शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

ग्रामसेवकाला निरोप अन् गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रूंचे पाट....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:16 IST

वेळुंजे : शासकीय सेवेत असताना प्रत्येक कर्मचाऱ्याला बदली काही नवीन नाही. परंतु काही माणसं आपल्या कामाच्या जोरावर जनमाणसांच्या मनाचा ...

वेळुंजे : शासकीय सेवेत असताना प्रत्येक कर्मचाऱ्याला बदली काही नवीन नाही. परंतु काही माणसं आपल्या कामाच्या जोरावर जनमाणसांच्या मनाचा ठाव घेत असतात. त्यातच गाव-खेड्यात ग्रामसेवक भाऊसाहेब, तलाठी तात्या म्हटलं की बदनाम माणूस. त्याच्याकडे सारेच संशयाचे पाहणार. परंतु तोरंगणच्या ग्रामसेवकाची बदली झाली तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव लोटलं. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंनी दाटलेले आपलेपणाचे भाव होते. असे भाऊसाहेब प्रत्येक गाव-खेड्याला लाभले तर देशाचं किती भलं होईल नाही?

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण येथील ग्रामसेवक सचिन पवार यांची नाशिक तालुक्यात बदली झाल्याने गावाच्यावतीने त्यांचा निरोप समारंभ ठेवण्यात आला होता. निरोप समारंभात गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. मागील पाच वर्षांपासून पवार हे तोरंगणला बदली होऊन आले. सुरुवातीपासूनच सर्वांसोबत मिळते जुळते घेतले. ग्रामपंचायत म्हणजे आपसातील वाद, अंतर्गत कुरघोडी असतात. परंतु पवार यांनी कार्य उत्तम पेलत आपल्या कामाच्या आणि मवाळ स्वभावातून सर्वांना आपलेसे केले. लहानपणापासूनच अंगी धार्मिक वृत्ती त्यातूनच लहान-थोर मंडळीना ‘ माऊली’ या शब्दाने आवाज देऊन येथील प्रत्येक नागरिकांच्या मनात घर करून तोरंगण (त्र्यंबक) चा विकास साधला. गावात वृक्ष लागवड, रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, पाणी पुरवठा योजना अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविल्या. कुसुमाग्रजांचा वारसा लाभलेल्या या तोरंगणच्या नागरिकांनीही मोलाची साथ देत आणि त्यांच्या बरोबरीने उभे राहून गावचा विकास साध्य केला. आपल्या भाऊसाहेबाला निरोप देण्यासाठी जयवंत जाधव, सरपंच माया जाधव, नामदेव गायकवाड, शंकर जाधव, अरुण जाधव, राजाराम आंडे, राहुल जाधव, योगेश जाधव, लक्ष्मण जाधव, महेंद्र खोटरे, पोलीस पाटील निवृत्ती जाधव, चंदर कर्डेल, अमृता जाधव , मधुकर जाधव, परशराम जाधव, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक, आश्रम शाळा मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.

कोट...

मागील पाच वर्षांपासून पेसा तालुक्यात आदिवासी भागात काम करण्याची संधी मला मिळाली. माझं गाव तसं धार्मिक. कविवर्य कुसुमाग्रजांचा वारसा लाभलेले हे गाव. गावातील माणसं तितकीच प्रेमळ. या भावुक प्रसंगात गाव सोडताना या जीवभावाच्या माणसांपासून बाजूला जाणे तितकेच कठीण. तुम्ही चांगलं काम केलं तर लोक तुम्हांला डोक्यावर घेणारच, हा धडा मी घेतला. या गावासोबतच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. गावाशी संवाद कधी तुटणार नाही, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन चालू राहील.

- सचिन पवार, ग्रामसेवक

210821\fb_img_1629529330169.jpg~210821\145-img-20210821-wa0000.jpg

ग्रामसेवक सचिन पवार यांना निरोप देताना ग्रामस्थ मंडळी~फोटो छोटा