शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पूरपाण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष

By admin | Updated: August 26, 2016 22:21 IST

हरणबारी धरण : पिके वाया जाण्याची भीती

द्याने : मोसम परिसरात पावसाने उघडीप दिली असली तरी हरणबारी धरणाच्या पूरचारीवरील लोखंडी प्लेट चोरी गेल्याने सतत वाहणाऱ्या पाण्याने पिक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांत व्यक्त केली जात आहे. गेल्या चार ते पाच वर्ष दुष्काळाशी सामना करीत असलेला शेतकरी यंदा पावसाने समाधानी आहे. मात्र हरणबारी धरणाचे पूरपाणी खळखळून वाहत असतानाही पाटबंधारे विभागाच्या आडमुठेपणामुळे शेतकऱ्यांना पूरपाण्याचा फायदा होत नसल्याने संतप्त प्रतिक्रि या उमटत आहेत.ब्राह्मणपाडे, उत्राणे हा कालवा नऊ किलोमीटरचा आहे. वीस ते पंचवीस दिवसांपासून मोसम नदीपात्रात पूरपाणी वाहत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र चोरट्यांनी पूरपाणी अडवून ठेवणाऱ्या प्लेट्स चोरून नेल्याने शेतकरी नदीपात्रात जीव धोक्यात घालून तात्पुरत्या स्वरूपात पूरपाणी अडविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करूनही चर्चा निष्फळ ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. उत्राणे येथील आवळाई नाल्यापर्यंत अजूनही पाणी पोहोचले नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहे. शेतातील पिके वाचविण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)