शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:15 IST

नाशिक : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन तीनही कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या २५ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ३६ ...

नाशिक : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन तीनही कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या २५ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ३६ शेतकऱ्यांचे बळी गेले असतानाही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे केंद्रातील सरकारने हे कायदे शेतकऱ्यांच्या नव्हे तर उद्योगपतींसह परदेशी भांडवलदारांच्या फायद्यासाठी आणल्याचा आरोप करीत महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी (दि. २१) नाशिकहून राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली.

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात राज्यभरातील हजारो शेतकरी सोमवारी नाशिकमधील गोल्फ क्लब मैदानावर जमत इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह उद्योजक, भांडवलदारशाही विरोधातही घोषणाबाजी करीत मोदी व शाह यांच्या पोस्टरचे दहन करण्यात आले. यात सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर, महाड, मुंबई ठाणे यासह विविध जिल्ह्यांतून सुमारे ३ हजार शेतकरी व कामगारांनी सहभाग नोंदवला. या शेतकऱ्यांनी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे यांच्या नेतृत्वात आणि केरळचे खासदार के. के. रागेश यांच्या प्रमुख उपस्थित दिल्लीकडे प्रस्थान केले. यावेळी आमदार जयंत पाटील, माजी आमदार नरसय्या आडम, माजी आमदार जे, पी. गावीत, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी. एल. कराड, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसान गुज्जर, सचिव अजित नवले, राजू देसले, सुनील मालुसरे आदी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

इन्फो-

पहिला मुक्काम चांदवडला

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधून निघालेल्या शेतकरी मोर्चाचा पहिला मुक्काम चांदवडला होणार असून मंगळवारी (दि. २२)सकाळी चांदवडवरून पुन्हा दिल्लीच्या दिशेने मोर्चाचे प्रस्थान होणार आहे. यात उमराणे, मालेगाव असा प्रवास करून मोर्चेकरी धुळ्यात दाखल होतील. या प्रवासात ठिकठिकाणी विविध पक्ष व संघटना दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या शेतकरी मोर्चातील वाहनांच्या ताफ्याचे स्वागत करणार असून दुसऱ्या दिवसाचा मुक्काम शिरपूर येथे होणार आहे. त्यानंतर बुधवारी (दि. २३) तिसऱ्या दिवशी मोर्चेकऱ्यांच्या वाहनांचा हा ताफा मध्य प्रदेश, राजस्थान असा प्रवास करीत दिल्लीकडे मार्गक्रमण करणार असून शिरपूरपर्यंत यात सुमारे ५०० कामगारही सहभागी होणार आहे.