शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पैसे मिळत नसल्याने शेतकरी संतप्त

By admin | Updated: March 26, 2017 22:24 IST

पिळकोस : शेतकऱ्यांच्या विकलेल्या शेतमालाचे पैसे व्यापारी धनादेश स्वरूपात देत असल्याने दिलेले धनादेश हे एक दोन महिने होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात संपडला आहे

पिळकोस : शेतकऱ्यांच्या विकलेल्या शेतमालाचे पैसे व्यापारी धनादेश स्वरूपात देत असल्याने दिलेले धनादेश हे एक दोन महिने होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात संपडला आहे. कळवण तालुक्यातील शेतकरी चेक पद्धतीला पूर्णत: जेरीस आले आहे.  तीन-तीन महिने धनादेश न वटल्याने ते ‘बाउन्स’ होण्याचे प्रकार वाढले आहेत. मंगलाबाई दिलीप शेवाळे यांनी कळवण बाजार समितीत कांदा विक्री केली असता त्यांना व्यापाऱ्यांकडून देण्यात आलेला चेक वटला नाही. तर जिभाऊ कडू काकुळते यांनी चार ट्रॅक्टर कांदा विक्र ी केली असून, दोन महिने होऊनही त्यांची साठ हजार तीनशे पंचावन्न ही रक्कम त्यांच्या बॅँक खात्यात जमा झाली नाही. शेतकऱ्यांना त्याचे कांदा विक्र ी केल्याचे पैसे पदरी पाडण्यासाठी बॅँक व व्यापाऱ्यांच्या आडतीत फेऱ्या मारूनही पैसे मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. विक्र ी केलेल्या शेतमालाचे पैसे हे व्यापाऱ्यांकडून आरटीजीएस करून मिळावेत, अशी मागणी होत आहे. बॅँकेत धनादेश जमा करून दोन महिने उलटूनही खात्यात पैसे जमा होत नसल्याने शेतकरी पूर्णत: कोंडीत सापडला आहे. यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण पूर्णपणे ठप्प झाले आहे. शेतकरी नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्व बाजूंनी कोंडीत सापडला गेला आहे. पिळकोस, खामखेडा, विसापूर, बेज, बगडू, भादवण, बिजोरे, चाचेर यांसह परिसरातील शेतकरी बांधव आपला कांदा, मका, गहू व भुसार माल हा कळवण बाजार समितीत विक्री करत आहे. या बाजार समितीतील व्यापारी शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे रक्कम दिली जाते. यातील बहुतेक शेतकऱ्यांचे धनादेश वटत नसल्याची तक्रार आहे. व्यापाऱ्यांकडून मिळालेले धनादेश बॅँकेत जमा करूनही एक ते दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही धनादेशाची रक्कम खात्यात जमा होत नसून शेतकऱ्यांना बॅँकेच्या खेट्या खाव्या लागत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, तो आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाचे पैसे देताना व्यापाऱ्यांनी कॅशलेस पद्धतीचा अवलंब करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. अन्यथा शेतकऱ्याला शेतमाल विकूनही एक-दोन महिन्यांसाठी सावकाराच्या दारात जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याचे चित्र परिसरात दोन महिन्यांपासून पहावयास मिळत आहे. नोटाबंदीमुळे शेतमाल कमी भावात खरेदी करतात. दुसरीकडे शेतकऱ्याला धनादेश देतात यामुळे शेतकऱ्याच्या हातात पैसे येण्यास एक दोन महिन्यांचा कालावधी जात असल्याने शेतीचे नियोजन चुकल्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पुढील उत्पादनावर याचा परिणाम झालेला दिसून येत असून, सर्व बाजूंनी शेतकऱ्याची कोंडी झालेली आहे. शेतीसाठी औषधे, खते खरेदी करताना शेतकऱ्याला दुकानदारांना आरटीजीएस करून पैसे द्यावे लागत आहे; मात्र बाजार समितीतील व्यापारी शेतकऱ्यांना सरसकट धनादेश देत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पैसे देण्याची आरटीजीएस ही सोपी पद्धत असतानादेखील व्यापारी हे शेतकऱ्यांना धनादेश देत आहेत. एक एप्रिलनंतर शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून चेक स्वीकारू नयेत तसेच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याच्या मालाची रक्कम उपलब्ध करून द्यावी. कळवण बाजार समितीच्या संचालक मंडळ व अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना पाठीशी न घालता शेतकऱ्यांचे पैसे हे व्यापाऱ्यांकडून देण्यासाठी आग्रह करावा अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा माकपाचे कळवण बाजार समितीचे संचालक मोहन जाधव, उत्तम मोरे, अशोक जाधव, ललित वाघ, अभिजित वाघ, पंकज जाधव यांसह तालुक्यातील शेतकरी बांधवांनी दिला आहे. (वार्ताहर)