शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वाकीखापरीजवळ शेतकऱ्यांचा ठिय्या

By admin | Updated: January 28, 2017 00:32 IST

घोटी : अखेर विसर्ग बंद; अधिकाऱ्यांना निवेदन

 घोटी : इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी, कोरपगाव धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग त्वरित बंद करण्यासाठी परिसरातील संतप्त शेकडो शेतकऱ्यांनी ज्येष्ठ शेतकरी नेते देवराम मराडे यांच्या नेतृत्वाखाली थेट धरणावर जाऊन ठिय्या आंदोलन करून पाण्याचा विसर्ग बंद करून वाकीखापरी प्रकल्प उपअभियंता हरिभाऊ गिते यांना निवेदन दिले. पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी ठेवावे, अशी मागणी वेळोवेळी करूनही संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे गेल्या एक ते सव्वा महिन्यापासून लाखो लिटर पाण्याचा विसर्ग होत होता. अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पाण्याचा विसर्ग बंद झाला आहे.वाकी खापरी, कोरपगाव धरणाचे पाणी परिसरातील वाकी, कुर्णोली, कोरपगाव, भावली, वाळविहीर, पिंपळगाव भटाटा, आडवण, घोटीवाडी, खंबाळे, टाके घोटी, धानोर्ली या गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी ठेवण्यात यावे, अशी मागणी होती. मात्र गेल्या एक ते सव्वा महिन्यापासून लाखो लिटर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने वरील गावातील अनेक शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रॉनिक मोटर व आॅइल इंजिन पाण्यात बुडून गेले. काही शेतकऱ्यांचे पिकामध्ये पाणी घुसलेले आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे अनेकांचे नुकसान झालेले आहे.परिसरातील वाकी, कुर्णोली, कोरपगाव, भावली, वाळविहीर, पिंपळगाव भटाटा, आडवण, घोटीवाडी, खंबाळे, टाकेघोटी, धाणोर्ली या गावांना यापुढे टंचाईच्या काळात दुष्काळाला सामोरे जावे लागेल. तसेच पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या शेतीचा प्रश्न गंभीर होईल यासाठीच पाण्याचा विसर्ग बंद करीत असल्याचे शेतकरी नेते देवराम मराडे यांनी निवेदनात म्हटले आहे.या आंदोलनप्रसंगी शेतकरी नेते देवराम मराडे, बाळासाहेब धुमाळ, हनुमान काळे, गोपाळ शेलार, भरत चव्हाण, पांडुरंग शेलार, भीमराव डोळस, नवनाथ कोकणे, प्रकाश डोळस, कारभारी गायकवाड, त्र्यंबक कोकणे, अशोक सराई, काशीनाथ कोकणे, आदि उपस्थित होते. (वार्ताहर)