शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्यांनी पन्नाशी ओलांडली

By admin | Updated: June 22, 2017 00:50 IST

नाशिक : कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, गेल्या दोन दिवसांत चौघांनी मृत्यूला कवटाळल्याने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५२ च्या घरात पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, गेल्या दोन दिवसांत चौघांनी मृत्यूला कवटाळल्याने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५२ च्या घरात पोहोचली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना त्या रोखण्यासाठी मात्र कोणतीही उपाययोजना शासन व पर्यायाने जिल्हा प्रशासनाकडे नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.  बुधवारी सकाळी बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील हरिश्चंद्र संत अहिरे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले, तर चांदवड तालुक्यातील बोराळे येथील आप्पासाहेब खंडू जाधव (३२) या तरुण शेतकऱ्याने विजेचा प्रवाह सुरू असताना विजेच्या खांबाला हात लावून आत्महत्या केली आहे. तर मालेगाव तालुक्यातील वडनेर येथील सुपडू भीमा पवार (७७) या वृद्ध शेतकऱ्याने स्वत:ला पेटवून आत्महत्या केली. सुपडू पवार यांनी स्वत:ला पेटवून घेतल्यानंतर उपचारासाठी दाखल केले असताना त्यांचे निधन झाले. पवार यांच्या नावावर शेती नसली तरी पत्नी सुकाबाई हिच्या नावावर असलेल्या शेतीवर एक लाखाचे कर्ज आहे. त्याचप्रमाणे शिवरे येथील कचरू पुंजा अहेर (६५ ) यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडली.अहेर हे वयोवृद्ध व आजारी देखील होते मात्र ते अस्वस्थ झाल्याने त्यांना वणी(ता.दिंडोरी) येथील शासकीय रु ग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेश बागुल यांनी अहेर यांना मृत घोषित केले. त्यांनी विषारी औषध घेतल्याचे वडनेर भैरव पोलिसांना सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,सुना असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. लागोपाठच्या या आत्महत्यांनी जिल्ह्णात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५२ वर पोहोचली असून, यासंदर्भात तहसीलदारांकडून सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्णात जानेवारी महिन्यापासूनच कर्जबाजारीपणा व नापिकी तसेच मध्यंतरीच्या काळात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यास सुरुवात केली आहे. सरासरी ३० ते ४० या वयोगटातीलच शेतकरी आत्महत्येचा आत्मघाती निर्णय घेत आहेत. साधारणत: दर महिन्याला सात ते आठ घटना घडत असून, शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्नही फसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारकडून कर्जबाजारी शेतकऱ्यांचे कर्ज माफ होण्याची अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरल्यामुळेही आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. एक दिवसाचे वेतन देणारराज्यात शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा, मुलांना मदत म्हणून राज्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्यातील वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. बुधवारी यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने तसा आदेश जारी केला असून त्यात मंत्री, लोकप्रतिनिधी, राज्य व केंद्र सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन द्यावे, असे सुचविण्यात आले आहे. मात्र त्याची सक्ती नसेल, असेही आदेशात म्हटले आहे. दिंडोरीत आत्महत्या की घातपातदिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथील पिंटू सदा मोरे हे शेतकरी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह करंजवण शिवारात सापडला आहे. मोरे यांच्या नावावर पिंपरखेड सोसायटीचे कर्ज असून, कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज असला तरी मोरे यांचा घातपात झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. मोरे यांनी आत्महत्या केली असेल तर जिल्ह्णात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५३ च्या घरात पोहोचेल. दिंडोरीत आत्महत्या की घातपात? दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथील पिंटू सदा मोरे हे शेतकरी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह करंजवण शिवारात सापडला आहे. मोरे यांच्या नावावर पिंपरखेड सोसायटीचे कर्ज असून, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज असला तरी मोरे यांचा घातपात झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. मोरे यांनी आत्महत्या केली असेल तर जिल्ह्णात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५३ च्या घरात पोहोचेल. एक दिवसाचे वेतन देणारराज्यात शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा, मुलांना मदत म्हणून राज्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्यातील वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. बुधवारी यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने तसा आदेश जारी केला असून त्यात मंत्री, लोकप्रतिनिधी, राज्य व केंद्र सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन द्यावे, असे सुचविण्यात आले आहे. मात्र त्याची सक्ती नसेल, असेही आदेशात म्हटले आहे.