शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : नवख्या आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

रस्त्यावरील धुळीने शेतकऱ्यांचे हाल पे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 11:24 PM

पिंपळगाव बसवंत : शिर्डी-सुरत या मुख्य महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असल्याने अंबिकानगर व वणी चौफुली येथील रस्त्याचे आणि नालीचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. उघड्या गटारीच्या सांडपाण्यात डासांची उत्पत्ती वाढली आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव : शिर्डी-सुरत महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पिंपळगाव बसवंत : शिर्डी-सुरत या मुख्य महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असल्याने अंबिकानगर व वणी चौफुली येथील रस्त्याचे आणि नालीचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. उघड्या गटारीच्या सांडपाण्यात डासांची उत्पत्ती वाढली आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.पिंपळगाव बसवंत परिसरातील वणी चौफुली, मुखेड फाटा आणि अंतरवेली फाटा या ठिकाणी सतत अपघात घडतात. या ठिकाणच्या रस्त्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे अपघाताबरोबर शेतमालाचेही नुकसान होत आहे. सततच्या उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. देवी मंदिर परिसरातील वस्तीलगत भूमिगत नाल्यासाठी ५ फुटाच्या अधिक खोल नाली गेल्या दोन-तीन महिन्यांपासून खोदून ठेवल्या आहेत. गटारीत डासांची उत्पत्ती वाढली असून, डेंग्यूसारखे साथरोग बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे व नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. (०२ पिंपळगाव २)............................................................................द्राक्ष उत्पादक हवालदिल....परिसरात रस्त्याचे व गटार नालीचे काम अपूर्ण असल्यामुळे धुळीचे व घाणीचे साम्राज्य वाढले आहे. परिसरातील द्राक्षबागांवर उडणाऱ्या मातीचा धर बसला आहे. त्यामुळे द्राक्ष पिकांना मोठा फटका बसणार असल्याने शेतकरीवर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.गटाराची नाली ठरतेय जीवघेणीवस्तीलगत असलेले गटारबांधणीसाठी अतिक्रमण काढून तीन महिने झाले. पावसात सांडपाण्याचा त्रास नागरिकांनी सहन केला, मात्र आता त्याच सांडपाण्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, कोरोनाबरोबरच डेंग्यूसारख्या आजाराला आमंत्रण मिळत आहे.नालीसाठी आणलेले पाइपदेखील ठेकेदार परत घेऊन जात असल्याने नागरिकांना कडून नाराजी व्यक्त केली जात आहे .कासव गतीच्या कामामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनाबरोबरच डेंग्यूसारख्या आजाराने थैमान घातले आहे. शहरातून गेलेल्या रस्त्याचे काम जलद गतीने करावे, अन्यथा जनआंदोलन छेडून रस्ता रोको केला जाईल. प्रशासनाचा निषेध नोंदविला जाईल.दत्तू झनकर, उलगुलान सेनाकोरोनामुळे रस्ताचे काम रखडले होते, आता काम सुरू झाले आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण केले जाईल.-माणिक गाडे, रस्ते इंजिनिअर, शिर्डी-सुरत मार्ग

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाDust stormधुळीचे वादळ