शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

शेतकऱ्यांची जुनी कर्जे गोठवून नवीन कर्र्ज द्यावीत

By admin | Updated: May 15, 2016 22:36 IST

सदाभाऊ खोत : दुष्काळग्रस्तांशी साधला संवाद

 पांगरी : सिन्नर तालुक्यातल्या पांगरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी भेट देऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांची जूनी कर्जे गोठवून त्यांना नवीन कर्ज द्यावे व पाच वर्षांनी समान हप्त्यांत कर्जाची वसुली करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सोलापूरहून नाशिक येथे जात असताना खोत यांनी पांगरी येथे धावती भेट दिली. येथील साईबाबा मंदिराजवळ बैठक घेऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शंभर टक्के कर्जमाफी आणि कांदा व दुधाला हमीभाव या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. शंभर टक्के कर्जमाफी नाही मिळाली तरी किमान दहा वर्षे बिगर व्याजी कर्ज मिळाले तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे ते म्हणाले. विजय मल्ल्यांसारखे उद्योगपती कर्ज घेऊन सहजपणे देश सोडतात. मात्र, शेतकऱ्यांना कर्जासाठी थेट जग सोडण्याची दुर्दैवी वेळ येत असल्याचे खोत म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनीही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बी-बियाणे, शेतीची अवजारे, बैल सरकारी खजिन्यातून दिली होती. त्यामुळेच स्वराज्य भक्कमपणे उभे राहिले. शिवरायांनी शेतकऱ्यांनाच केंद्रबिंदू मानले होते. आत्ताच्या राज्यकर्त्यांनीही त्याच पद्धतीचा अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचे खोत म्हणाले. दुधाच्या उत्पादनात ५० टक्के भेसळ होत असल्यानेच भावात घसरण झाल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने भेसळखोरांना लगाम घातल्यास भाव वाढणार असल्याचे ते म्हणाले. याशिवाय दुधाचा दर्जा तयार करून बाजारातील इतर उत्पादनांशी स्पर्धा करावी लागणार असल्याचे खोत यांनी सांगितले. शांताराम पगार, संजय वारुळे यांच्या हस्ते खोत यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी रवि पगार, सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर, आत्माराम पगार, विश्वनाथ पगार, कृष्णा घुमरे, सोमनाथ पगार, संदीप शिंदे, सुभाष पगार, धनंजय निरगुडे, नीलेश पगार, बाजीराव कांडेकर, संजय पगार, रभाजी पगार, प्रदीप तनपुरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)