शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात कांदा भावात घसरण

By admin | Updated: April 14, 2016 23:09 IST

दुष्काळात तेरावा : खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतातुर

 येवला : बाजार समितीत कांद्याचे भाव ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल असून, गेल्या महिन्याभरापासून आवक वाढत असल्याने भाव आणखी १०० ते १५० रुपयांनी घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणी नाही म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी ठेका पद्धतीने अन्य तालुक्यात कांदा लागवडीसाठी गेलेले शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आता खर्च तर करून बसलो; परंतु भाव घसरत असल्याने हाती धुपाटणे घेण्याची वेळ आली आल्याची प्रतिक्रि या शेतकरी व्यक्त करीत आहेत. कांद्याचे भाव घसरत असताना आता शेतकरी शासनाला जाब विचारू लागला आहे. कृषिमूल्य आयोगाची भाव ठरवण्याची पद्धती कांद्याच्या बाबतीत का मूग गिळून बसते, असा सवाल आता विचारत आहेत. शेतकऱ्यांचा कांदा वाढला की, हाकाटी पिटली जाते; पण तोच कांदा उत्पादन खर्च फिटत नसताना शेतकऱ्यांना विकावा लागतो. याबाबत मात्र केंद्रशासन काहीच बोलत नाही. ही वस्तुस्थिती आहे. अच्छे दिन येण्यासाठी उचललेले पाऊल चुकले की काय? अशीदेखील विचारणा करू लागली आहे. येवला तालुका दुष्काळी असल्याने पाणी नाही म्हणून कांद्याचे पीक घेण्यासाठी तालुक्यातील शेतकरी, कोपरगाव, गंगापूर, वैजापूर, कन्नड, पैठण, शिरपूरसह अन्य ठिकाणी २५ ते ३० हजार रुपये ठेक्याने कांदा लागवड करण्यासाठी कुटुंबांसह गेले आहे. काही शेतकरी तिसरा वाटा पद्धतीने ही अन्य ठिकाणी कांदा पीक घेतले आहे. परंतु कांद्याचे भाव कमालीचे घसरल्याने आगीतून फुफाट्यात पडल्याची परिस्थिती शेतकऱ्याची झाली आहे. (वार्ताहर)