शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात

By admin | Updated: July 8, 2014 01:10 IST

शेती व्यवसाय : डाळिंबावर तेल्या; कांद्याचा वांदा

 

नाशिक : जिल्ह्यातील काही भागात डाळिंबावर मोठ्या प्रमाणात पडलेला तेल्या रोग, कांद्याचे वाढलेले निर्यातमूल्य आणि पावसाने दिलेली ओढ अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकले असून, पशुधन जगविण्यासाठीही शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करण्याची वेळ आली आहे. खामखेडा : परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात डाळींबबागा आहेत, परंतु सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे अनेक डाळींब बागांवर तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.मागील काही वर्षांत डाळिंबास चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात डाळींब लागवड केली. महागड्या औषधांची फवारणी करून डाळींब फळधारण केली. विहिरींना पाणी कमी असताना विकत पाणी घेऊन डाळींबबागा जतन केल्या. परंतु अवकाळी पाऊस व गारांमुळे जमिनीत उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली होती. या उष्ण वातावरणाचा डाळींब बागांवर तेल्याचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकरी डाळिंबाची फळे तोडून नदीपात्रांमध्ये फेकत आहेत.सटाणा : डाळींब उत्पादकांप्रमाणेच कांदा उत्पादकही संकटात सापडले आहेत. केंद्र शासनाने पणन कायद्यातून कांदा वगळणे अत्यंत अव्यवहार्यपणाचे व घाईतील निर्णय असून, शेतकऱ्यांच्या पायावर कुऱ्हाड मारण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा परिसरात होत आहे. बाजार समितीमध्ये साठेबाजीचा संबंधच येत नसल्याने केंद्र शासनाने उपरोक्त निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी मागणी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शैलेश सूर्यवंशी यांनी केली आहे.या संदर्भात केंद्रीय कृषिमंत्री यांना त्यांनी निवेदन पाठविले असून, कृषी उत्पन्न बाजार समिती व शेतकरी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या ठिकाणी होत असलेले व्यवहार व व्यापार शेतकऱ्यांच्या हिताचे होत असतात. शेतकऱ्यांचा माल अधिकाधिक किमतीत विकणे व्यापाऱ्यांना बंधनकारक करण्यात येत असते. यामुळे बाजार समितींवर अविश्वास व्यक्त करणे व पणन कायद्यातून कांदा वगळणे हा अहिताचा व शेतकरीविरोधी निर्णय ठरणार आहे. असे निवेदनात म्हटले आहे. सिन्नर : तालुक्यात चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पशुधन वाचविण्यासाठी निफाड तालुक्यातून महागडा ऊस चारा म्हणून घेऊन यावा लागतो आहे. त्यासाठी दिसभर उसाची तोडणी करून घराकडे परतताना रात्र होऊन जाते. तालुक्याच्या पूर्वभागात चाराटंचाईची तीव्रता वाढली आहे. पाऊस होत नसल्याने तालुक्यात चारा मिळत नाही. त्यासाठी थेट निफाड तालुक्यातून चाऱ्याची वाहतूक करावी लागते आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना दोन हजार ५०० रुपये प्रतिटन दराने पैसे मोजावे लागत आहेत. तालुक्याच्या विविध भागांतून शासनाने चारा उपलब्ध करून देण्याची मागणी वाढत आहे. एक टन चारा चार जनावरांसाठी आठ दिवसही पुरत नाही. (वार्ताहर)