शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आर्थिक संकटात

By admin | Updated: September 3, 2016 23:41 IST

चाळीतील कांदा सडला : टमाट्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव

 जायखेडा : कांद्यापाठोपाठ टमाट्याचेही भाव गडगडल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीस आला आहे. चांगला भाव मिळेल या आशेवर चाळीस साचून ठेवलेला कांदा सडण्याबरोबरच टमाट्यावरही विविध रोगांचा प्रार्दुभाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही पिकांवर मोठ्या प्रमाणात खर्च करून व विविध समस्यांचा सामना करीत पिकविलेल्या कांदा व टमाट्यातून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. घेतलेले कर्ज फेडायचे कसे व उदरिनर्वाह करायचा कसा, या विवंचनेत शेतकरी दिवस काढत आहेत.शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणाऱ्या डाळिंबाचीसुद्धा आधीच पुरती वाताहत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक भिस्त कांदा या पिकावर आहे. अल्प पाण्यात नियोजन करून पिकविलेल्या कांद्याचे शेतकऱ्यांनी विक्र मी उत्पन्न काढले होते. मात्र नंतर बेमोसमी अवकाळीने कांद्याचे मोठे नुकसान झाले. याही परिस्थितीत काही प्रमाणात वाचलेल्या कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला होता. दरम्यान, सरकारने अडत व नियमनमुक्तीचा निर्णय घेतल्याने याविरोधात व्यापाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. साठवून ठेवलेला शेकडो क्विंटल कांदा वेळीच विकला न गेल्याने चाळीतच सडू लागला आहे. अतिरिक्त खर्च करून पिकविलेला कांदा फेकून देण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शासनही शेतकऱ्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरल्याने त्यांची पुरती वाताहत झाली आहे. आता कर्ज फेडण्याबरोबरच दैनंदिन गरजा कशा पूर्ण करायच्या, या प्रश्नाने शेतकरी हतबल झाला आहे. (वार्ताहर)