शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

माळमाथ्यावर वांगी लागवडीला शेतकऱ्यांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST

खडकी (अमृत कळमकर) : वांगी पिकाला एकरी पाच ते सात लाख रुपये उत्पादन मिळत असल्याने माळमाथा भागातील शेतकऱ्यांनी ...

खडकी (अमृत कळमकर) : वांगी पिकाला एकरी पाच ते सात लाख रुपये उत्पादन मिळत असल्याने माळमाथा भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वांगे लागवडीकडे मोर्चा वळविला आहे. गेल्या दोन वर्षापासून या भागातील शेतकरी वांग्याची लागवड करीत असून त्याला चांगला पैसा मिळू लागला आहे. त्यासाठी देशी रवैय्या वाणाची लागवड केली जात आहे. तीन बाय सहाच्या अंतरावर सुधारित पद्धतीने मे - जून महिन्यात शेतकऱ्यांनी वांगे लागवड करून एकरी पाच लाख रुपये उत्पन्न मिळविले आहे. एका एकरमध्ये ५५ ते ६० दिवसात वांगी काढणीला येतात. प्रति एकर २५ ते ५० कॅरेट एका दिवसाला याप्रमाणे एकरी पाच लाख रुपये मिळवून देणारे उत्पादन मिळवून देणारे वांग्याचे पीक शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याने शेतकऱ्यांनी माळमाथ्यावरील सुमारे २०० ते ५०० एकर क्षेत्रावर वांगे लागवड केली आहे. वांगी काढून सुरतला विक्रीसाठी नेली जातात. दळणवळणाची साधने उपलब्ध असल्याने तसेच बाजारपेठ सुधारित बाजारभावासाठी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी वांगे लागवड करावी. या पिकाचा उत्पादन खर्च कमी येतो; जंतुनाशके वापरून सशेंडा अळीचे नियंत्रण करता येते. सूक्ष्म अन्नद्रव्य वापरून ठिबक सिंचनाद्वारे खत देण्याची पद्धत आहे. सुधारित पद्धतीने मनुष्यबळही कमी लागते. काही शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी एकरी दहा लाखांचे उत्पादन घेतले आहे. यामुळे वांगे पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांना भाजीपाला व इतर पिकांच्या दृष्टीने सोयीचे झाले आहे.यापूर्वीही शेतकऱ्यांनी शेवगा, डाळिंब लागवडीचा प्रयोग केला असून आता वांगे लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

----------------------

सद्यस्थितीत क्रति............... क्रेट.................. चारशे ते पाचशे रुपये दराने वांग्याला सुरत येथे दर मिळत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा भाव कमी आहे. तरीही उत्पादन घेणे परवडत आहे. गेल्यावर्षी एकरी दहा लाख रुपये उत्पादन मिळाले होते यंदा मात्र एकरी पाच लाख रुपये उत्पादन मिळाले.

-प्रमोद अहिरे, खडकी ता. मालेगाव (२६ प्रमोद अहिरे)

-----------------------

सद्यस्थितीत बदलत्या वातावरणामुळे जमिनीत बुरशी व शेंडअळीचे प्रमाण वांग्यामध्ये वाढलेले आहे. तेथे डेलिकेट औषधाची फवारणी केल्याने शेंडा अळी नियंत्रित करून वांग्याचे पीक यशस्वीरीत्या घेतले आहे.

-सागर चव्हाण, कृषी निविष्ठक, माळमाथा कृषी सेवा केंद्र खडकी, ता. मालेगाव. (२६ सागर चव्हाण)