शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शेतकरी आर्थिक संकटात

By admin | Updated: September 3, 2016 23:41 IST

चाळीतील कांदा सडला : टमाट्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव

 जायखेडा : कांद्यापाठोपाठ टमाट्याचेही भाव गडगडल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीस आला आहे. चांगला भाव मिळेल या आशेवर चाळीस साचून ठेवलेला कांदा सडण्याबरोबरच टमाट्यावरही विविध रोगांचा प्रार्दुभाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही पिकांवर मोठ्या प्रमाणात खर्च करून व विविध समस्यांचा सामना करीत पिकविलेल्या कांदा व टमाट्यातून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. घेतलेले कर्ज फेडायचे कसे व उदरिनर्वाह करायचा कसा, या विवंचनेत शेतकरी दिवस काढत आहेत.शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणाऱ्या डाळिंबाचीसुद्धा आधीच पुरती वाताहत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक भिस्त कांदा या पिकावर आहे. अल्प पाण्यात नियोजन करून पिकविलेल्या कांद्याचे शेतकऱ्यांनी विक्र मी उत्पन्न काढले होते. मात्र नंतर बेमोसमी अवकाळीने कांद्याचे मोठे नुकसान झाले. याही परिस्थितीत काही प्रमाणात वाचलेल्या कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला होता. दरम्यान, सरकारने अडत व नियमनमुक्तीचा निर्णय घेतल्याने याविरोधात व्यापाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. साठवून ठेवलेला शेकडो क्विंटल कांदा वेळीच विकला न गेल्याने चाळीतच सडू लागला आहे. अतिरिक्त खर्च करून पिकविलेला कांदा फेकून देण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शासनही शेतकऱ्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरल्याने त्यांची पुरती वाताहत झाली आहे. आता कर्ज फेडण्याबरोबरच दैनंदिन गरजा कशा पूर्ण करायच्या, या प्रश्नाने शेतकरी हतबल झाला आहे. (वार्ताहर)