शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

सातबाराच्या नोंदीवरून कौटुंबिक बखेडा

By admin | Updated: August 2, 2016 02:27 IST

कायदेशीर पेच : जागा मालकांचीही अभियानाकडे पाठ

नाशिक : महसूल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठीच्या महाराजस्व अभियानाबाबत राज्य सरकार व पर्यायाने जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या ‘लक्ष्मीमूर्ती’ योजनेमुळे ग्रामीण व शहरी भागातील घराघरांत तंटा उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली असून, या योजनेंतर्गत सातबारा उताऱ्यावर पुरुषाबरोबर महिलांचेही नाव लावण्याच्या शासनाच्या फतव्याची अंमलबजावणी करण्यात खुद्द शासकीय यंत्रणेलाही कायदेशीर अडथळ्यांचा सामना करावा लागणार असल्याने जागा मालकांनीही या अभियानाकडे पाठ फिरविली आहे. सोमवार १ आॅगस्टपासून राज्यात महाराजस्व अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने सातबारा उताऱ्यावर पुरुषाबरोबर स्त्रियांच्याही मालकी हक्काची नोंद करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे त्याचबरोबर वारस नोंदी करताना कुटुंबातील महिला वारसदारांची नावे वगळली गेली असल्यास त्यांची नव्याने वारस नोंद करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहानिमित्त शासन हे अभियान राबवित असले तरी, त्यातून चांगले निष्पन्न होण्याऐवजी कौटुंबिक भांडणेच चव्हाट्यावर येण्याची भीती शासकीय यंत्रणा व्यक्त करीत आहेत. मुळात तलाठी असो वा मंडल अधिकारी हे फक्त नोंदी घेणारे महसूल अधिकारी असून, त्यांना स्वत:हून कोणाच्याही सातबारा उताऱ्यावर कोणाचीही नोंद घेण्याचे अधिकार नाहीत. मालमत्तेच्या सातबारा उताऱ्यावर पुरुषाबरोबर महिलेचे नाव तलाठी व मंडल अधिकारी स्वत:हून लावू शकत नाही, त्यासाठी त्याला मूळ जागा मालकाची संमती आवश्यक असून, तसा अर्ज केल्याशिवाय ही प्रक्रिया कायदेशीर होऊ शकत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. शिवाय एखाद्या मालमत्तेचा न्यायालयात वाद सुरू असल्यास किंवा एका पुरुषाला दोन बायका असल्यास अशा परिस्थितीत नेमके कोणाचे नाव लावावे, असा प्रश्नही त्यानिमित्ताने उभा राहण्याची शक्यता आहे. तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने मालमत्तेवर नाव लावण्याची शासनाला अपेक्षा असेल तर, प्रत्येक मालमत्तेच्या मालकाच्या बायकांच्या नावांचा शोध घ्यावा लागणार आहे. मालमत्तेचा मालकी हक्क ठरविण्याचा अधिकार फक्त दिवाणी न्यायालयाला असून, बऱ्याच प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या आदेशान्वयेच मालमत्तेतील नावे वगळण्याचा अथवा समाविष्ट केले जात असल्याने ज्या मालमत्तेमधून यापूर्वीच महिलांची नावे वगळली गेली असतील त्यांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याच्या महाराजस्व अभियानातील मोहिमेमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.