शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

शेतकरी दुहेरी संकटात

By admin | Updated: September 20, 2015 22:18 IST

संततधार : देशमानेत शेततळे गेले वाहून; जायखेड्यात घराची भिंत कोसळली

देशमाने : गेल्या दोन दिवसांत झालेल्या उत्तरा नक्षत्राच्या पावसाने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण असले तरी काही शेतकऱ्यांवर नुकसानीने दुहेरी संकट ओढवले आहे. शुक्रवारी झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडून गेल्याने काही शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे.परिसरात साडेतीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर झालेला जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले. देशमाने (बु) येथील यशवंत जगताप यांच्या शेतातील शेततळे वाहून गेले. सुरेश दुघड यांची विहीर जमीनदोस्त झाली. सुनील विठ्ठल शेळके यांचे चार एकर कांद्याचे मोठे नुकसान झाले. गोरख शिंदे व परिसरातील शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून बांधलेला रस्ता पावसामुळे वाहून गेला. मानोरी (बु) येथील शिवाजी नारायण शेळके यांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले. गोई नदीवरील देशमाने गावनजीक शिवकालीन, संपूर्ण ग्रामीण योजनेंतर्गत साठवण बंधाऱ्याचे भरावे खचले.जायखेडा : जायखेडा व परिसरासह संपूर्ण मोसम खोऱ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. काही महिन्यांपासून दुष्काळाच्या तीव्र झळा या भागातील शेतकऱ्यांना सोसाव्या लागत होत्या. पावसाअभावी शेती व्यवसाय पूर्ण अडचणीत आल्याने शेतकरी वर्ग पुरता हवालदिल झाला होता. पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना या भागातील नागरिकांना करावा लागत होता. सुदैवाने गुरुवारी गणेश चतुर्थीच्या मध्यरात्रीपासून परतीच्या पावसाने जोरदार आगमन केल्याने शेतकरी सुखावला आहे. शनिवार व रविवारी कमीअधिक प्रमाणात पावसाची रिपरिप सुरुच होती. परतीच्या पावसाने पिकं हाती येणार नसली तरी जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. रब्बीपिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरला आहे. गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसाने एकीकडे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अनेक जणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात शेतपिकांबरोबरच अनेक घरांची पडझड झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जायखेडा येथील हनुमान चौकात राहणाऱ्या अनुसयाबाई पोपटराव खैरनार यांचे राहत्या घराचे छत कोसळल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने त्यांच्या कुंटुबीयांनी जोरदार पावसाचा अंदाज घेऊन दुसरीकडे आश्रय घेतल्याने मोठा अनर्थ टळला. न्यु प्लॉट येथे राहणारे अपंग गृहस्थ साईनाथ नहिरे यांचे राहत्या घराची भिंत कोसळली. यावेळी नहिरे हे भितींला टेकून बसलेले होते, मात्र भिंत विरूद्ध दिशेला पडल्याने जीवितहानी टळली. त्याचबरोबर जायखेडा व परिसरातील अनेक घरांची कमीअधिक प्रमाणात पडझड झाली आहे.नदीकाठावरील व परिसरातील सर्वच गावांमध्ये काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. अनेक वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक दिवसाआड एकच वेळ पिण्याचे पाणी उपलब्ध होत होते. शुक्रवारच्या पावसाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. हरणबारी धरण ओव्हरफ्लो होऊन पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (लोकमत चमू)