शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

पीक विमा भरूनही शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:16 IST

नाशिक : खरीप हंगाम पीक विमा रक्कम भरूनही विमा कंपनीच्या मनमनी कारभारामुळे शेतकरी लाभापासून वंचित असल्याने शेतकऱ्यांना भरपाई मिळावी ...

नाशिक : खरीप हंगाम पीक विमा रक्कम भरूनही विमा कंपनीच्या मनमनी कारभारामुळे शेतकरी लाभापासून वंचित असल्याने शेतकऱ्यांना भरपाई मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. १७) आंदोलन केले. जिल्हाधिकारी मांढरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या कारभाराचा फटका बसला असून सातत्याने मागणी करूनही शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आले. यापूर्वी देखील पीक विमा कंपनीच्या मनमानीविरुद्ध तहसिल व तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले होते. मात्र अजूनही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, नांदगाव तालुक्यात ३० हजार शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पीक विमा रक्कम भरली होती. या हंगामात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये नुकसान भरपाई दिली होती. तर दुसरीकडे विमा कंपनीने फक्त ६ हजार शेतकऱ्यांना तुटपुंजी भरपाई दिली होती.

याच मागणीसाठी पीक विमा कंपनीच्या मनमानीविरुद्ध तहसील व तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले होते. मात्र अजूनही शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने नुकसान भरपाई दिलेली नाही. तरी आपण महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांनी भरलेल्या विमा रकमेनुसार भरपाई देणेबाबत आदेश देण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हा संघटक कॉ. विजय दराडे, संतोष बेदाडे, संजय हेंबाडे, कॉ. भास्करराव शिंदे, श्रावण विंचू आदी उपस्थित होते.

170921\17nsk_37_17092021_13.jpg

किसानसभा निदर्शने