शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

ब्राह्मणगावच्या शेतकऱ्याने तोडली द्राक्षबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 15:55 IST

ब्राह्मणगाव : गेल्या चार - पाच वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व सततच्या नैसर्गिक संकटांना वैतागून येथील द्राक्ष उत्पादक योगेश अरुण अहिरे यांनी पाच एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवून तिला बुडासकट काढून टाकली. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकावर मोठी अवकळा आली असून, परिसरातील बऱ्याच द्राक्ष बागा तोडल्या जात आहेत.

चार - पाच वर्षांपासून शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. तरीही शेतकरी मोठी आर्थिक झळ सोसत शेती करीत आहेत. मात्र, सध्या ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, दाट धुके, अती ऊन, त्यातच पिकांवरील महागडी औषधे, वाढती शेतमजुरी, पिकांना खर्चापेक्षा मिळणारा कमी भाव याला कंटाळून येथील चंद्रकांत गोविंद अहिरे, योगेश अरुण अहिरे यांनी आपल्या द्राक्ष बागा कुऱ्हाडीने बुडासकट तोडून टाकल्या.सध्या तर सर्वच पिकांना नैसर्गिक संकटांचा त्रास वाढला असून, कांदा पिकालाही अनेक रोगांनी ग्रासले आहे. गव्हाचे क्षेत्र पूर्णपणे घटले असून, कांदा पिकाकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक अपेक्षा होत्या. मात्र, त्यालाही ढगाळ वातावरणाचा फटका बसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती