शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

नुकसानभरपाईपासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 01:28 IST

मेशी : देवळा पूर्व भागातील मेशीसह डोंगरगाव परिसरात पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. सततच्या पावसाने आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांचे आगमन झाले होते. या भागाचे तिन्ही हंगामातील प्रमुख पीक कांदा आहे. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे कांदा रोपांची आणि पिकाचीही मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. या पार्श्वभूमीवर शेतकरी यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करून महसूल विभागाने भरपाई मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली होती.

ठळक मुद्देअनुदानापासून वंचित राहिले असल्याची शेतकऱ्यांची तक्रार

मेशी : देवळा पूर्व भागातील मेशीसह डोंगरगाव परिसरात पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. सततच्या पावसाने आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांचे आगमन झाले होते. या भागाचे तिन्ही हंगामातील प्रमुख पीक कांदा आहे. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे कांदा रोपांची आणि पिकाचीही मोठ्या प्रमाणात नासाडी झाली.

या पार्श्वभूमीवर शेतकरी यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करून महसूल विभागाने भरपाई मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने पाहणी न करता माहिती शासनाला पाठविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे बरेच लाभार्थी या अनुदानापासून वंचित राहिले असल्याची शेतकऱ्यांची तक्रार केली आहे.

डोंगरगाव येथील ७५०पैकी केवळ १५८ शेतकरी लाभार्थी ठरले आहेत. सलग पंचनामे करून प्रस्ताव पाठविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असताना सदर विभागाच्या अधिकारी यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. या भागातील शेतकरी पहिल्या अनुदानापासून अजूनही वंचित आहेत. शेजारच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वाटप होत असून, असा भेदभाव केला जात असल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.

डोंगरगाव सरपंच दयाराम सावंत, मेशीचे लोकप्रतिनिधी यांनी वारंवार मागणी करूनही संबंधित अधिकारी यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी