शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:18 IST

चौकट- पावती, बॅग जपून ठेवा खरीप हंगामात बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्राकडून पक्के बिल घ्यावे. पेरणी केल्यानंतर ...

चौकट-

पावती, बॅग जपून ठेवा

खरीप हंगामात बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्राकडून पक्के बिल घ्यावे. पेरणी केल्यानंतर बियाणांची बॅग, पावती आणि लेबल जपून ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. जर बियाणे बोगस निघाले तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात अनेक अडचणी येतात. गतवर्षी अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीनचे बियाणे बोगस निघाले होते. अनेकांना दुबार पेरणीचा खर्च करावा लागला होता. यासाठी या गोष्टी आवश्यक असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

चौकट-

सोयाबीन पेरताना घ्या काळजी

गतवर्षीचा अनुभव पाहता शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरताना विशेष काळजी घ्यावी. पेरणीपूर्वी बियाणांची उगवण क्षमता तपासावी. किमान ८० टक्के ओल असेल तरच पेरणी करावी. पेरताना बी अधिक खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. गतवर्षीच्या हंगामात उत्पादन कमी झाल्यामुळे सोयाबीनचे भाव कडाडले होते. ते यापुढेही कायम राहतील, असा अंदाज बांधणे धाडसाचे होऊ शकते. सोयाबीनचे येणारे उत्पादन आणि त्याला मिळणारा भाव व होणारा खर्च याचा ताळमेळ बसत असेल तरच शेतकऱ्यांनी धाडस करणे योग्य राहील, असेही कृषी अभ्यासक सांगतात.

कोट-

मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यातील सर्व भागांत पडलेला नाही. काही ठिकाणी तो अधिक झाला असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. अजून जमिनीतील उष्णता कमी झालेली नाही. या पावसामुळे उगवणारे गवत उगवू द्यावे. त्यानंतर कोळपणी करून पेरणी केली तर पुढे होणारा तणनाशकाचा खर्च कमी होईल. आपल्याकडे रायझेरीयम स्फुरद विरघळवणारे जीवाणू उपलब्ध आहेत. सोयाबीन बियाणांवर याची बीज प्रक्रिया केली, तर रासायनिक खतांचा खर्च कमी करण्याबरोबरच उत्पादनातही भर पडू शकते.

- डॉ. भानुदास गमे, कृषी शास्त्रज्ञ, निफाड