शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

कपाशी लागवडीस शेतकऱ्यांची नापसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:10 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. रोहिणी नक्षत्रात थोड्या फार प्रमाणात झालेल्या ...

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. रोहिणी नक्षत्रात थोड्या फार प्रमाणात झालेल्या पावसावर तांबट असलेल्या जमिनीत शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. परंतु या पेरणी केलेल्या पिकांना पावसाची नितांत गरज असून शेतकरी वर्ग सध्या मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडला आहे. दरम्यान, यंदा कपाशी पिकाकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. कपाशीला बोंडअळीने उत्पादन व खर्च यात ताळमेळ बसत नसल्याने कपाशी पिकाकडे पाठ फिरविल्याचे दिसते. त्याऐवजी मका पिकाला पसंती दर्शविली आहे.

शेतकऱ्यांनी महागड्या बी-बियाण्यांची पेरणी केली गेली आहे. राजापूरचा काही भाग हा तसाच पेरणीविना बाकी असल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यापूर्वी पेरणी केलेली पिके कोळपणीला आलेली आहेत. शेतकऱ्यांनीही मका पिकाला पसंती दिली आहे तर कपाशीकडे पाठ फिरविली आहे. बऱ्याची ठिकाणी काळ्या रानात शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र ओलेत्या अभावी या काळ्या रानातील पेरणी दुबार होणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ज्यांनी नशिबावर हवाला ठेवून पेरणी केली त्यांची पिके आता आता १५ दिवसांची झाली असून आता होणाऱ्या पेरण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत पडणार आहे. शेततळे असलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केली आहे. मृग नक्षत्र संपत आले तरी पाऊस झाला नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

इन्फो

नगदी पिकाकडे लक्ष केंद्रित

कपाशी पिकामुळे शेतात फक्त एकच पीक होते व त्याच शेतात मका लागवड केली तर शेत लवकर रिकामे होऊन तेथे रब्बीच्या हंगामातील पीक घेता येते. राजापूर व परिसरात मागे पाच ते दहा वर्षापूर्वी शेतकरी कपाशी पिकाकडे वळले होते. पण मागील दोन वर्षांपासून कपाशीवर बोंड अळी रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे व कपाशीचे उत्पादन घटत असल्याने शेतकऱ्यांनी कपाशी लागवड क्षेत्रात घट केली आहे. यंदा कोरोनामुळे आर्थिक गणित कोलमडल्यानेही शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे लक्ष वळवले आहे.

कोट.... यंदा खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी वर्गाने मका पिकाला पसंती दिली आहे. शेतकरी मका बियाणे खरेदी करताना दिसत आहेत. सध्या मका पिकाला खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा उपलब्ध होतो व उत्पन्न चांगले येते. कपाशी पिकाला औषधावर खर्च जास्त होतो व चारा होत नाही. खर्च जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे यावर्षी मका पिकाचे क्षेत्र वाढणार आहे.

- अशपाक सय्यद, कृषी दुकानदार, राजापूर

कोट.... राजापूर व परिसरातील शेतकऱ्यांचे कपाशी पीक हे अत्यंत महत्त्वाचे समजले जात होते. पण मागे सलग दोन वर्षापासून बोंड अळीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली आहे. राजापूर येथे काही पेरण्या झाल्या आहेत तर अजून निम्म्याहून अधिक पेरण्या बाकी आहेत. आधीच्या पेरण्यांची कोळपणी सुरू झाली आहे.

- समाधान आव्हाड, शेतकरी, राजापूर

फोटो- २१ राजापूर क्रॉप राजापूर येथे मका पिकाची सुरू असलेली कोळपणी.

===Photopath===

210621\0107561321nsk_10_21062021_13.jpg

===Caption===

फोटो- २१ राजापूर क्रॉप राजापूर येथे मका पिकाची सुरू असलेली कोळपणी.