शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित

By admin | Updated: September 13, 2016 01:10 IST

पालखेड ओव्हरफ्लोचे पाणी : नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा

 येवला : पालखेड धरणाचे ओव्हरफ्लो पाणी येवला तालुक्याला मिळावे यासाठी सर्वपक्षीयांनी जिवाचे रान करून अखेर प्रशासनाला पाणी सोडण्यास भाग पाडले. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. जळगाव नेऊर येथील नदीकाठी असलेले सर्व बंधारे पाण्याने भरल्याने, पावसाअभावी खरीप पिके करपू लागल्याने या पाण्याने पिकांना जीवदान मिळेल व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागून जनावरांनाही पाणी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा जळगाव नेऊर येथील सर्वच शेतकऱ्यांना होती. परंतु नदी काठी असलेल्या शेतकरी वर्गाला या पाण्याने उभारी मिळाली असली तरी पालखेड डावा कालवा वितरीका क्रमांक २८ व २९ या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गाला पाण्याची मात्र प्रतिक्षाच करावी लागली.२८ व २९ चारी क्र मांकावर सुमारे प्रत्येकी १३०० ते १४०० हेक्टर क्षेत्र असुन चारीला पाणी सोडले असते तर सर्व क्षेत्र ओलिताखाली आले असते. शेतशिवारातील विहीरींना थोड्याफार प्रमाणात पाणी उतरले असते. विशेषत: वाडी वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागुन जनावरांना ही पाणी उपलब्ध झाले असते. कोमेजलेली पिके कशी बशी वाचवता आली असती. मात्र पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे नियोजन विस्कळीत झाल्याची प्रचिती जळगाव नेउर येथील शेतकरी वर्गाला आली. पालखेड डावा कालवा येथील लाभ क्षेत्रातील सर्वच वितरीकांना हेड टु टेल पाणी मिळणे आवश्यक होते. परंतु तसे न होता नदीकाठी असलेले बंधारे भरून देणे याचीच काळजी प्रशासनाकडुन घेण्यात आली. वितरीकांना पाणी न सोडल्याने वाडी वस्तीधारकांवर अन्याय झाल्याची भावना शेतकरी वर्गात आहे. (वार्ताहर)