शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

समृद्धीसाठी जमिनी संपादित करण्यास शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:19 IST

नाशिक : जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणाऱ्या रस्त्यांसाठी इगतपुरी तालुक्यातील सात गावांमधील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. यापूर्वीही अनेक ...

नाशिक : जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणाऱ्या रस्त्यांसाठी इगतपुरी तालुक्यातील सात गावांमधील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. यापूर्वीही अनेक प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या असतांना आता पुन्हा जमिनी संपादित करण्याची नोटीस आल्याने शेतकऱ्यांनी त्यास विरोध दर्शविली आहे.

याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून प्रसंगी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. इगतपुरी तालुक्यातील साकुर ते व्हीटीसी फाटा दरम्यान होणाऱ्या समृद्धी महामार्ग जोड रस्त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करणार असल्याची अधिसूचना १५ जून रोजी जारी केली आहे. नांदुरवैद्य, बेलगाव कुऱ्हे, गोंदे दुमाला, वाडिवऱ्हे, कुऱ्हेगाव, साकुर येथील जमीन समृद्धी महामार्ग जोड रस्त्यासाठी अधिग्रहित करण्याची सूचनेद्वारे सूचित करण्यात आलेले आहे. मात्र त्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.

इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी या यापूर्वीही अनेक प्रकल्पांसाठी घेण्यात आलेल्या आहेत. लष्कर, महामार्ग, धरणप्रकल्प, रेल्वेमार्ग, औद्योगिक क्षेत्र, फिल्मसिटी तसेच समृद्धी महामार्गासाठी जमिनी घेण्यात आलेल्या आहेत. आता समृद्धी जोड महामार्गास जमिनी संपादन करण्याचे सांगितले जात असल्याने त्यास शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

यासाठी जमिनी अधिग्रहित केल्यास आंदोलन छेडले जाईल असा इशारा सरोज काशिकर, अर्जुन बोराडे, शंकर ढिकले, शंकर पुरकर, बाळासाहेब धुमाळ, भानुदास ढिकले, किसन शिंदे, उत्तम सहाणे, यादवराव सहाणे, तुकाराम सहाणे, विनोद आवारी, शिवाजी पागेरे, सुभाष गायकर आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.

100821\10nsk_35_10082021_13.jpg

कॅप्शन: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतांना शेतकरी संघटनेचे रामचंद्र बापू पाटील, सरोज काशीकर, अर्जून तात्या बोरेाडे, शंकरराव ढिकले, भानुदास ढिकले, किसन शिंदे,बाळासाहेब धुमाळ आदि.