शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:11 IST

नाशिक : भारतात कोरोनाची लाट सुरू असताना कोणाचीही मागणी नसताना केंद्र सरकारने शेतकरीविरोधी विधेयके पारित केले असून, या ...

नाशिक : भारतात कोरोनाची लाट सुरू असताना कोणाचीही मागणी नसताना केंद्र सरकारने शेतकरीविरोधी विधेयके पारित केले असून, या नवीन कृषी कायद्यांमुळे देशातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त होणार असल्याचा आरोप करीत केंद्र सरकारने हे नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांसह कामगार व विद्यार्थी संघटनांनी नाशिक जिल्हा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी (दि.२६) ठिय्या आंदोलन करीत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील सात महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. मात्र मोदी सरकार बड्या भांडवलदारांच्या दबावाखाली हे कायदे मागे घेण्यास तयार नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून, त्यामुळेच शेतकरी हे आंदोलन करूनही त्यांना आजपर्यंत न्याय मिळालेला नसल्याचे नमूद करीत आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देत केंद्र सरकारला शेतकर्‍यांच्या या मागण्या त्वरित मान्य करण्यासोबतच नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या किमान आधारभूत मूल्याअधिक ५० टक्के सूत्रानुसार शेतमाल खरेदीची कायदेशीर हमी देण्याबाबात सूचना करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, आंदोलकांनी शेती वाचवा, लोकशाही वाचवा, शेतकरीविरोधी कायदे रद्द करा अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. महिला आंदोलकांनी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी हातात फलक घेऊन आंदोलनात समभाग घेतला होता. यावेळी शेतकरी व कामगार संघटनांचे सीताराम ठोंबरे, सुनील मालुसरे, राजू देसले, शशिकांत उणवने, महादेव खुडे, प्रभाकर वायचळे, रमेश आवटे, गोरखनाथ बलकवडे, वित्तल घुले, अशोक खलकर, पद्माकर इंगळे, देवीदास हजारे, विराज देवांग शुभम ढेरे, रोहन पगारे, स्वाती त्रिभुवन, दिनेश सातभाई,संतोष काकडे, मुकुंद रानडे, अविनाश दोंदे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

===Photopath===

260621\26nsk_22_26062021_13.jpg

===Caption===

केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करताना आंदोलक