शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कोबी, टमाट्याच्या भावात घसरण

By admin | Updated: October 30, 2014 22:25 IST

शेतकरी चिंतातुर : उत्पादन खर्च निघेना; माल रस्त्यावर फेकण्याची वेळ

खामखेडा/सिन्नर : परिसरात यंदा मोठ्या प्रमाणावर कोबी व टमाट्याची लागवड करण्यात आली आहे. मात्र या दोन्ही पिकांचे भाव घसरल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.परिसरामध्ये दरवर्षी कोबी व टमाट्याचे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते; परंतु चालू वर्षी उशिरा पावसामुळे टमाटा पिकाचे बियाणे उशिरा टाकल्यामुळे रोपे उशिरा तयार झाली आणि पिकांची लागवड उशिरा करण्यात आली. मध्ये तर या पिकांवर करप्या व अळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता; परंतु शेतकऱ्याने महागडी अशी औषधांची फवारणी करून पिके तयार केली होती. आता भावामध्ये प्रचंड प्रमाणात घट होऊन दोन ते तीन रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च भरून मिळत नाही.एक गोणी कोबीची मजुरी ३५ रुपये द्यावे लागते आणि सुरत किंवा बडोदा येथे घेऊन जाण्यासाठी ५० रुपये खर्च येतो. तेथे आडतचा विचार केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच मिळत नाही आणि स्थानिक व्यापाऱ्याला विचारले तर तो दोन किंवा अडीच रुपये किलो मागतो. तेव्हा बियाणे आणि फवारणीचा आणि तो बाजारामध्ये घेऊन जाण्याचा विचार केल्यास शेतकऱ्याची शेती तोट्यात जात आहे. तसेच टमाटा पिकांबाबतही शेतकरी मेटाकुटीला आला आहे. टमाट्याच्या २० किलो के्रटला ५० ते ६० रुपये भाव मिळत आहे. मजुरीचे पैसेही हाती येत नाही. त्याची मार्केटमध्ये तोलाई, भाराई वाहतूक खर्च हा स्वत: शेतकऱ्याला खिशातून करावा लागत आहे. या हाताशी आलेल्या पिकांचे काय करावे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. कारण आता गुजरातमधील कोबीचे उत्पादन सुरू झाल्याने कोबीचे भाव कमी झाले, असे कोबी दिसत आहे. तेव्हा आता पिकासाठी उसनवार आणलेले पैसे कसे परत करावे, असा प्रश्न शेतकऱ्याला सतावत आहे.सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टमाट्याचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून सतत गडगडणारे भाव गुरुवारी टमाट्याची आवक कमी झाल्याने काहीसे सुधारले असले तरी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च फिटणे अवघड झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.(वार्ताहर)