शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

खरीप हंगाम नियोजनासाठी शेतकऱ्यांची लगबग

By admin | Updated: May 29, 2016 23:18 IST

बेलगाव कुऱ्हे : नांगर, वखर, सारायंत्र, तीपण, कोळप आदि औजारांची दुरुस्ती

बेलगाव कुऱ्ऱ्हे : भाताचे आगार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगाम नियोजनासाठी जमीन मशागतीच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून शेतीसाठी लागणारी नांगर, वखर, सारायंत्र, तीपण, पाबर, कोळप आदि पारंपरिक औजारे कुशल कारागिरांकडून बनवली जात आहे. दुष्काळी परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना अनेक कारणांनी पैशांची झळ बसत आहे.काही दिवसात पावसाचे आगमन होण्याची चिन्हे असून ग्रामीण भागातील शेतकरी पारंपरिक औजारे कारागिरांकडून बनवून घेतात; मात्र महागाईमुळे औजारांनादेखील अडीच हजार रुपये खर्च येत असल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारे नसूनदेखील ते खरेदी करीत आहे. काळाच्या ओघात शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला. ट्रॅक्टरच्या माध्यमातून मशागत करण्यासाठी अडीच ते तीन हजार रुपये भाव एकरला मोजावे लागत आहे. भाताचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील १३० गावे खरीप हंगामासाठी निश्चित केली असली तरी कागदी घोडे नाचविणाऱ्या अधिकाऱ्यांनी खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यातील महसुली गावांमध्ये अनेक शेतकरी पावसाळ्यात भात लागवड करतात. मेच्या शेवटच्या आठवड्यात खरीप हंगामाच्या जोरदार तयारीसाठी जमीन दुरुस्ती, मशागतीची कामे केली जातात; मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे व अवकाळीच्या माजवलेल्या कहरामुळे ग्रामीण भागातील काही शेतकऱ्याकडे जमीन दुरु स्ती, मशागतीसाठी पैसेच शिल्लक नसल्याने ते आता हवालदिल झाले आहेत. कर्जाच्या डोंगराची परतफेडदेखील होणे शक्य नाही. अशातच खरीपपूर्व मशागतीसाठी असणाऱ्या औजारांना बाजारात प्रचंड मागणी वाढली असून शासनाने शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी तत्काळ योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.पावसाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तालुक्यात अनियमित पावसामुळे गेल्या काही वर्षांपासून शेतीची अनेक कामे रखडली जात आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीव्यवसायावर अनेक विपरीत परिणाम होत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात भरपूर उत्पादन होण्यासाठी ते पूर्व मशागतीची नांगरट, मोघडणीची कामे सुरू करतात; मात्र शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडल्याने शेत मशागतीकडे दुर्लक्ष होत आहे.गेल्या चार पाच वर्षात खरीप हंगामाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. यावर्षी भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे. उन्हाची तीव्रता अधिक असून शेतकऱ्याच्या हातात पैसाच नसल्याने ऐन वेळेला पाहू, निघेल काहीतरी मार्ग कदाचित असाच विचार तालुक्यातील शेतकरी करीत असावा असे चित्र पहावयास मिळत आहे. तालुक्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. पिण्यासाठी पाणी आणि जनावरांसाठी चारा मिळावा यासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू आहे. यंदा घेतलेली रब्बी पिके हाती लागली नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. खरीप पेरणीसाठी पैसाच उपलब्ध नसल्याने गरीब शेतकरी सैरभैर झाला आहे. दुष्काळी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही अशी घोषणा शासनाकडून सातत्याने होत आहे. परंतु दुसरीकडे याच शासनाला रब्बी हंगामातील बाधित शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्याचा विसर पडला आहे. (वार्ताहर)