शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

कांदा पिकाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांचा शेतातच मुक्काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:15 IST

सध्या कांदा पिकास इतर शेतमालाच्या तुलनेत चांगला बाजारभाव मिळत असल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळविला आहे. येवला तालुक्यात कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने शेतकरी धास्तावला असून, कांदा पिकाच्या रक्षणासाठी शेतकाऱ्यांनी जागता पहारा दिला आहे. कांदा चोर माहिती असूनही शेतकरी भीतीपोटी तक्रार करण्यास धजावत नसल्याने कांदा चोरट्यांचे फावले आहे. कांद्याचे रक्षणसाठी शेतकरीवर्गाने शेतातच मुक्काम ठोकल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देजागता पहारा । येवला तालुक्यात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे बळीराजा धास्तावला

पाटोदा : सध्या कांदा पिकास इतर शेतमालाच्या तुलनेत चांगला बाजारभाव मिळत असल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळविला आहे. येवला तालुक्यात कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने शेतकरी धास्तावला असून, कांदा पिकाच्या रक्षणासाठी शेतकाऱ्यांनी जागता पहारा दिला आहे. कांदा चोर माहिती असूनही शेतकरी भीतीपोटी तक्रार करण्यास धजावत नसल्याने कांदा चोरट्यांचे फावले आहे. कांद्याचे रक्षणसाठी शेतकरीवर्गाने शेतातच मुक्काम ठोकल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे.गेल्या काही दिवसांपासून कांदा बाजारभावात कमालीची चढउतार होत असल्याने शेतकºयांची कांदा विक्रीसाठीची लगबग सुरू असून, कांदा काढणीला वेग आलेला आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकरी दिवसरात्र एक करून कांदा विक्र ीसाठी तयार करीत आहे. मात्र तालुक्यात कांदा चोरीच्या घटना वाढल्यामुळे शेतकºयांनी चोरट्यांची धास्ती घेतली आहे. कांद्याला सध्या सोन्याचा दर असल्याने शेतात मुक्काम करून रात्र जागून काढण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. चोरटे कांद्यासह शेतकºयांच्या शेतोपयोगी साहित्यांचीही चोरी करत आहे. यामुळे लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे. यात विद्युतपंप, स्टार्टर, केबल, पाईप, औषध फवारणी पंप आदी वस्तू चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. चोरी होऊनही केवळ पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे नको म्हणून शेतकरीवर्ग तक्र ार करीत नाही, तर काही शेतकरी धास्तीपोटी चोरांपासून पुढील काळात शेतपिकांना हानी होऊ नये, म्हणून तक्रार करत नाही़पोलीस गस्त वाढविण्याची मागणी काही दिवसांपासून तालुक्यात कांदा चोर सक्रिय झाले आहेत. कांद्यासह शेतोपयोगी साहित्याच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. कांदा चोरांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.

टॅग्स :agricultureशेती