शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

योग्य दरासह नोकरी देण्याच्या अटीवर शेतकरी ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST

साकूर ते व्हीटीसी फाट्यादरम्यान होणाऱ्या समृद्धी महामार्ग जोडरस्त्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करणार असून, या जमिनींचे दर गगनाला भिडले ...

साकूर ते व्हीटीसी फाट्यादरम्यान होणाऱ्या समृद्धी महामार्ग जोडरस्त्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करणार असून, या जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. सदर जमिनी प्रकल्पांसाठी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध कायम असून, यासाठी शासनाने योग्य दर निश्चित करून वाढीव मोबदला शेतकऱ्यांना दिला पाहिजे. याआधीच शासनाने विविध प्रकल्पासांठी हजारो हेक्टर जमिनी संपादित केल्यामुळे येथील शेतकऱ्यांकडे काही गुंठेच जमीन शिल्लक आहे. त्यातच आता समृद्धी महामार्ग जोडरस्त्यासाठी पुन्हा एकदा जमिनी संपादित करण्याचा डाव शासन खेळत आहे. आता उर्वरित जमिनीदेखील शासन संपादित करणार असल्याने शेतकऱ्यांनी जगण्यापेक्षा जालियनवाला बागेच्या घटनेची पुनरावृत्ती करा, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ मुसळे यांनी प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांच्यासमोर मांडली. इगतपुरी तालुक्यातील जवळपास ९० टक्के जमिनीपैकी ५४ हजार हेक्टर जमिनी याआधीच शासनाने विविध प्रकल्पासांठी संपादित केल्या आहेत. भविष्यात येथील शेतकऱ्यांकडे जमिनीच शिल्लक राहत नसल्यामुळे या शेतकऱ्यांच्या मुलांना शासनाने विविध शासकीय विभागांमध्ये नोकरी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली.

याप्रसंगी प्रांताधिकारी तेजस चव्हाण, समृद्धी महामार्गाचे अधिकारी सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बोरसे, गोसावी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे, अरुण भोर, सरपंच ॲड. चंद्रसेन रोकडे, तलाठी सुवर्णा गांगुर्डे, तलाठी सुरेखा कदम, ग्रामविकास अधिकारी किरण शेलावणे, सरपंच नंदराज गुळवे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

साकूर ते व्हीटीसी फाटादरम्यान होणाऱ्या समृद्धी महामार्ग जोडरस्त्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करणार असून, या जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. सदर जमिनी प्रकल्पांसाठी शासनाने भावना विचारात घेऊन भविष्यात शेतकरी रस्त्यावर येणार नाही या उद्देशाने शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी देण्यात यावी. योग्य दर निश्चित करून वाढीव मोबदला मिळावा.

-पंढरीनाथ मुसळे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नांदूरवैद्य

कोट....

समृद्धी महामार्गाच्या या जोडरस्त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात याचा फायदाच होणार आहे. पुढील आठवड्यात जमिनींची शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात येईल. त्यानंतर दर निश्चित केल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येईल. यावेळी शेतकरी नाराज होणार नाहीत यासाठी आम्हीही प्रयत्न करत आहोत.

-तेजस चव्हाण, प्रांताधिकारी, इगतपुरी

फोटो- २३ नांदूरवैद्य मीटिंग

नांदूरवैद्य येथे समृद्धी महामार्गाच्या जोडरस्त्याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी तेजस चव्हाण. समवेत समृद्धी महामार्गाचे अधिकारी सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गोसावी, बोरसे, सरपंच ॲड. चंद्रसेन रोकडे व उपस्थित शेतकरी.

230921\23nsk_33_23092021_13.jpg

फोटो- २३ नांदूरवैद्य मिटींग