शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

‘समृद्धी’ विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: March 30, 2017 23:28 IST

सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने येथील भव्य मोर्चा काढण्यात आला.

 सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने येथील भव्य मोर्चा काढण्यात आला. नागपूर-मुंबई महामार्गासाठी करण्यात येणारी मोजणी त्वरित थांबविण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी महेश पाटील व तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांना देण्यात आले.गुरुवारी सकाळी बसस्थानक परिसरात समृद्धी महामार्गामुळे बाधीत होणारे शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. हातात फलक घेऊन शासनविरोधी घोषणा देत बसस्थानकापासून मोर्चाला प्रारंभ झाला. गावठा, नेहरू चौक, गणेशपेठ, शिवाजी चौक, वावीवेसमार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी मोर्चा अडवला. ठरावीक प्रतिनिधींनाच निवेदन देण्यासाठी आत जाता येईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. त्यानंतर संतप्त मोर्चेकऱ्यांनी शासनविरोधी घोषणा देण्यासाठी प्रारंभ केला. त्यामुळे पोलिसांनी केवळ महिलांना तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सोडण्याचा निर्णय घेतला. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने उर्वरित आंदोलनकर्त्यांनाही तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सोडण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात छोटेखानी सभा पार पडली. या सभेत मोर्चेकऱ्यांनी आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. शहापूर येथील बबन हारणे यांनी समृद्धी महामार्गाच्या धोरणावर शासनावर कडाडून टीका केली. समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांच्या नव्हे तर लोकप्रतिनिधी व सनदी अधिकाऱ्यांच्या समृद्धीसाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. या महामार्गाच्या सर्व्हेचे काम मुख्यमंत्र्यांच्या भावाला दिल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक अधिकाऱ्यांनी या रस्त्यासाठी बेनामी माालमत्ता घेतल्या असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांनी आत्महत्त्या न करता कडाडून विरोध करण्याचे आवाहन हारणे यांनी केले. कोणत्या शेतकऱ्यांनी या महामार्गाची मागणी केली त्यांची नावे अगोदर जाहीर करा, अशी मागणी किसान सभेचे कार्याध्यक्ष राजू देसले यांनी केली. यावेळी अ‍ॅड. सुभाष हारक, अ‍ॅड. राजेंद्र घुमरे, नंदा पवार, कचरू डुकरे, एल.एम. डांगे यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात राजू देसले, बबन हारणे यांच्यासह शांताराम ढोकणे, राजेंद्र घुमरे, नामदेव शिंदे, कचरू डुकरे, सोमनाथ वाघ, के. एम.सांगळे, मच्छिंद्र चिने, नामदेव आरोटे, शहाजी पवार, केरू पवार, अंबादास वाजे, भास्कर गुंजाळ, शिवाजी चव्हाणके, नीलेश गुंजाळ, कृष्णा दराडे, आनंदा कोठुंगे, जालिंदर आढाव, नवनाथ ढोली, तानाजी तुपे, अ‍ॅड. दामोदर पाजीरे, चिंतामण वाघ, सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)