शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

पावसाअभावी पेरण्या लांबणीवर राजापूर परिसरातील शेतकरी चितांतूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:06 IST

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे अजून वरून राजा चे आगमन झाले नसल्याने राजापूर येथे पेरण्या लांबल्याने शेतकरी वर्ग धास्तावले आहे. रोहिणी व मृग नक्षत्र हे कोरडेच गेले आहे. व आता आदा नक्षञ लागले असून कधी वरून राजा हजेरी लावेल या चिंतेने शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले आहे.

ठळक मुद्देनक्षत्राचे काही दिवस हे कोरडे ठाक जाताना दिसत आहे.

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे अजून वरून राजा चे आगमन झाले नसल्याने राजापूर येथे पेरण्या लांबल्याने शेतकरी वर्ग धास्तावले आहे. रोहिणी व मृग नक्षत्र हे कोरडेच गेले आहे. व आता आदा नक्षञ लागले असून कधी वरून राजा हजेरी लावेल या चिंतेने शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले आहे.राजापूर येथे मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती भयानक असताना यावर्षी अजूनही पावसाने दडी मारल्याने पेरण्या पावसाअभावी खोळंबून पडल्या आहे. राजापूर सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांना चारा या चिंतेने जनता हैराण झाली आहे. त्यामुळे खरिप हंगामातील पेरण्या करण्यासाठी पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. यावर्षी बियाणे खते औषधे विक्रेत्यांकडे शांतता आहे.त्यामुळे बळीराजासह व्यापारी शेतमजूर नोकरदार वर्ग यांच्या नजरा वरूणराजाच्या आगमनाकडे लागून आहेत. मात्र खरिप हंगामासाठी पावसाची नितांत आवश्यकता असल्याने या पावसाच्या आगमनकडे बळीराजाच्या नजरा लागून आहेत. शुक्र वारी मृग नक्षत्र संपले आणि शनिवारी आदा नक्षत्रास सुरवात झाली आहे. परंतु आद्रा नक्षत्राचे काही दिवस हे कोरडे ठाक जाताना दिसत आहे.आकाशात ढग दाटून येतात तोच वारा सुटून ढग कूठच्या कूठे वाहून जातात. त्यामुळे बळीराजाच्या आशेची निराशा होते. गेल्या वर्षी राजापूर परिसराती जून महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू आहेत.या गावाला कितीही पाऊस झाला तरी दरवर्षी उन्हाळ्याच्या चार महिने हे या गावाला टॅँकरद्वारेच तहान भागवावी लागते. पण मागच्या वर्षी शेतकरी वर्गाने केलेला खर्चही वसूल झालेला नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहत्ेत. काही वर्षापुर्वी एप्रिल आणि मे महिन्यात वळीव हमखास बरसायचा त्यामुळे मृगाच्या पावसावर पेरण्या उरकल्या जायच्या, मात्र निसर्गाच्या वातावरणातील बदलामुळे हे सारे चित्र पालटले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतीत आहे.