शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

शेतकरी नवरा नको गं बाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:14 IST

शेती व्यवसाय अनिश्चीत झाला असल्याने शेतकरी मुलांना फार मागणी नसते असे नाशिकमधील वधू वर सूचक मंडळाच्या सूत्रांनी सांगितले. शेतकरी ...

शेती व्यवसाय अनिश्चीत झाला असल्याने शेतकरी मुलांना फार मागणी नसते असे नाशिकमधील वधू वर सूचक मंडळाच्या सूत्रांनी सांगितले. शेतकरी कुटूंबातील मुलगी असेल तर मुलगा शेतकरी असल्यास हरकत नाही परंतु त्याच्या वाटेला येणारी एकुण जमिन आणि शेती बागायती आहे की शेतकरी अशी माहिती घेतली जाते. अन्य मुलींच्या अपेक्षाही बदलत चालल्या आहेत. कोरोना संकट काळात पगार कमी होणे किंवा राेजगार कमी होणे याचा विचार करून आता मुलाची एकंदर सांपत्तीक स्थिती देखील विचारात घेतली जाते. शासकीय सेवेत मुलगा असेल तर प्राधान्य पण खासगी ठिकाणी नोकरी असेल तर त्याचे पॅकेज देखील बघितले जाते. त्यातही मुलाच्या आई वडीलांची जबाबदारी नको असल्याने मुंबई- पुण्यात नोकरी असलेल्यांना देखील प्राधान्य दिले जाते.

कोट...

कोरोना काळातील रोजगाराचे संकट लक्षात घेता सध्या मुलांच्या सांपत्तीक स्थितीला महत्व आले आहे. म्हणजे मुलाची नोकरी संकटात आलीच तर पर्यायी व्यवस्था काय हे देखील बघितले जाते. म्हणजेच आर्थिक स्थैर्याला महत्व आले आहे. शेतकरी मुलांना मुलीच मिळत नाही इतके टोकाचे अनुभव मात्र नाही.

- नरेंद्र धारणे, ओम तदेव विवाह संस्था

कोट..

शेतकरी घरातील मुली शिकलेल्या असल्याने त्या जोडीदाराविषयी सजग आहेत. शेती असेल तरी सर्व बाबींचा विचार केला जातो. त्याची माहिती घेतली जाते. वराकडील कुटूंबाने शेती वाडीची जी माहिती दिली.

- संजय लोळगे, अनुपम शादी डॉट कॉम

कोट...

शेतकरी मुलांना अपेक्षीत स्थळे मिळत नाहीत. शेतकऱ्यांच्या मुली देखील शेती करणाऱ्यांना प्राधान्य दिले जात नाही. नेाकरदार मुले असले तरी क्लास वन- क्लास टु शासकीय अधिकारी असलेल्या मुलांना प्राधान्य देतात. मुलांना आई वडील असेल तर मुले मुंबई पुण्यात असावीत अशी ही अपेक्षा असते.

- हेमंत पगार, मराठा शुभ लग्न डॉट कॉम

इन्फो...

सर्वाधिक मागणी नोकरदारांना

शेतीच्या तुलनेत स्थायी नेाकरी हा मुलींच्या दृष्टीने अधिक सुरक्षीतेचा भाग असल्याने नोकरदार मुलांना प्राधान्य असते. डॉक्टर, वकील किंवा तत्सम मुलांपेक्षा शासकीय नोकरी करणाऱ्यांना प्राधान्य असते.

नोकरी करतानाही आयटी क्षेत्रातील असेल तर अधिक चांगले. मुलगी आयटी क्षेत्रातील असेल मुलगाही त्याच क्षेत्रातील असावा ही प्रमुख अट असते.

नोकरी जर अस्थायी असेल किंवा फार खात्रीशीर नसेल तर नोकरदार मुलाची सांपत्तीक स्थिती देखील बघितली जाते.

इन्फोे...

या अटी मान्य असेल तर बोला..

मुला मुलींचा कल बदलत चालला आहे. मुलींकडून आर्थिक दृष्ट्या स्थिरता हा महत्वाचा मुद्दा असून त्यामुळेच शेती करणाऱ्यांना दुय्यम स्थान मिळते. मुलीचे वडील शेतकरी असेल तरी ते आप्तेष्टांपैकी शेतकरी मुलाला प्राधान्य देत नाही. शेती बागायती असेल तर बेाला असेही सांगितले जाते. नोकरदार मुलगा असेल तर त्याचे पॅकेज पन्नास ते साठ हजार हवेत. नेाकरीसाठी वेळेची मर्यादा हवी अशी अपेक्षा असते. मुलांवर अतिरीक्त जबाबदाऱ्या नको, स्वत:च्या मालकीचे घर हवेत अशाही अपेक्षा आहेत.