शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबाला वीस किलो : सानुग्रह अनुदानाला ठेंगा

By admin | Updated: August 31, 2016 00:43 IST

पूरग्रस्तांना देणार मोफत अन्नधान्य

नाशिक : २ आॅगस्ट रोजी गोदावरीसह जिल्ह्यातील नद्या, नाल्यांना आलेल्या पुरामुळे संसारोपयोगी वस्तूंची मोठी हानी झालेल्या जिल्ह्यातील साडेसहा हजारांहून अधिक कुटुंबाना प्रत्येकी वीस किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, मंगळवारपासून त्याचे वाटपही सुरू झाले आहे. सलग ४८ तासांहून अधिक काळ कोसळलेल्या पावसामुळे २ आॅगस्ट रोजी गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ होऊन नद्या, नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. नाशिक शहरात गोदावरी, नासर्डी, वाघाडी या नाल्याच्या दुतर्फा राहणाऱ्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले व त्यातून हजारो कुटुंबावर बेघर होण्याची परिस्थिती उद्भवली, अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले, तर पुराच्या तडाख्यामध्ये घरांचीही पडझड होऊन डोक्यावरचे छप्परही हिरावून नेण्यात आले. या शिवाय बाजारपेठेतही पुराचे पाणी शिरल्याने दुकानदारांचे कोट्यवधी रुपयांच्या मालाचे नुकसान झाले. आजवर ज्या ज्यावेळी पुराने वित्तहानी झाल्याच्या घटना घडल्या त्या त्यावेळी शासनाने पूरग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात दिला, परंतु आॅगस्ट महिन्यात राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्णांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊन नुकसान झाल्याची घटना घडल्याने नाशिकला अपवाद करू शकण्याबाबत शासन पातळीवर संभ्रम होता. तथापि, प्रशासनाने नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यास सुरुवात केल्याने पूरग्रस्त आशावादी झाले होते. गेल्या आठवड्यात शासनाने पावणे आठ कोटी रुपयांची मदत पूरग्रस्तांना देऊ केली, परंतु त्यातून फक्त अधिकृत घरांच्या पडझडीच्या मोबदल्यात नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला होता व प्रशासनाने पूरग्रस्तांना मोफत अन्नधान्य, सानुग्रह अनुदान देण्याबाबत सादर केलेली शिफारस फेटाळून लावली होती. त्यामुळे पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून दिल्याची भावना बळावली असतानाच, सोमवारी सायंकाळी शासनाने पूरग्रस्त कुटुंबाला प्रत्येकी वीस किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्यात दहा किलो गहू व दहा किलो तांदळाचा समावेश आहे. मात्र सानुग्रह अनुदान देण्यास सरकारने नकार दिला आहे.नाशिक जिल्ह्णात ६३३७ कुटुंबांना पुराचा तडाखा बसला असून, त्यात नाशिक व निफाड तालुक्यातील कुटुंबांची संख्या अधिक आहे. त्यांच्यासाठी ६७३.७० क्व्ािंटल गहू व तितकाच गहू प्राप्त झाला आहे. प्रत्येक कुटुंबाला वीस किलो धान्य मोफत देण्यात येणार असल्याने त्याची सुरुवात मंगळवारपासून करण्यात आली. ज्या ज्या पूरग्रस्तांचे पंचनामे झाले त्यांच्या याद्या संबंधित दुकानदार, तलाठ्यांना देण्यात आल्या असून, पूरग्रस्तांनी आपली ओळख पटवून दिल्यानंतरच धान्य मिळणार आहे.