शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

गावाची तहान भागविण्यासाठी शेतकऱ्याने स्वखर्चाने दिले ग्रामपंचायतीला बोअरवेल करून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 17:22 IST

देवळा : वाजगाव येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर गावात पाण्याची सोय व्हावी यासाठी शासकीय मदतीची वाट न पाहता येथील दिपक दामोदर देवरे या शेतकऱ्याने स्वखर्चाने बोअरवेल करून आदर्श निर्माण केला आहे.

ठळक मुद्देविहीर अधिग्रहण करण्यास विरोध आहे.

देवळा : वाजगाव येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर गावात पाण्याची सोय व्हावी यासाठी शासकीय मदतीची वाट न पाहता येथील दिपक दामोदर देवरे या शेतकऱ्याने स्वखर्चाने बोअरवेल करून आदर्श निर्माण केला आहे.वाजगावला पाणीपुरवठा करणाºया ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहीरीने तळ गाठल्यानंतर गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. वाजगाव ग्रामपंचायतीने टॅकर मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता.शासनाने गावातील पाणी असलेल्या विहिरीचे अधिग्रहण करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा व त्यास मंजुरी द्वावी अशी सुचना करून ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव परत पाठवला. गावात पाणीपुरवठा करणाºया विहीरीच्या परीसरातील काही शेतकऱ्यांच्या विहीरींना पाणी असूनही शासन अल्प दराने विहिरींचे अधिग्रहण करते, अशी शेतकºयांची तक्र ार असून त्यांचा विहीर अधिग्रहण करण्यास विरोध आहे.यातून मार्ग काढत उपसरपंच दिपक देवरे यांनी १५ दिवस स्वखर्चाने गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करून गावाची तहान भागविली. परंतु या टँकर बाबतही गावात काही विरोधकांनी अपप्रचार सुरू केल्यामुळे उपसरपंच देवरे यांनी टँकर बंद केला. यानंतर गावात पाण्याची बिकट परीस्थिती निर्माण झाली.पाण्यासाठी गावकºयांना भटकंती करण्याची वेळ आली. त्यावेळी गावातील दिपक दामोदर देवरे हया तरूण शेतकºयाने पुढाकार घेत गावाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून स्वखर्चाने ग्रामपंचायतीला बोअरवेल करून देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे मंगळवारी (दि.१९) सायंकाळी बोअरची गाडी बोलावून त्यांनी गावात ५७० फुट बोअर केले. यासाठी देवरे यांना ६० हजार रूपये खर्च आला.गावागावात प्रत्येक गोष्ट हि शासनानेच करावी हि मानसिकता जनतेमध्ये बळावत चालली असतांना दिपक दामू देवरे या शेतकºयाने स्वखर्चाने बोअरवेल करून देत वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला असून टंचाईवर मात करण्यासाठी शासनावर अवलंबून न राहता जनतेने पुढे येण्याची गरज आहे.*** सामाजिक बांधिलकी जपत गावाचे आपण काही देणे लागतो या विचारातून गावाची तहान भागविण्यासाठी हा छोटासा प्रयत्न केला.दिपक दामू देवरे, शेतकरी वाजगाव.