शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’ विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: March 30, 2017 23:28 IST

सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने येथील भव्य मोर्चा काढण्यात आला.

 सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने येथील भव्य मोर्चा काढण्यात आला. नागपूर-मुंबई महामार्गासाठी करण्यात येणारी मोजणी त्वरित थांबविण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी महेश पाटील व तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांना देण्यात आले.गुरुवारी सकाळी बसस्थानक परिसरात समृद्धी महामार्गामुळे बाधीत होणारे शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. हातात फलक घेऊन शासनविरोधी घोषणा देत बसस्थानकापासून मोर्चाला प्रारंभ झाला. गावठा, नेहरू चौक, गणेशपेठ, शिवाजी चौक, वावीवेसमार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी मोर्चा अडवला. ठरावीक प्रतिनिधींनाच निवेदन देण्यासाठी आत जाता येईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. त्यानंतर संतप्त मोर्चेकऱ्यांनी शासनविरोधी घोषणा देण्यासाठी प्रारंभ केला. त्यामुळे पोलिसांनी केवळ महिलांना तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सोडण्याचा निर्णय घेतला. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने उर्वरित आंदोलनकर्त्यांनाही तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सोडण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात छोटेखानी सभा पार पडली. या सभेत मोर्चेकऱ्यांनी आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. शहापूर येथील बबन हारणे यांनी समृद्धी महामार्गाच्या धोरणावर शासनावर कडाडून टीका केली. समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांच्या नव्हे तर लोकप्रतिनिधी व सनदी अधिकाऱ्यांच्या समृद्धीसाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. या महामार्गाच्या सर्व्हेचे काम मुख्यमंत्र्यांच्या भावाला दिल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक अधिकाऱ्यांनी या रस्त्यासाठी बेनामी माालमत्ता घेतल्या असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांनी आत्महत्त्या न करता कडाडून विरोध करण्याचे आवाहन हारणे यांनी केले. कोणत्या शेतकऱ्यांनी या महामार्गाची मागणी केली त्यांची नावे अगोदर जाहीर करा, अशी मागणी किसान सभेचे कार्याध्यक्ष राजू देसले यांनी केली. यावेळी अ‍ॅड. सुभाष हारक, अ‍ॅड. राजेंद्र घुमरे, नंदा पवार, कचरू डुकरे, एल.एम. डांगे यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात राजू देसले, बबन हारणे यांच्यासह शांताराम ढोकणे, राजेंद्र घुमरे, नामदेव शिंदे, कचरू डुकरे, सोमनाथ वाघ, के. एम.सांगळे, मच्छिंद्र चिने, नामदेव आरोटे, शहाजी पवार, केरू पवार, अंबादास वाजे, भास्कर गुंजाळ, शिवाजी चव्हाणके, नीलेश गुंजाळ, कृष्णा दराडे, आनंदा कोठुंगे, जालिंदर आढाव, नवनाथ ढोली, तानाजी तुपे, अ‍ॅड. दामोदर पाजीरे, चिंतामण वाघ, सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)