शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कपाशी लागवडीस शेतकऱ्यांची नापसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:10 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. रोहिणी नक्षत्रात थोड्या फार प्रमाणात झालेल्या ...

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. रोहिणी नक्षत्रात थोड्या फार प्रमाणात झालेल्या पावसावर तांबट असलेल्या जमिनीत शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. परंतु या पेरणी केलेल्या पिकांना पावसाची नितांत गरज असून शेतकरी वर्ग सध्या मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडला आहे. दरम्यान, यंदा कपाशी पिकाकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. कपाशीला बोंडअळीने उत्पादन व खर्च यात ताळमेळ बसत नसल्याने कपाशी पिकाकडे पाठ फिरविल्याचे दिसते. त्याऐवजी मका पिकाला पसंती दर्शविली आहे.

शेतकऱ्यांनी महागड्या बी-बियाण्यांची पेरणी केली गेली आहे. राजापूरचा काही भाग हा तसाच पेरणीविना बाकी असल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यापूर्वी पेरणी केलेली पिके कोळपणीला आलेली आहेत. शेतकऱ्यांनीही मका पिकाला पसंती दिली आहे तर कपाशीकडे पाठ फिरविली आहे. बऱ्याची ठिकाणी काळ्या रानात शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र ओलेत्या अभावी या काळ्या रानातील पेरणी दुबार होणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ज्यांनी नशिबावर हवाला ठेवून पेरणी केली त्यांची पिके आता आता १५ दिवसांची झाली असून आता होणाऱ्या पेरण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत पडणार आहे. शेततळे असलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केली आहे. मृग नक्षत्र संपत आले तरी पाऊस झाला नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

इन्फो

नगदी पिकाकडे लक्ष केंद्रित

कपाशी पिकामुळे शेतात फक्त एकच पीक होते व त्याच शेतात मका लागवड केली तर शेत लवकर रिकामे होऊन तेथे रब्बीच्या हंगामातील पीक घेता येते. राजापूर व परिसरात मागे पाच ते दहा वर्षापूर्वी शेतकरी कपाशी पिकाकडे वळले होते. पण मागील दोन वर्षांपासून कपाशीवर बोंड अळी रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे व कपाशीचे उत्पादन घटत असल्याने शेतकऱ्यांनी कपाशी लागवड क्षेत्रात घट केली आहे. यंदा कोरोनामुळे आर्थिक गणित कोलमडल्यानेही शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे लक्ष वळवले आहे.

कोट.... यंदा खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी वर्गाने मका पिकाला पसंती दिली आहे. शेतकरी मका बियाणे खरेदी करताना दिसत आहेत. सध्या मका पिकाला खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा उपलब्ध होतो व उत्पन्न चांगले येते. कपाशी पिकाला औषधावर खर्च जास्त होतो व चारा होत नाही. खर्च जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे यावर्षी मका पिकाचे क्षेत्र वाढणार आहे.

- अशपाक सय्यद, कृषी दुकानदार, राजापूर

कोट.... राजापूर व परिसरातील शेतकऱ्यांचे कपाशी पीक हे अत्यंत महत्त्वाचे समजले जात होते. पण मागे सलग दोन वर्षापासून बोंड अळीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली आहे. राजापूर येथे काही पेरण्या झाल्या आहेत तर अजून निम्म्याहून अधिक पेरण्या बाकी आहेत. आधीच्या पेरण्यांची कोळपणी सुरू झाली आहे.

- समाधान आव्हाड, शेतकरी, राजापूर

फोटो- २१ राजापूर क्रॉप राजापूर येथे मका पिकाची सुरू असलेली कोळपणी.

===Photopath===

210621\0107561321nsk_10_21062021_13.jpg

===Caption===

फोटो- २१ राजापूर क्रॉप राजापूर येथे मका पिकाची सुरू असलेली कोळपणी.