शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

नाशकात शेतकरी संपाची धग वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:28 IST

नाशिक : गेल्या वर्षी किसान क्रांती मोर्चाची धग संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविणाऱ्या नाशिक जिल्ह्णात यावर्षी मात्र शेतकरी संपाचा प्रभाव दिसून आला नाही. त्यामुळे राष्ट्रीय किसान महासंघाच्या देशव्यापी संपातील नाशिकच्या समन्वयकांनी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यास सुरुवात केली असून, यापुढे शेतकरी नेत्यांनी एकजुटीने लढ्यात उतरण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

ठळक मुद्देएकजुटीचा प्रयत्न : किसान महासंघाकडून स्थानिक नेत्यांशी चर्चा

नाशिक : गेल्या वर्षी किसान क्रांती मोर्चाची धग संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविणाऱ्या नाशिक जिल्ह्णात यावर्षी मात्र शेतकरी संपाचा प्रभाव दिसून आला नाही. त्यामुळे राष्ट्रीय किसान महासंघाच्या देशव्यापी संपातील नाशिकच्या समन्वयकांनी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यास सुरुवात केली असून, यापुढे शेतकरी नेत्यांनी एकजुटीने लढ्यात उतरण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.राष्ट्रीय किसान महासंघाच्या देशव्यापी संपात नाशिकच्या समन्वयकांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी मंगळवारी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या काही नेत्यांसोबत चर्चा करून माध्यमांसमोर येण्याची तयारी केली होती. परंतु नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या नेत्यांनी आपली भूमिका शेतकरी संपाची नसून शेतकºयांच्या मागण्यांसाठी वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय किसान महासंघाच्या समन्वयकांचे नुकसानच होणार आहे. तरी अमृता पवार यांनी आपण शेतकरी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला असून नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समिती याच मार्गाने शेतकºयांसाठी लढा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रीय किसान महासंघाच्या देशव्यापी संपाला नाशिक जिल्ह्णात सुरुवातीचे दोन दिवस काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला. परंतु त्यानंतर शेतकºयांच्या मनातील संताप धगधगता ठेवण्यासाठी जिल्ह्णात खंबीर नेतृत्व नसल्याने संपाची धग ओसरून जिल्ह्णातील बाजारपेठांमधील व्यवहार सुरळीत सुरू होऊ लागले. त्यामुळे संपाची तीव्रता कमी होत असल्याचे पाहून राष्ट्रीय किसान महासंघाचे नाशिकचे समन्वयक शंकर दरेकर यांनी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या नेत्या तथा जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करून संयुक्त भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली. परंतु, अमृता पवार उपस्थित नसल्याने पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. मात्र, याविषयी आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे अमृता पवार यांनी स्पष्ट केले आहे. शेतकºयांच्या हितासाठी व शेतकºयांच्या मागण्या सरकार समोर मांडण्यासाठी नाशिक जिल्हा आंदोलन समितीचे सत्याग्रह आंदोलन सुरू असून त्याअंतर्गत नाशिकचे आमदार व खासदारांसह पालकमंत्र्यांच्या कार्यालयांसमोर सत्याग्रह करून त्यांना शेतकºयांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. नाशिक जिल्हा शेतकरी आंदोनल समितीने हा सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला आहे. किसान महासंघाच्या संपासोबत आपले नाव जोडण्याचा प्रयत्न होत असून आपल्याला त्याविषयी कोणतीही कल्पना नाही. - अमृता पवार, नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समिती