शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी दुहेरी संकटात

By admin | Updated: September 20, 2015 22:18 IST

संततधार : देशमानेत शेततळे गेले वाहून; जायखेड्यात घराची भिंत कोसळली

देशमाने : गेल्या दोन दिवसांत झालेल्या उत्तरा नक्षत्राच्या पावसाने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण असले तरी काही शेतकऱ्यांवर नुकसानीने दुहेरी संकट ओढवले आहे. शुक्रवारी झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडून गेल्याने काही शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे.परिसरात साडेतीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर झालेला जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले. देशमाने (बु) येथील यशवंत जगताप यांच्या शेतातील शेततळे वाहून गेले. सुरेश दुघड यांची विहीर जमीनदोस्त झाली. सुनील विठ्ठल शेळके यांचे चार एकर कांद्याचे मोठे नुकसान झाले. गोरख शिंदे व परिसरातील शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून बांधलेला रस्ता पावसामुळे वाहून गेला. मानोरी (बु) येथील शिवाजी नारायण शेळके यांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले. गोई नदीवरील देशमाने गावनजीक शिवकालीन, संपूर्ण ग्रामीण योजनेंतर्गत साठवण बंधाऱ्याचे भरावे खचले.जायखेडा : जायखेडा व परिसरासह संपूर्ण मोसम खोऱ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. काही महिन्यांपासून दुष्काळाच्या तीव्र झळा या भागातील शेतकऱ्यांना सोसाव्या लागत होत्या. पावसाअभावी शेती व्यवसाय पूर्ण अडचणीत आल्याने शेतकरी वर्ग पुरता हवालदिल झाला होता. पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना या भागातील नागरिकांना करावा लागत होता. सुदैवाने गुरुवारी गणेश चतुर्थीच्या मध्यरात्रीपासून परतीच्या पावसाने जोरदार आगमन केल्याने शेतकरी सुखावला आहे. शनिवार व रविवारी कमीअधिक प्रमाणात पावसाची रिपरिप सुरुच होती. परतीच्या पावसाने पिकं हाती येणार नसली तरी जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. रब्बीपिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरला आहे. गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसाने एकीकडे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अनेक जणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात शेतपिकांबरोबरच अनेक घरांची पडझड झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जायखेडा येथील हनुमान चौकात राहणाऱ्या अनुसयाबाई पोपटराव खैरनार यांचे राहत्या घराचे छत कोसळल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने त्यांच्या कुंटुबीयांनी जोरदार पावसाचा अंदाज घेऊन दुसरीकडे आश्रय घेतल्याने मोठा अनर्थ टळला. न्यु प्लॉट येथे राहणारे अपंग गृहस्थ साईनाथ नहिरे यांचे राहत्या घराची भिंत कोसळली. यावेळी नहिरे हे भितींला टेकून बसलेले होते, मात्र भिंत विरूद्ध दिशेला पडल्याने जीवितहानी टळली. त्याचबरोबर जायखेडा व परिसरातील अनेक घरांची कमीअधिक प्रमाणात पडझड झाली आहे.नदीकाठावरील व परिसरातील सर्वच गावांमध्ये काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. अनेक वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक दिवसाआड एकच वेळ पिण्याचे पाणी उपलब्ध होत होते. शुक्रवारच्या पावसाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. हरणबारी धरण ओव्हरफ्लो होऊन पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (लोकमत चमू)