शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

शेतकरी हवालदिल : मजुरांअभावी उत्पादकांना मोठा भुर्दंड 900 हेक्टर ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:20 IST

सायखेडा : निफाड तालुक्यातील निफाड आणि रानवड सहकारी साखर कारखाने बंद असल्याने तालुक्या-बाहेरील कारखान्यांना ऊसतोडणी करण्यासाठी विनवणी करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढलेहक्काचे कारखाने बंद पडले

सायखेडा : निफाड तालुक्यातील निफाड आणि रानवड सहकारी साखर कारखाने बंद असल्याने तालुक्या-बाहेरील कारखान्यांना ऊसतोडणी करण्यासाठी विनवणी करण्याची वेळ आली आहे. परिणामी कारखाना कर्मचाºयापेक्षा ऊसतोडणी करणाºया टोळीच्या मुकादमांना ‘अच्छे दिन’ आले असून, तोडणीसाठी कारखान्याने निश्चित केलेल्या दरापेक्षा एकरी पंधरा ते वीस हजार रुपये मुकादम घेऊन ऊसतोडणी करत असल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.निफाड तालुक्यात गोदावरी, कादवा, दारणा, बाणगंगा, पालखेड कालवा, डावे कालवे, कडवा कॅनॉल असल्याने मुबलक पाणी, नदीचे खोरे असल्याने काळी कसदार जमीन यामुळे तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे. ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर होते. शिवाय गोदाकाठच्या उसाला रिकव्हरी जास्त प्रमाणात असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड करतात. अनेक दशके गोदाकाठ भागात सर्वाधिक ऊस लागवड क्षेत्र असल्याने निफाड तालुक्यात निसाका आणि रासाका असे दोन कारखाने उभारले गेले. एकेकाळी दोन कारखान्यांना पुरवठा केला जाईल एवढा ऊस पिकवला जात होता. आजदेखील परिस्थिती जैसे थे आहे. क्षेत्र तितकेच आहे मात्र दोन्ही कारखाने बंद पडले आहेत. तालुक्यातील सहकाराला लागलेली घरघर अखेर शेतकºयांच्या मुळावर येऊन ठेपली आहे. नदीलगत ऊस लागवड केल्याशिवाय शेतकºयांना पर्याय नाही आणि स्वत:च्या हक्काचे कारखाने बंद पडले आहेत त्यामुळे नगर जिल्ह्यातील कारखान्यांना योग्य प्रतीचा ऊस निफाड तालुक्यात मिळू लागला आहे. ऊस उत्पादकदेखील कोळपेवाडी, कोपरगाव, लोणी, प्रवरा या कारखान्यांना ऊस देत आहे. कारखाने योग्य भाव देऊन ऊस खरेदी करत असले तरी ऊसतोडणी करणारी मजुरांची टोळी सांभाळण्यासाठी शेतकºयांना कसरत करावी लागत आहे. टोळीचा मुकादम जिथे सांगेल तिथे टोळी ऊसतोडणी करण्यासाठी जाते. ऊसतोडणी करण्यासाठी कारखान्याचा प्रशासकीय अधिकारी म्हणून स्लिप मास्तर यांची नियुक्ती केलेली असते. एकेकाळी स्लिप मास्तरचा शब्द अंतिम असायचा. मुकादम अथवा मजूर यांनी कोणतीही सबब न सांगता स्लिप मास्तर ज्या शेताची स्लिप बनवून मुकादमाकडे देत असे त्या शेतात टोळी जात असे. आता मात्र मुकादम स्लिप मास्तर यांना न जुमानता जो शेतकरी आर्थिक देवाण-घेवाण करतो त्या शेतकºयाच्या शेतात काम करण्यासाठी जात असल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. ऊसतोडणी लवकर पूर्ण करण्यासाठी शेतकरी मुकादमांना पैसे देऊन ऊसतोडणी करून घेत आहेत. या मुकादमराजमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नाशिक व नगर जिल्ह्यात सर्वाधिक जास्त प्रमाणात ऊस पिकविणारा तालुका म्हणून निफाड तालुक्याची परंपरा आहे. यामुळे तालुक्यातील मोठ्या गाळप करणारे दोन साखर कारखाने बंद पडल्याने आज ऊस उत्पादक शेतकरी ऊसतोडणी होत नाही. मुकादम, मजूर यांच्या अवास्तव मागण्या आणि मनमनीला आळा घालण्यासाठी तालुक्यातील पुढाºयांनी संबंधित कारखान्याच्या प्रशासकीय अधिकारी आणि अध्यक्ष, संचालक मंडळ यांच्याशी चर्चा करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.