शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांत पीकविमा कंपनीबाबत असमाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क न्यायडोंगरी : गेल्या खरीप हंगामात पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांकडून काढलेल्या पीकविम्याबाबत सांगितले तसे प्रत्यक्षात न केल्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

न्यायडोंगरी : गेल्या खरीप हंगामात पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांकडून काढलेल्या पीकविम्याबाबत सांगितले तसे प्रत्यक्षात न केल्यामुळे मोजक्या शेतकऱ्यांनाच अल्पप्रमाणात पीकविम्याचा लाभ मिळाल्याने असमाधान व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून खऱ्या अर्थाने शेतकरी पीकविम्याकडे वळला आहे. मागील वर्षी २०१९-२० मध्ये ४१ हजार शेतकऱ्यांनी, तर २०२०-२१ मध्ये १९ हजार शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला होता. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले, त्या वेळेस शासनाने लागलीच नुकसान झालेल्या पिकांची पहाणी करून रीतसर पंचनामे केले गेले. परंतु विमा कंपनीचे प्रतिनिधी ग्रामपालिका कार्यलयात आले. शेतकऱ्यांनी रितसर पंचनामा करण्याचा आग्रह धरला होता. परंतु त्यांनी काहीही हालचाल न करता केवळ कागदी घोडे नाचवले. कंपनीने दिलेला संपर्क नंबर लागत नाही, याशिवाय नांदगावसाठी प्रतिनिधी दिला आहे त्याचा तो नंबर असल्याचे कृषी अधिकारी कार्यालयाकडून सांगितले जायचे. अशावेळी नुकसानीचे गाऱ्हाणे मांडायचे कोणाकडे असा प्रश्न शेतकऱ्यांत निर्माण झाला आहे. विमा कंपनीने भरपाई देतानाही दुजाभाव केलेला आहे. एकाला विम्याचा लाभ दिला तर दुसऱ्याला डावलले. सन २०१९ ते २०२० या खरीप हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानीची शासन स्तरावरून कृषी खाते, महसूल खाते यांनी केलेले पंचनामे गाह्य धरून विमा कंपनीने नुकसानभरपाई भरून द्यावी, अशी मागणी होत आहे.

कोट...

पीकविम्यासंदर्भात अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरे देतात. पीकविम्यासंदर्भात गठित केलेली तालुकास्तरीय समिती शेतकऱ्यांना माहीत होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन सत्य लपविण्यात येते. यासाठी प्रत्येक गावाच्या तलाठी कार्यालयात सदर समितीच्या पदाधिकाऱ्यांची नावे व दूरध्वनी क्रमांक असलेला फलक दर्शनी भागात लावायला हवेत.

- जगन पाटील, प्रगतिशील शेतकरी, न्यायडोंगरी

नांदगाव तालुक्यासाठी सदर विमा कंपनीने नांदगाव येथे कार्यालय सुरू केले आहे. त्यासाठी एक तालुका प्रतिनिधी दिला आहे. विमाविषयी काही तक्रार असल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क न झाल्यास कृषी व महसूल विभागाकडे संपर्क साधावा.

- जगदीश पाटील, तालुका कृषी अधिकारी, नांदगाव