शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात

By admin | Updated: July 8, 2014 01:10 IST

शेती व्यवसाय : डाळिंबावर तेल्या; कांद्याचा वांदा

 

नाशिक : जिल्ह्यातील काही भागात डाळिंबावर मोठ्या प्रमाणात पडलेला तेल्या रोग, कांद्याचे वाढलेले निर्यातमूल्य आणि पावसाने दिलेली ओढ अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकले असून, पशुधन जगविण्यासाठीही शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करण्याची वेळ आली आहे. खामखेडा : परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात डाळींबबागा आहेत, परंतु सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे अनेक डाळींब बागांवर तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.मागील काही वर्षांत डाळिंबास चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात डाळींब लागवड केली. महागड्या औषधांची फवारणी करून डाळींब फळधारण केली. विहिरींना पाणी कमी असताना विकत पाणी घेऊन डाळींबबागा जतन केल्या. परंतु अवकाळी पाऊस व गारांमुळे जमिनीत उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली होती. या उष्ण वातावरणाचा डाळींब बागांवर तेल्याचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकरी डाळिंबाची फळे तोडून नदीपात्रांमध्ये फेकत आहेत.सटाणा : डाळींब उत्पादकांप्रमाणेच कांदा उत्पादकही संकटात सापडले आहेत. केंद्र शासनाने पणन कायद्यातून कांदा वगळणे अत्यंत अव्यवहार्यपणाचे व घाईतील निर्णय असून, शेतकऱ्यांच्या पायावर कुऱ्हाड मारण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा परिसरात होत आहे. बाजार समितीमध्ये साठेबाजीचा संबंधच येत नसल्याने केंद्र शासनाने उपरोक्त निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी मागणी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शैलेश सूर्यवंशी यांनी केली आहे.या संदर्भात केंद्रीय कृषिमंत्री यांना त्यांनी निवेदन पाठविले असून, कृषी उत्पन्न बाजार समिती व शेतकरी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या ठिकाणी होत असलेले व्यवहार व व्यापार शेतकऱ्यांच्या हिताचे होत असतात. शेतकऱ्यांचा माल अधिकाधिक किमतीत विकणे व्यापाऱ्यांना बंधनकारक करण्यात येत असते. यामुळे बाजार समितींवर अविश्वास व्यक्त करणे व पणन कायद्यातून कांदा वगळणे हा अहिताचा व शेतकरीविरोधी निर्णय ठरणार आहे. असे निवेदनात म्हटले आहे. सिन्नर : तालुक्यात चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पशुधन वाचविण्यासाठी निफाड तालुक्यातून महागडा ऊस चारा म्हणून घेऊन यावा लागतो आहे. त्यासाठी दिसभर उसाची तोडणी करून घराकडे परतताना रात्र होऊन जाते. तालुक्याच्या पूर्वभागात चाराटंचाईची तीव्रता वाढली आहे. पाऊस होत नसल्याने तालुक्यात चारा मिळत नाही. त्यासाठी थेट निफाड तालुक्यातून चाऱ्याची वाहतूक करावी लागते आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना दोन हजार ५०० रुपये प्रतिटन दराने पैसे मोजावे लागत आहेत. तालुक्याच्या विविध भागांतून शासनाने चारा उपलब्ध करून देण्याची मागणी वाढत आहे. एक टन चारा चार जनावरांसाठी आठ दिवसही पुरत नाही. (वार्ताहर)