शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगाम नियोजनासाठी शेतकऱ्यांची लगबग

By admin | Updated: May 29, 2016 23:18 IST

बेलगाव कुऱ्हे : नांगर, वखर, सारायंत्र, तीपण, कोळप आदि औजारांची दुरुस्ती

बेलगाव कुऱ्ऱ्हे : भाताचे आगार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगाम नियोजनासाठी जमीन मशागतीच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून शेतीसाठी लागणारी नांगर, वखर, सारायंत्र, तीपण, पाबर, कोळप आदि पारंपरिक औजारे कुशल कारागिरांकडून बनवली जात आहे. दुष्काळी परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना अनेक कारणांनी पैशांची झळ बसत आहे.काही दिवसात पावसाचे आगमन होण्याची चिन्हे असून ग्रामीण भागातील शेतकरी पारंपरिक औजारे कारागिरांकडून बनवून घेतात; मात्र महागाईमुळे औजारांनादेखील अडीच हजार रुपये खर्च येत असल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारे नसूनदेखील ते खरेदी करीत आहे. काळाच्या ओघात शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला. ट्रॅक्टरच्या माध्यमातून मशागत करण्यासाठी अडीच ते तीन हजार रुपये भाव एकरला मोजावे लागत आहे. भाताचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील १३० गावे खरीप हंगामासाठी निश्चित केली असली तरी कागदी घोडे नाचविणाऱ्या अधिकाऱ्यांनी खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यातील महसुली गावांमध्ये अनेक शेतकरी पावसाळ्यात भात लागवड करतात. मेच्या शेवटच्या आठवड्यात खरीप हंगामाच्या जोरदार तयारीसाठी जमीन दुरुस्ती, मशागतीची कामे केली जातात; मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे व अवकाळीच्या माजवलेल्या कहरामुळे ग्रामीण भागातील काही शेतकऱ्याकडे जमीन दुरु स्ती, मशागतीसाठी पैसेच शिल्लक नसल्याने ते आता हवालदिल झाले आहेत. कर्जाच्या डोंगराची परतफेडदेखील होणे शक्य नाही. अशातच खरीपपूर्व मशागतीसाठी असणाऱ्या औजारांना बाजारात प्रचंड मागणी वाढली असून शासनाने शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी तत्काळ योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.पावसाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तालुक्यात अनियमित पावसामुळे गेल्या काही वर्षांपासून शेतीची अनेक कामे रखडली जात आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीव्यवसायावर अनेक विपरीत परिणाम होत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात भरपूर उत्पादन होण्यासाठी ते पूर्व मशागतीची नांगरट, मोघडणीची कामे सुरू करतात; मात्र शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडल्याने शेत मशागतीकडे दुर्लक्ष होत आहे.गेल्या चार पाच वर्षात खरीप हंगामाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. यावर्षी भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे. उन्हाची तीव्रता अधिक असून शेतकऱ्याच्या हातात पैसाच नसल्याने ऐन वेळेला पाहू, निघेल काहीतरी मार्ग कदाचित असाच विचार तालुक्यातील शेतकरी करीत असावा असे चित्र पहावयास मिळत आहे. तालुक्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. पिण्यासाठी पाणी आणि जनावरांसाठी चारा मिळावा यासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू आहे. यंदा घेतलेली रब्बी पिके हाती लागली नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. खरीप पेरणीसाठी पैसाच उपलब्ध नसल्याने गरीब शेतकरी सैरभैर झाला आहे. दुष्काळी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही अशी घोषणा शासनाकडून सातत्याने होत आहे. परंतु दुसरीकडे याच शासनाला रब्बी हंगामातील बाधित शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्याचा विसर पडला आहे. (वार्ताहर)