शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

टॉवर लाइन वळविण्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

By admin | Updated: September 13, 2016 01:08 IST

दिंडोरी : शेतातून गेलेला पावर ग्रीड कंपनीच्या मनोरा कोसळल्याने भीती

दिंडोरी : शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असलेल्या पॉवर ग्रिड कंपनीचा टॉवर अवनखेड शिवारात कोसळल्याने टॉवर लाइन प्रभावित क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर प्रकल्प बंद करून टॉवर लाइन अन्य भागात वळवावी या मागणीसाठी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी अवनखेड येथील पडलेल्या टॉवर येथे उपोषण सुरू केले आहे.२५ आॅगस्ट रोजी निफाड व दिंडोरीच्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी शिरवाडे वणी येथे सरण रचत आत्मदहन आंदोलन केले होते त्यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांनी १५ दिवसात कपाती रद्द करून जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पंधरा दिवस उलटूनही आश्वासन पाळले गेले नाही. त्यातच १० तारखेला अवनखेड येथे टॉवर कोसळला. त्यामुळे सर्व शेतकरी भयभीत झाले असून, द्राक्षाबागांवरून, घराशेजारून जाणारी लाइन कधीही कोसळून अपघात होणाची भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थिती टॉवर लाइन नकोच अशी शेतकऱ्यांची मानसिकता झाली आहे. सरकारने वेळीच हा प्रकल्प थांबवला नाही तर शेतकरी आत्मदहन करतील व त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, अशा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. सदर लाइन वसाहती-शेतीक्षेत्रातून वळवून अन्य भागातून न्यावी, या मागणीसाठी सोमवार, दि. १२ रोजी सकाळी १० वाजता निफाड व दिंडोरी तालुक्यातील सर्व टॉवर लाइन बाधित शेतकऱ्यांनी सहकुटुंब अवनखेड येथील पडलेल्या टॉवरजवळ उपोषण सुरु केले आहे.सदर टॉवरच्या परिघात येणारे क्षेत्राची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे आमदार नरहरी झरिवाळ अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे यांनी सदर टॉवरचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे. तरी शासनाने त्विरत सर्व टॉवरचे कामाची तपासणी करावी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत न्यायिक तोडगा काढत शेतकऱ्यांना न्याय द्यावा असी मागणी केली. प्रांताधिकारी उदय किसवे यांनी आंदोलकांच्या भावना जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचिवल्या असून १४ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली आहे तरी आंदोलन मागे घ्यावे हि विनंती केली मात्र आंदोलकांनी विभागीय आयुक्त यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती बघावी व आम्हाला न्याय द्यावा असी मागणी केली. उपोषण सुरूच ठेवले यावेळी सदाशिव शेळके, रघुनाथ पाटिल, निलेश कतोरे, संतोष पुरकर, संजय निफाडे, दीपक देखमुख, अमोल दवंगे, रामभाऊ जाधव, राजेंद्र जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप पाटील आदी शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)