शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:18 IST

चौकट- पावती, बॅग जपून ठेवा खरीप हंगामात बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्राकडून पक्के बिल घ्यावे. पेरणी केल्यानंतर ...

चौकट-

पावती, बॅग जपून ठेवा

खरीप हंगामात बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्राकडून पक्के बिल घ्यावे. पेरणी केल्यानंतर बियाणांची बॅग, पावती आणि लेबल जपून ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. जर बियाणे बोगस निघाले तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात अनेक अडचणी येतात. गतवर्षी अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीनचे बियाणे बोगस निघाले होते. अनेकांना दुबार पेरणीचा खर्च करावा लागला होता. यासाठी या गोष्टी आवश्यक असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

चौकट-

सोयाबीन पेरताना घ्या काळजी

गतवर्षीचा अनुभव पाहता शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरताना विशेष काळजी घ्यावी. पेरणीपूर्वी बियाणांची उगवण क्षमता तपासावी. किमान ८० टक्के ओल असेल तरच पेरणी करावी. पेरताना बी अधिक खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. गतवर्षीच्या हंगामात उत्पादन कमी झाल्यामुळे सोयाबीनचे भाव कडाडले होते. ते यापुढेही कायम राहतील, असा अंदाज बांधणे धाडसाचे होऊ शकते. सोयाबीनचे येणारे उत्पादन आणि त्याला मिळणारा भाव व होणारा खर्च याचा ताळमेळ बसत असेल तरच शेतकऱ्यांनी धाडस करणे योग्य राहील, असेही कृषी अभ्यासक सांगतात.

कोट-

मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यातील सर्व भागांत पडलेला नाही. काही ठिकाणी तो अधिक झाला असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. अजून जमिनीतील उष्णता कमी झालेली नाही. या पावसामुळे उगवणारे गवत उगवू द्यावे. त्यानंतर कोळपणी करून पेरणी केली तर पुढे होणारा तणनाशकाचा खर्च कमी होईल. आपल्याकडे रायझेरीयम स्फुरद विरघळवणारे जीवाणू उपलब्ध आहेत. सोयाबीन बियाणांवर याची बीज प्रक्रिया केली, तर रासायनिक खतांचा खर्च कमी करण्याबरोबरच उत्पादनातही भर पडू शकते.

- डॉ. भानुदास गमे, कृषी शास्त्रज्ञ, निफाड