ममदापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांपासून या परिसरात भयानक दुष्काळ, तसेच कुठल्याही परिस्थितीत पाटाचे, पाटचारीचे पाणी नाही, एकही मोठे धरण नाही मग या परिसरात महादेव जानकर यांनी वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यात शेतकऱ्यांना शंभर टन कोरडा चारा, पाचशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पाण्याच्या टाक्या, येवला तालुक्यातील आत्महत्त्याग्रस्त कुटुंबातील सदस्याचा अकरा हजारांचा धनादेश वाटप केला. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तुकाराम दिघोळे होते. यावेळी आमदार राहुल कुल, सचिन अलगट, कुणाल दराडे, पोपटराव आव्हाड, लक्ष्मण घुगे, शंकर अलगट, बाबूराव वाघ, शंकर मगर, दत्तात्रय सानप व्यासपीठावर उपस्थित होते.येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर, खरवंडी, देवदरी, रहाडी, कोळगाव, सोमठाण जोश हा परिसर डोंगरावर असून, या परिसरात गेल्या तीन-चार वर्षांपूर्वीपासून कायमचा दुष्काळ त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आम्ही सगळे शेतकरी एकत्र येऊन पंचवीस वर्षांपूर्वी फुललेला वडपाटीचा बंधारा लोकसहभागातून, श्रमदान करून दहा ते बारा दिवसांत पूर्ण केला. परंतु आणखी ममदापूर येथील मेळाचा बंधारा व देवदरी येथील देवनाचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर या भागातील दुष्काळाची दाहकता कमी होईल. त्यासाठी आम्ही तुमच्यामार्फत पंकजा मुंडे यांच्याकडून काम मार्गी लावण्यासाठी मदत करावी, अशी मागणी केली. कार्यक्र माचे आयोजन सचिन अलगट यांनी केले होते. सूत्रसंचालन लक्ष्मण घुगे यांनी केले. (वार्ताहर)५६७ शौचालयांचे काम पूर्णनांदगाव : शहर हद्दीत स्वच्छता अभियानांतर्गत शौचालये बांधण्याचा ६५० चा इष्टांक पूर्ण करताना ५६७ शौचालये बांधण्यात आली. प्रत्येक शौचालयाला शासकीय १२ हजार रुपये व नगरपालिकेने प्रोत्साहनासाठी ५००० अनुदानही दिले. मात्र या शौचालयांचा उपयोग पाण्याअभावी होत नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे. १७ ते २० दिवसांनी पाण्याचे आवर्तन येत असल्याने प्यायलादेखील जारमधले पाणी आणावे लागते. दोन आठवडे पुरेल एवढे पाणी साठवण्याची क्षमता नसल्याने शौचालये वापराविना पडली आहेत. (वार्ताहर)
राजापूर येथे शेतकरी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 01:25 IST