शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:29 IST

नाशिक : नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले ...

नाशिक : नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले जाणार आहे. गेल्या मंगळवारी बंद पुकारण्यात आल्यानंतर सोमवारी (दि.१४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार आहेत, याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

दिल्लीत अजूनही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्ह्यात आंदोलने केेली जात असून, सोमवारी पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर होणाऱ्या आंदोलनांसारखेच नाशिक जिल्ह्यातही आंदोलन केले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे.

शेतकरीविरोधी तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी दिल्लीच्या भोवती हायवेवर ठिय्या मांडून बसले आहेत. या पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकऱ्यांनी १४ डिसेंबर रोजी संपूर्ण देशात जिल्हाधिकारी कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर निदर्शने, धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळी ११ ते ३ या वेळेत शिवाजी महाराज पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जिल्ह्यातील सर्व संघटनांनी घेतला आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन सामाजिक तसेच शेतकरी संघटनांकडून करण्यात आले आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी आपापल्या संघटनेचे बॅनर, झेंडे घेऊन यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. धरणे आंदोलनाच्या वेळी केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे, कामगार कायदे, वीज कायदा २०२०, नवे शैक्षणिक धोरण, बेरोजगारी याबाबत अनेक वक्ते मनोगत व्यक्त करणार आहेत.

पत्रकार परिषदेला माकपाचे डॉ. डी एल कराड, किसान सभा सुनील मालुसरे, काँग्रेसचे शरद आहेर, राष्ट्रवादी रंजन ठाकरे, भाकपचे राजू देसले, महादेव खुडे, शेकापचे ॲड. मनीष बस्ते, वंचित आघाडीचे वामनराव गायकवाड, बसपाचे अरुण काळे, राष्ट्र सेवा दलाचे नितीन मते, एनएपीएमचे अनिता पगारे, किरण मोहिते, रिपाइं कवाडे गटाचे शशिकांत उन्हवणे, अण्णासाहेब कटारे, छात्रभारतीचे समाधान बागुल, अजमल खान, विराज देवांग , सीताराम ठोंबरे नामदेव बोराडे असे आवाहन जनआंदोलन समन्वय समितीने केले आहे.