळा व उसाचे पाचटाचे आच्छादन करून व उपलब्ध होईल तेथून मोठा खर्च करून पाणी आणून बागा वाचिवण्याचे केविलवाणे प्रयत्न करतांना दिसत आहे.येवल्याच्या पश्चिम पट्यात पाटोदा,ठाणगाव,धुळगाव,पिंपरी,कानडी,विखरणी,कातरणी,आडगावरेपाळ,मुरमी ,निलखेडे,सोमठाणदेश, दहेगाव पाटोदा,शिरसगाव,वळदगाव, पिंपळगाव,व परिसरातील गावांमध्ये हजारो एकर द्राक्ष व डाळिंब बागा आहेत.आधुनिक शेतीची कास धरत येथील शेतकर्यांनी बागांचे मोठया प्रमाणात संगोपन करीत व निर्यातक्षम द्राक्ष व डाळिंब उत्पादन करून आपल्या मालाची परदेशात छाप पाडली आहे.असे असतांना दरवर्षी कमी कमी होत चाललेल्या पर्जन्यमानामुळे या बागांना पाणी टंचाईचा धोका निर्माण झाला आहे.आशाही परिस्थितीत शेतकरी कमी पाण्यावर बागा जागवीत आहे.यावर्षी तर दुष्काळाने उग्र रूप धारण केले असून पिण्याच्या पाण्याची इथे कमतरता असतांना बागा कशा जगवाव्यात हा प्रश्न निर्माण झाला आहे.या भागातील शेतकरी आजमतिीस उपलब्ध होईल तेथून टँकरने एका खेपेस पाच ते सहा हजार रु पये खर्च करून पाणी आणून ते ड्रीप द्वारे बागांना देत आहेत.तसेच उसाचे पाचट हे पाच रु पये किलो प्रमाणे विकत आणून झाडांच्या बुडांना आच्छादन करीत आहे त्यामुळे झाड गारवा निर्माण होण्यास मदत होत आहे. सध्या या भागात उन्हाचे प्रमाण वाढले असून सूर्य मोठया प्रमाणात आग ओकू लागल्याने बागा अखेरच्या घटका मोजीत असून शेतकर्यांची मजुरांकरवी झाडे जगविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. या पुढे पाणी उपलब्ध झाले नाही तर हा खर्च करूनही बागा वाचतील का या चिंतेने शेतकर्यांना ग्रासले आहे.तीन एकर डाळिंब बाग असून या भागात उन्हाचे प्रमाण वाढले आहे.मुबलक पाणी नसल्याने बागा सुकून चालल्या आहेत .झाडांच्या बुडांना गारवा राहावा म्हणून उसाचे पाचट विकत आणून झाडांच्या बुडांना आच्छादन केले आहे त्यामुळे गारवा टिकून राहात आहे.रामदास दौंडे,संतोष दौंडे डाळिंब उत्पादक शेतकरी दहेगाव पाटोदा(फोटो १४ पाटोदा फोटो,१४ पाटोदा फोटो १)