शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

शेतकरी कर्जमाफी हा संवेदनशील मुद्दा : पवार

By admin | Updated: April 3, 2017 02:07 IST

नाशिक : शेतकऱ्यांची कर्जमाफी संवेदनशील मुद्दा असून, त्याबाबत जनमत तयार होत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

 नाशिक : शेतकऱ्यांची कर्जमाफी संवेदनशील मुद्दा असून, त्याबाबत जनमत तयार होत आहे. कर्जमाफीसाठी संघर्ष सुरूच राहणार असून, संघर्ष यात्रेचा समारोप पनवेल येथे होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. मुरबाड येथील कार्यकर्ता मेळाव्याहून ते नाशकात दाखल झाले असून, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, शिवसेना आपल्या सोबत आल्यास स्वागतच करू, असेही पवार म्हणाले. हॉटेल एमराल्ड पार्क येथे रात्री शरद पवार यांचे मुक्कामासाठी आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना पवार म्हणाले, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर लढा सुरूच राहणार आहे. हा संवेदनशील मुद्दा आहे. या मुद्द्यावर जनजागृती करण्याची गरज होती. त्यानुसार ही यात्रा काढण्यात आली. ईव्हीएम मशीनमधील गोंधळाबाबत त्यांनी पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडणे चुकीचे असल्याचे सांगून निवडणुकीत आपला पक्ष प्रभावी ठरू शकला नसल्याचीही कबुली दिली. ईव्हीएम मशीनबाबत तक्रारी आल्या असल्या तरी त्यात तथ्य नसल्याचेही पवार म्हणाले. मात्र मध्य प्रदेश आणि दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी याबाबत आक्षेप नोंदविला असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहावे लागेल, असेही ते म्हणाले. प्रारंभी आमदार जयंत जाधव, हेमंत टकले, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार दिलीप बनकर, नाना महाले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष विजयश्री चुंबळे, सदस्य अमृता पवार, युवक कॉँगे्रसचे आकाश पगार यांनी त्यांचे स्वागत केले.