शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

हवामान बदलाने शेतकरी चिंतातुर

By admin | Updated: January 17, 2017 22:48 IST

वातावरण : ढग, धुक्यामुळे पिकांवर प्रादुर्भाव

खामखेडा : गेल्या चार - पाच दिवसांपासून अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ व धुक्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा, गहू, हरभरा आदि पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. आतापर्यंत पिकांसाठी पोषक वातावरण असल्याने पिकेही जोमात आहेत. आता शेतकऱ्यांचे पुढील सर्व आर्थिक गणित हे रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा, गहू, हरभरा आदि पिकांवर अवलंबून आहे. कारण चालूवर्षी कोबी, टमाटे, लाल कांदा आदि पिकांना बाजारभाव न मिळाल्यामुळे कवडीमोल भावाने माल विकावा लागल्याने पिकांसाठी झालेला खर्चही भरून निघाला नाही. तेव्हा शेतकऱ्याने मोठ्या अपेक्षेने रब्बी पिकांची लागवड केली आहे. या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर मावा व करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, तर हरभरा पिकावर या धुके व ढगाळ वातावरणामुळे आळी पडण्याची शक्यता शेतकरीवर्गातून वर्तविण्यात येत आहे.  गेल्या वर्षी उन्हाळी कांद्यास भाव न मिळाल्यामुळे व विहिरींना पाणी असल्याने गव्हाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सध्या गव्हाचे पीकही जोमात आहे. परंतु या ढगाळ वातावरणामुळे गव्हाच्या पिकावर ताबोरा रोगाचा प्रादुर्भाव होऊन गव्हाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. (वार्ताहर)