शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

ग्रामसेवकाला निरोप अन् गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रूंचे पाट....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:16 IST

वेळुंजे : शासकीय सेवेत असताना प्रत्येक कर्मचाऱ्याला बदली काही नवीन नाही. परंतु काही माणसं आपल्या कामाच्या जोरावर जनमाणसांच्या मनाचा ...

वेळुंजे : शासकीय सेवेत असताना प्रत्येक कर्मचाऱ्याला बदली काही नवीन नाही. परंतु काही माणसं आपल्या कामाच्या जोरावर जनमाणसांच्या मनाचा ठाव घेत असतात. त्यातच गाव-खेड्यात ग्रामसेवक भाऊसाहेब, तलाठी तात्या म्हटलं की बदनाम माणूस. त्याच्याकडे सारेच संशयाचे पाहणार. परंतु तोरंगणच्या ग्रामसेवकाची बदली झाली तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव लोटलं. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंनी दाटलेले आपलेपणाचे भाव होते. असे भाऊसाहेब प्रत्येक गाव-खेड्याला लाभले तर देशाचं किती भलं होईल नाही?

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण येथील ग्रामसेवक सचिन पवार यांची नाशिक तालुक्यात बदली झाल्याने गावाच्यावतीने त्यांचा निरोप समारंभ ठेवण्यात आला होता. निरोप समारंभात गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. मागील पाच वर्षांपासून पवार हे तोरंगणला बदली होऊन आले. सुरुवातीपासूनच सर्वांसोबत मिळते जुळते घेतले. ग्रामपंचायत म्हणजे आपसातील वाद, अंतर्गत कुरघोडी असतात. परंतु पवार यांनी कार्य उत्तम पेलत आपल्या कामाच्या आणि मवाळ स्वभावातून सर्वांना आपलेसे केले. लहानपणापासूनच अंगी धार्मिक वृत्ती त्यातूनच लहान-थोर मंडळीना ‘ माऊली’ या शब्दाने आवाज देऊन येथील प्रत्येक नागरिकांच्या मनात घर करून तोरंगण (त्र्यंबक) चा विकास साधला. गावात वृक्ष लागवड, रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, पाणी पुरवठा योजना अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविल्या. कुसुमाग्रजांचा वारसा लाभलेल्या या तोरंगणच्या नागरिकांनीही मोलाची साथ देत आणि त्यांच्या बरोबरीने उभे राहून गावचा विकास साध्य केला. आपल्या भाऊसाहेबाला निरोप देण्यासाठी जयवंत जाधव, सरपंच माया जाधव, नामदेव गायकवाड, शंकर जाधव, अरुण जाधव, राजाराम आंडे, राहुल जाधव, योगेश जाधव, लक्ष्मण जाधव, महेंद्र खोटरे, पोलीस पाटील निवृत्ती जाधव, चंदर कर्डेल, अमृता जाधव , मधुकर जाधव, परशराम जाधव, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक, आश्रम शाळा मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.

कोट...

मागील पाच वर्षांपासून पेसा तालुक्यात आदिवासी भागात काम करण्याची संधी मला मिळाली. माझं गाव तसं धार्मिक. कविवर्य कुसुमाग्रजांचा वारसा लाभलेले हे गाव. गावातील माणसं तितकीच प्रेमळ. या भावुक प्रसंगात गाव सोडताना या जीवभावाच्या माणसांपासून बाजूला जाणे तितकेच कठीण. तुम्ही चांगलं काम केलं तर लोक तुम्हांला डोक्यावर घेणारच, हा धडा मी घेतला. या गावासोबतच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. गावाशी संवाद कधी तुटणार नाही, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन चालू राहील.

- सचिन पवार, ग्रामसेवक

210821\fb_img_1629529330169.jpg~210821\145-img-20210821-wa0000.jpg

ग्रामसेवक सचिन पवार यांना निरोप देताना ग्रामस्थ मंडळी~फोटो छोटा