शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

ग्रामसेवकाला निरोप अन् गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रूंचे पाट....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:16 IST

वेळुंजे : शासकीय सेवेत असताना प्रत्येक कर्मचाऱ्याला बदली काही नवीन नाही. परंतु काही माणसं आपल्या कामाच्या जोरावर जनमाणसांच्या मनाचा ...

वेळुंजे : शासकीय सेवेत असताना प्रत्येक कर्मचाऱ्याला बदली काही नवीन नाही. परंतु काही माणसं आपल्या कामाच्या जोरावर जनमाणसांच्या मनाचा ठाव घेत असतात. त्यातच गाव-खेड्यात ग्रामसेवक भाऊसाहेब, तलाठी तात्या म्हटलं की बदनाम माणूस. त्याच्याकडे सारेच संशयाचे पाहणार. परंतु तोरंगणच्या ग्रामसेवकाची बदली झाली तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव लोटलं. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंनी दाटलेले आपलेपणाचे भाव होते. असे भाऊसाहेब प्रत्येक गाव-खेड्याला लाभले तर देशाचं किती भलं होईल नाही?

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण येथील ग्रामसेवक सचिन पवार यांची नाशिक तालुक्यात बदली झाल्याने गावाच्यावतीने त्यांचा निरोप समारंभ ठेवण्यात आला होता. निरोप समारंभात गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. मागील पाच वर्षांपासून पवार हे तोरंगणला बदली होऊन आले. सुरुवातीपासूनच सर्वांसोबत मिळते जुळते घेतले. ग्रामपंचायत म्हणजे आपसातील वाद, अंतर्गत कुरघोडी असतात. परंतु पवार यांनी कार्य उत्तम पेलत आपल्या कामाच्या आणि मवाळ स्वभावातून सर्वांना आपलेसे केले. लहानपणापासूनच अंगी धार्मिक वृत्ती त्यातूनच लहान-थोर मंडळीना ‘ माऊली’ या शब्दाने आवाज देऊन येथील प्रत्येक नागरिकांच्या मनात घर करून तोरंगण (त्र्यंबक) चा विकास साधला. गावात वृक्ष लागवड, रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, पाणी पुरवठा योजना अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविल्या. कुसुमाग्रजांचा वारसा लाभलेल्या या तोरंगणच्या नागरिकांनीही मोलाची साथ देत आणि त्यांच्या बरोबरीने उभे राहून गावचा विकास साध्य केला. आपल्या भाऊसाहेबाला निरोप देण्यासाठी जयवंत जाधव, सरपंच माया जाधव, नामदेव गायकवाड, शंकर जाधव, अरुण जाधव, राजाराम आंडे, राहुल जाधव, योगेश जाधव, लक्ष्मण जाधव, महेंद्र खोटरे, पोलीस पाटील निवृत्ती जाधव, चंदर कर्डेल, अमृता जाधव , मधुकर जाधव, परशराम जाधव, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक, आश्रम शाळा मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.

कोट...

मागील पाच वर्षांपासून पेसा तालुक्यात आदिवासी भागात काम करण्याची संधी मला मिळाली. माझं गाव तसं धार्मिक. कविवर्य कुसुमाग्रजांचा वारसा लाभलेले हे गाव. गावातील माणसं तितकीच प्रेमळ. या भावुक प्रसंगात गाव सोडताना या जीवभावाच्या माणसांपासून बाजूला जाणे तितकेच कठीण. तुम्ही चांगलं काम केलं तर लोक तुम्हांला डोक्यावर घेणारच, हा धडा मी घेतला. या गावासोबतच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. गावाशी संवाद कधी तुटणार नाही, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन चालू राहील.

- सचिन पवार, ग्रामसेवक

210821\fb_img_1629529330169.jpg~210821\145-img-20210821-wa0000.jpg

ग्रामसेवक सचिन पवार यांना निरोप देताना ग्रामस्थ मंडळी~फोटो छोटा