शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पावसाअभावी पेरण्या लांबणीवर राजापूर परिसरातील शेतकरी चितांतूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:06 IST

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे अजून वरून राजा चे आगमन झाले नसल्याने राजापूर येथे पेरण्या लांबल्याने शेतकरी वर्ग धास्तावले आहे. रोहिणी व मृग नक्षत्र हे कोरडेच गेले आहे. व आता आदा नक्षञ लागले असून कधी वरून राजा हजेरी लावेल या चिंतेने शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले आहे.

ठळक मुद्देनक्षत्राचे काही दिवस हे कोरडे ठाक जाताना दिसत आहे.

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे अजून वरून राजा चे आगमन झाले नसल्याने राजापूर येथे पेरण्या लांबल्याने शेतकरी वर्ग धास्तावले आहे. रोहिणी व मृग नक्षत्र हे कोरडेच गेले आहे. व आता आदा नक्षञ लागले असून कधी वरून राजा हजेरी लावेल या चिंतेने शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले आहे.राजापूर येथे मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती भयानक असताना यावर्षी अजूनही पावसाने दडी मारल्याने पेरण्या पावसाअभावी खोळंबून पडल्या आहे. राजापूर सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांना चारा या चिंतेने जनता हैराण झाली आहे. त्यामुळे खरिप हंगामातील पेरण्या करण्यासाठी पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. यावर्षी बियाणे खते औषधे विक्रेत्यांकडे शांतता आहे.त्यामुळे बळीराजासह व्यापारी शेतमजूर नोकरदार वर्ग यांच्या नजरा वरूणराजाच्या आगमनाकडे लागून आहेत. मात्र खरिप हंगामासाठी पावसाची नितांत आवश्यकता असल्याने या पावसाच्या आगमनकडे बळीराजाच्या नजरा लागून आहेत. शुक्र वारी मृग नक्षत्र संपले आणि शनिवारी आदा नक्षत्रास सुरवात झाली आहे. परंतु आद्रा नक्षत्राचे काही दिवस हे कोरडे ठाक जाताना दिसत आहे.आकाशात ढग दाटून येतात तोच वारा सुटून ढग कूठच्या कूठे वाहून जातात. त्यामुळे बळीराजाच्या आशेची निराशा होते. गेल्या वर्षी राजापूर परिसराती जून महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू आहेत.या गावाला कितीही पाऊस झाला तरी दरवर्षी उन्हाळ्याच्या चार महिने हे या गावाला टॅँकरद्वारेच तहान भागवावी लागते. पण मागच्या वर्षी शेतकरी वर्गाने केलेला खर्चही वसूल झालेला नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहत्ेत. काही वर्षापुर्वी एप्रिल आणि मे महिन्यात वळीव हमखास बरसायचा त्यामुळे मृगाच्या पावसावर पेरण्या उरकल्या जायच्या, मात्र निसर्गाच्या वातावरणातील बदलामुळे हे सारे चित्र पालटले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतीत आहे.