शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

पैसे मिळत नसल्याने शेतकरी संतप्त

By admin | Updated: March 26, 2017 22:24 IST

पिळकोस : शेतकऱ्यांच्या विकलेल्या शेतमालाचे पैसे व्यापारी धनादेश स्वरूपात देत असल्याने दिलेले धनादेश हे एक दोन महिने होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात संपडला आहे

पिळकोस : शेतकऱ्यांच्या विकलेल्या शेतमालाचे पैसे व्यापारी धनादेश स्वरूपात देत असल्याने दिलेले धनादेश हे एक दोन महिने होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात संपडला आहे. कळवण तालुक्यातील शेतकरी चेक पद्धतीला पूर्णत: जेरीस आले आहे.  तीन-तीन महिने धनादेश न वटल्याने ते ‘बाउन्स’ होण्याचे प्रकार वाढले आहेत. मंगलाबाई दिलीप शेवाळे यांनी कळवण बाजार समितीत कांदा विक्री केली असता त्यांना व्यापाऱ्यांकडून देण्यात आलेला चेक वटला नाही. तर जिभाऊ कडू काकुळते यांनी चार ट्रॅक्टर कांदा विक्र ी केली असून, दोन महिने होऊनही त्यांची साठ हजार तीनशे पंचावन्न ही रक्कम त्यांच्या बॅँक खात्यात जमा झाली नाही. शेतकऱ्यांना त्याचे कांदा विक्र ी केल्याचे पैसे पदरी पाडण्यासाठी बॅँक व व्यापाऱ्यांच्या आडतीत फेऱ्या मारूनही पैसे मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. विक्र ी केलेल्या शेतमालाचे पैसे हे व्यापाऱ्यांकडून आरटीजीएस करून मिळावेत, अशी मागणी होत आहे. बॅँकेत धनादेश जमा करून दोन महिने उलटूनही खात्यात पैसे जमा होत नसल्याने शेतकरी पूर्णत: कोंडीत सापडला आहे. यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण पूर्णपणे ठप्प झाले आहे. शेतकरी नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्व बाजूंनी कोंडीत सापडला गेला आहे. पिळकोस, खामखेडा, विसापूर, बेज, बगडू, भादवण, बिजोरे, चाचेर यांसह परिसरातील शेतकरी बांधव आपला कांदा, मका, गहू व भुसार माल हा कळवण बाजार समितीत विक्री करत आहे. या बाजार समितीतील व्यापारी शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे रक्कम दिली जाते. यातील बहुतेक शेतकऱ्यांचे धनादेश वटत नसल्याची तक्रार आहे. व्यापाऱ्यांकडून मिळालेले धनादेश बॅँकेत जमा करूनही एक ते दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही धनादेशाची रक्कम खात्यात जमा होत नसून शेतकऱ्यांना बॅँकेच्या खेट्या खाव्या लागत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, तो आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाचे पैसे देताना व्यापाऱ्यांनी कॅशलेस पद्धतीचा अवलंब करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. अन्यथा शेतकऱ्याला शेतमाल विकूनही एक-दोन महिन्यांसाठी सावकाराच्या दारात जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याचे चित्र परिसरात दोन महिन्यांपासून पहावयास मिळत आहे. नोटाबंदीमुळे शेतमाल कमी भावात खरेदी करतात. दुसरीकडे शेतकऱ्याला धनादेश देतात यामुळे शेतकऱ्याच्या हातात पैसे येण्यास एक दोन महिन्यांचा कालावधी जात असल्याने शेतीचे नियोजन चुकल्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पुढील उत्पादनावर याचा परिणाम झालेला दिसून येत असून, सर्व बाजूंनी शेतकऱ्याची कोंडी झालेली आहे. शेतीसाठी औषधे, खते खरेदी करताना शेतकऱ्याला दुकानदारांना आरटीजीएस करून पैसे द्यावे लागत आहे; मात्र बाजार समितीतील व्यापारी शेतकऱ्यांना सरसकट धनादेश देत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पैसे देण्याची आरटीजीएस ही सोपी पद्धत असतानादेखील व्यापारी हे शेतकऱ्यांना धनादेश देत आहेत. एक एप्रिलनंतर शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून चेक स्वीकारू नयेत तसेच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याच्या मालाची रक्कम उपलब्ध करून द्यावी. कळवण बाजार समितीच्या संचालक मंडळ व अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना पाठीशी न घालता शेतकऱ्यांचे पैसे हे व्यापाऱ्यांकडून देण्यासाठी आग्रह करावा अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा माकपाचे कळवण बाजार समितीचे संचालक मोहन जाधव, उत्तम मोरे, अशोक जाधव, ललित वाघ, अभिजित वाघ, पंकज जाधव यांसह तालुक्यातील शेतकरी बांधवांनी दिला आहे. (वार्ताहर)