शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

फळांची आवक घटली, रुग्णांचे हाल

By admin | Updated: June 3, 2017 00:36 IST

नाशिक : विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा नाशिकच्या बाजारपेठेवरही विपरीत परिणाम बघायला मिळाला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा नाशिकच्या बाजारपेठेवरही विपरीत परिणाम बघायला मिळाला. शहरातील फळबाजारात फळांची पुरेशी आवक झालेली नसल्याने उपलब्ध फळांची चढ्या दराने विक्री होत असल्याचे चित्र भद्रकाली फळबाजारात शुक्रवारी बघायला मिळाले.रमजान महिना तसेच दाट लग्नतिथी असल्याने पालेभाज्या उपलब्ध होत नसतानाच उपवासासाठी आणि समारंभात कोशिंबिरीसाठी किंवा सजावटीसाठी फळांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असताना प्रत्यक्षात मात्र शहरातील बाजारपेठेत फळांची उपलब्धता नाही तसेच अनेक फळविक्रेत्यांनी मुंबईहून शहरात फळे दाखल6 न झाल्याने आपली दुकाने बंद ठेवणेच पसंद केले. आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबईच्या बाजारपेठेतून नाशिकमध्ये विविध फळे दाखल होतात, परंतु शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आणि मालवाहतूक सेवा बंद असल्याने नाशिकमध्ये गुरुवारी फळांची आवक झाली नाही, शनिवारी (दि. ३) नव्याने बाजारपेठेत फळ दाखल झाली नाहीत तर नाशिकच्या फळबाजारात शुकशुकाट बघायला मिळेल असे फळ व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. उपवासाबरोबरच दाट लग्नतिथीमुळे फळांची मोठ्या प्रमाणात मागणी होत असली तरी प्रत्येक ग्राहकाला फळे मिळावीत आणि फळे नाशवंत असल्याने उपलब्ध फळांचे नुकसान होऊ नये यासाठी विक्रेत्यांनी फळांच्या विक्रीस प्राधान्य दिले आहे.