शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

हवामान बदलाने शेतकरी चिंतातुर

By admin | Updated: January 17, 2017 22:48 IST

वातावरण : ढग, धुक्यामुळे पिकांवर प्रादुर्भाव

खामखेडा : गेल्या चार - पाच दिवसांपासून अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ व धुक्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा, गहू, हरभरा आदि पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. आतापर्यंत पिकांसाठी पोषक वातावरण असल्याने पिकेही जोमात आहेत. आता शेतकऱ्यांचे पुढील सर्व आर्थिक गणित हे रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा, गहू, हरभरा आदि पिकांवर अवलंबून आहे. कारण चालूवर्षी कोबी, टमाटे, लाल कांदा आदि पिकांना बाजारभाव न मिळाल्यामुळे कवडीमोल भावाने माल विकावा लागल्याने पिकांसाठी झालेला खर्चही भरून निघाला नाही. तेव्हा शेतकऱ्याने मोठ्या अपेक्षेने रब्बी पिकांची लागवड केली आहे. या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर मावा व करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, तर हरभरा पिकावर या धुके व ढगाळ वातावरणामुळे आळी पडण्याची शक्यता शेतकरीवर्गातून वर्तविण्यात येत आहे.  गेल्या वर्षी उन्हाळी कांद्यास भाव न मिळाल्यामुळे व विहिरींना पाणी असल्याने गव्हाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सध्या गव्हाचे पीकही जोमात आहे. परंतु या ढगाळ वातावरणामुळे गव्हाच्या पिकावर ताबोरा रोगाचा प्रादुर्भाव होऊन गव्हाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. (वार्ताहर)