शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

ग्रामसेवकाला निरोप अन् गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रूंचे पाट....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:16 IST

वेळुंजे : शासकीय सेवेत असताना प्रत्येक कर्मचाऱ्याला बदली काही नवीन नाही. परंतु काही माणसं आपल्या कामाच्या जोरावर जनमाणसांच्या मनाचा ...

वेळुंजे : शासकीय सेवेत असताना प्रत्येक कर्मचाऱ्याला बदली काही नवीन नाही. परंतु काही माणसं आपल्या कामाच्या जोरावर जनमाणसांच्या मनाचा ठाव घेत असतात. त्यातच गाव-खेड्यात ग्रामसेवक भाऊसाहेब, तलाठी तात्या म्हटलं की बदनाम माणूस. त्याच्याकडे सारेच संशयाचे पाहणार. परंतु तोरंगणच्या ग्रामसेवकाची बदली झाली तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव लोटलं. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंनी दाटलेले आपलेपणाचे भाव होते. असे भाऊसाहेब प्रत्येक गाव-खेड्याला लाभले तर देशाचं किती भलं होईल नाही?

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण येथील ग्रामसेवक सचिन पवार यांची नाशिक तालुक्यात बदली झाल्याने गावाच्यावतीने त्यांचा निरोप समारंभ ठेवण्यात आला होता. निरोप समारंभात गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. मागील पाच वर्षांपासून पवार हे तोरंगणला बदली होऊन आले. सुरुवातीपासूनच सर्वांसोबत मिळते जुळते घेतले. ग्रामपंचायत म्हणजे आपसातील वाद, अंतर्गत कुरघोडी असतात. परंतु पवार यांनी कार्य उत्तम पेलत आपल्या कामाच्या आणि मवाळ स्वभावातून सर्वांना आपलेसे केले. लहानपणापासूनच अंगी धार्मिक वृत्ती त्यातूनच लहान-थोर मंडळीना ‘ माऊली’ या शब्दाने आवाज देऊन येथील प्रत्येक नागरिकांच्या मनात घर करून तोरंगण (त्र्यंबक) चा विकास साधला. गावात वृक्ष लागवड, रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, पाणी पुरवठा योजना अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविल्या. कुसुमाग्रजांचा वारसा लाभलेल्या या तोरंगणच्या नागरिकांनीही मोलाची साथ देत आणि त्यांच्या बरोबरीने उभे राहून गावचा विकास साध्य केला. आपल्या भाऊसाहेबाला निरोप देण्यासाठी जयवंत जाधव, सरपंच माया जाधव, नामदेव गायकवाड, शंकर जाधव, अरुण जाधव, राजाराम आंडे, राहुल जाधव, योगेश जाधव, लक्ष्मण जाधव, महेंद्र खोटरे, पोलीस पाटील निवृत्ती जाधव, चंदर कर्डेल, अमृता जाधव , मधुकर जाधव, परशराम जाधव, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक, आश्रम शाळा मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.

कोट...

मागील पाच वर्षांपासून पेसा तालुक्यात आदिवासी भागात काम करण्याची संधी मला मिळाली. माझं गाव तसं धार्मिक. कविवर्य कुसुमाग्रजांचा वारसा लाभलेले हे गाव. गावातील माणसं तितकीच प्रेमळ. या भावुक प्रसंगात गाव सोडताना या जीवभावाच्या माणसांपासून बाजूला जाणे तितकेच कठीण. तुम्ही चांगलं काम केलं तर लोक तुम्हांला डोक्यावर घेणारच, हा धडा मी घेतला. या गावासोबतच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. गावाशी संवाद कधी तुटणार नाही, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन चालू राहील.

- सचिन पवार, ग्रामसेवक

210821\fb_img_1629529330169.jpg~210821\145-img-20210821-wa0000.jpg

ग्रामसेवक सचिन पवार यांना निरोप देताना ग्रामस्थ मंडळी~फोटो छोटा