शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
5
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
6
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
7
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
8
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
9
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
10
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
11
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
12
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
13
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
14
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
15
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
16
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
17
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
18
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
19
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
20
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी

वाकीखापरीजवळ शेतकऱ्यांचा ठिय्या

By admin | Updated: January 28, 2017 00:32 IST

घोटी : अखेर विसर्ग बंद; अधिकाऱ्यांना निवेदन

 घोटी : इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी, कोरपगाव धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग त्वरित बंद करण्यासाठी परिसरातील संतप्त शेकडो शेतकऱ्यांनी ज्येष्ठ शेतकरी नेते देवराम मराडे यांच्या नेतृत्वाखाली थेट धरणावर जाऊन ठिय्या आंदोलन करून पाण्याचा विसर्ग बंद करून वाकीखापरी प्रकल्प उपअभियंता हरिभाऊ गिते यांना निवेदन दिले. पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी ठेवावे, अशी मागणी वेळोवेळी करूनही संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे गेल्या एक ते सव्वा महिन्यापासून लाखो लिटर पाण्याचा विसर्ग होत होता. अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पाण्याचा विसर्ग बंद झाला आहे.वाकी खापरी, कोरपगाव धरणाचे पाणी परिसरातील वाकी, कुर्णोली, कोरपगाव, भावली, वाळविहीर, पिंपळगाव भटाटा, आडवण, घोटीवाडी, खंबाळे, टाके घोटी, धानोर्ली या गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी ठेवण्यात यावे, अशी मागणी होती. मात्र गेल्या एक ते सव्वा महिन्यापासून लाखो लिटर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने वरील गावातील अनेक शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रॉनिक मोटर व आॅइल इंजिन पाण्यात बुडून गेले. काही शेतकऱ्यांचे पिकामध्ये पाणी घुसलेले आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे अनेकांचे नुकसान झालेले आहे.परिसरातील वाकी, कुर्णोली, कोरपगाव, भावली, वाळविहीर, पिंपळगाव भटाटा, आडवण, घोटीवाडी, खंबाळे, टाकेघोटी, धाणोर्ली या गावांना यापुढे टंचाईच्या काळात दुष्काळाला सामोरे जावे लागेल. तसेच पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या शेतीचा प्रश्न गंभीर होईल यासाठीच पाण्याचा विसर्ग बंद करीत असल्याचे शेतकरी नेते देवराम मराडे यांनी निवेदनात म्हटले आहे.या आंदोलनप्रसंगी शेतकरी नेते देवराम मराडे, बाळासाहेब धुमाळ, हनुमान काळे, गोपाळ शेलार, भरत चव्हाण, पांडुरंग शेलार, भीमराव डोळस, नवनाथ कोकणे, प्रकाश डोळस, कारभारी गायकवाड, त्र्यंबक कोकणे, अशोक सराई, काशीनाथ कोकणे, आदि उपस्थित होते. (वार्ताहर)