शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:11 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व परिसरात मृग नक्षत्रात तसेच त्यापूर्वी पडलेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या व लागवड उरकली ...

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व परिसरात मृग नक्षत्रात तसेच त्यापूर्वी पडलेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या व लागवड उरकली आहे. मात्र, सध्या पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्यामुळे पिकांचे उगवलेले कोवळे अंकुर कोमेजले असल्याचे चित्र आहे. येत्या चार ते पाच दिवसांत पाऊस पडला नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे असून चातकाप्रमाणे ते पावसाची वाट पाहत आहेत.

परिसरातील काही गावांमध्ये जूनच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. गेल्या महिनाभरापासून पाऊस गायब झाल्याने खरिपाचे नियोजन पुरते कोलमडले आहे. आर्द्रा नक्षत्रात नांदूरशिंगोटे येथे झालेल्या पावसावर शेतकऱ्यांंनी पेरणी केली. मात्र, पावसाने पुन्हा ओढ दिल्याने बळीराजा धास्तावला आहे. पुनर्वसू नक्षत्र सुरू होऊन चार दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही. हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु, दररोज पावसाचे वातावरण तयार होऊनसुद्धा पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे.

-------------------

पावसाची प्रतीक्षा

मानोरी, कणकोरी, सुरेगाव, मऱ्हळ, निऱ्हाळे तसेच नांदूरशिंगोटे परिसरातील काही भागांत पर्जन्यमान कमी असल्याने २५ ते ३० टक्के पेरण्या झाल्या असून काही भागांत अद्याप पेरण्या बाकी आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, बाजरी व मका या पिकांना प्राधान्य दिले जाते. पेरणीचा कालावधी जवळपास संपायला आला, तरी काही ठिकाणी पेरण्याच झालेल्या नाही. त्यामुळे बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.