शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:29 IST

नाशिक : नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले ...

नाशिक : नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले जाणार आहे. गेल्या मंगळवारी बंद पुकारण्यात आल्यानंतर सोमवारी (दि.१४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार आहेत, याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

दिल्लीत अजूनही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्ह्यात आंदोलने केेली जात असून, सोमवारी पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर होणाऱ्या आंदोलनांसारखेच नाशिक जिल्ह्यातही आंदोलन केले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे.

शेतकरीविरोधी तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी दिल्लीच्या भोवती हायवेवर ठिय्या मांडून बसले आहेत. या पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकऱ्यांनी १४ डिसेंबर रोजी संपूर्ण देशात जिल्हाधिकारी कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर निदर्शने, धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळी ११ ते ३ या वेळेत शिवाजी महाराज पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जिल्ह्यातील सर्व संघटनांनी घेतला आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन सामाजिक तसेच शेतकरी संघटनांकडून करण्यात आले आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी आपापल्या संघटनेचे बॅनर, झेंडे घेऊन यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. धरणे आंदोलनाच्या वेळी केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे, कामगार कायदे, वीज कायदा २०२०, नवे शैक्षणिक धोरण, बेरोजगारी याबाबत अनेक वक्ते मनोगत व्यक्त करणार आहेत.

पत्रकार परिषदेला माकपाचे डॉ. डी एल कराड, किसान सभा सुनील मालुसरे, काँग्रेसचे शरद आहेर, राष्ट्रवादी रंजन ठाकरे, भाकपचे राजू देसले, महादेव खुडे, शेकापचे ॲड. मनीष बस्ते, वंचित आघाडीचे वामनराव गायकवाड, बसपाचे अरुण काळे, राष्ट्र सेवा दलाचे नितीन मते, एनएपीएमचे अनिता पगारे, किरण मोहिते, रिपाइं कवाडे गटाचे शशिकांत उन्हवणे, अण्णासाहेब कटारे, छात्रभारतीचे समाधान बागुल, अजमल खान, विराज देवांग , सीताराम ठोंबरे नामदेव बोराडे असे आवाहन जनआंदोलन समन्वय समितीने केले आहे.