शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

सातबाराच्या नोंदीवरून कौटुंबिक बखेडा

By admin | Updated: August 2, 2016 02:27 IST

कायदेशीर पेच : जागा मालकांचीही अभियानाकडे पाठ

नाशिक : महसूल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठीच्या महाराजस्व अभियानाबाबत राज्य सरकार व पर्यायाने जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या ‘लक्ष्मीमूर्ती’ योजनेमुळे ग्रामीण व शहरी भागातील घराघरांत तंटा उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली असून, या योजनेंतर्गत सातबारा उताऱ्यावर पुरुषाबरोबर महिलांचेही नाव लावण्याच्या शासनाच्या फतव्याची अंमलबजावणी करण्यात खुद्द शासकीय यंत्रणेलाही कायदेशीर अडथळ्यांचा सामना करावा लागणार असल्याने जागा मालकांनीही या अभियानाकडे पाठ फिरविली आहे. सोमवार १ आॅगस्टपासून राज्यात महाराजस्व अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने सातबारा उताऱ्यावर पुरुषाबरोबर स्त्रियांच्याही मालकी हक्काची नोंद करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे त्याचबरोबर वारस नोंदी करताना कुटुंबातील महिला वारसदारांची नावे वगळली गेली असल्यास त्यांची नव्याने वारस नोंद करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहानिमित्त शासन हे अभियान राबवित असले तरी, त्यातून चांगले निष्पन्न होण्याऐवजी कौटुंबिक भांडणेच चव्हाट्यावर येण्याची भीती शासकीय यंत्रणा व्यक्त करीत आहेत. मुळात तलाठी असो वा मंडल अधिकारी हे फक्त नोंदी घेणारे महसूल अधिकारी असून, त्यांना स्वत:हून कोणाच्याही सातबारा उताऱ्यावर कोणाचीही नोंद घेण्याचे अधिकार नाहीत. मालमत्तेच्या सातबारा उताऱ्यावर पुरुषाबरोबर महिलेचे नाव तलाठी व मंडल अधिकारी स्वत:हून लावू शकत नाही, त्यासाठी त्याला मूळ जागा मालकाची संमती आवश्यक असून, तसा अर्ज केल्याशिवाय ही प्रक्रिया कायदेशीर होऊ शकत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. शिवाय एखाद्या मालमत्तेचा न्यायालयात वाद सुरू असल्यास किंवा एका पुरुषाला दोन बायका असल्यास अशा परिस्थितीत नेमके कोणाचे नाव लावावे, असा प्रश्नही त्यानिमित्ताने उभा राहण्याची शक्यता आहे. तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने मालमत्तेवर नाव लावण्याची शासनाला अपेक्षा असेल तर, प्रत्येक मालमत्तेच्या मालकाच्या बायकांच्या नावांचा शोध घ्यावा लागणार आहे. मालमत्तेचा मालकी हक्क ठरविण्याचा अधिकार फक्त दिवाणी न्यायालयाला असून, बऱ्याच प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या आदेशान्वयेच मालमत्तेतील नावे वगळण्याचा अथवा समाविष्ट केले जात असल्याने ज्या मालमत्तेमधून यापूर्वीच महिलांची नावे वगळली गेली असतील त्यांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याच्या महाराजस्व अभियानातील मोहिमेमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.