शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

पीक विमा भरूनही शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:16 IST

नाशिक : खरीप हंगाम पीक विमा रक्कम भरूनही विमा कंपनीच्या मनमनी कारभारामुळे शेतकरी लाभापासून वंचित असल्याने शेतकऱ्यांना भरपाई मिळावी ...

नाशिक : खरीप हंगाम पीक विमा रक्कम भरूनही विमा कंपनीच्या मनमनी कारभारामुळे शेतकरी लाभापासून वंचित असल्याने शेतकऱ्यांना भरपाई मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. १७) आंदोलन केले. जिल्हाधिकारी मांढरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या कारभाराचा फटका बसला असून सातत्याने मागणी करूनही शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आले. यापूर्वी देखील पीक विमा कंपनीच्या मनमानीविरुद्ध तहसिल व तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले होते. मात्र अजूनही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, नांदगाव तालुक्यात ३० हजार शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पीक विमा रक्कम भरली होती. या हंगामात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये नुकसान भरपाई दिली होती. तर दुसरीकडे विमा कंपनीने फक्त ६ हजार शेतकऱ्यांना तुटपुंजी भरपाई दिली होती.

याच मागणीसाठी पीक विमा कंपनीच्या मनमानीविरुद्ध तहसील व तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले होते. मात्र अजूनही शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने नुकसान भरपाई दिलेली नाही. तरी आपण महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांनी भरलेल्या विमा रकमेनुसार भरपाई देणेबाबत आदेश देण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हा संघटक कॉ. विजय दराडे, संतोष बेदाडे, संजय हेंबाडे, कॉ. भास्करराव शिंदे, श्रावण विंचू आदी उपस्थित होते.

170921\17nsk_37_17092021_13.jpg

किसानसभा निदर्शने