शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
4
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
5
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
7
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
8
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
10
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
12
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
13
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
15
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
16
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
18
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
19
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
20
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

‘समृद्धी’च्या आडून शेतकऱ्यांची गळचेपी

By admin | Updated: June 2, 2017 01:17 IST

नाशिक : शेती आणि श्रम याशिवाय काहीही नसलेल्या शेतकऱ्यांच्या ‘समृद्धी’च्या नावाने जमिनी काढून घेणे हा घोर अन्यायच आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेती आणि श्रम याशिवाय काहीही नसलेल्या शेतकऱ्यांच्या ‘समृद्धी’च्या नावाने जमिनी काढून घेणे हा घोर अन्यायच आहे. पर्यायी रस्ते असताना समृद्धीसाठी आग्रह करण्यात समृद्धी कुणाची, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डॉ. भालचंद्र कानगो यांनी केले. नाशिकला हुतात्मा स्मारकात गुरुवारी (दि.१) समृद्धी कुणाची? शेतकऱ्यांची की सरकारची? या पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. कानगो यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे राजू देसले, माजी सभापती पांडुरंग वारुंगसे, दत्तात्रय डुकरे-पाटील, अरुण गायकर यांच्यासह समृद्धीबाधित शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. कानगो म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. जागतिकीकरणानंतर सगळ्या प्रश्नांवर जागतिक प्रभाव पडतो आहे. शेतीमालाची भाव हातात राहिलेली नाही. त्यात दृष्काळाने व सरकारी धोरणांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जात आहे. समृद्धी हाही अशाच धोरणातून जन्माला आलेला एक मोठा प्रश्न आहे. कुठलीही चर्चा नसताना, लोकशाहीने ज्या आमदार, खासदारांना अधिकार दिले आहे, अशा लोकप्रतिनिधींचे अधिकार काढून घेत, कंपनीकरणातून हा प्रकल्प लादला जातो आहे. सध्या स्थितीत दोन रस्ते, विमान, रेल्वेसेवा असताना समृद्धी रस्ता मागितला कुणी? तरीही, तो लादला जातोय असे ते म्हणाले.