शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

फेरनियोजनाने टळला गोंधळ

By admin | Updated: September 14, 2015 23:58 IST

बॅण्ड पथक, ध्वज, वाहनांच्या मार्गात बदल

त्र्यंबकेश्वर : येथे शाहीस्नानाच्या दुसऱ्या पर्वणीत पहिल्या पर्वणीतील गोंधळ लक्षात घेऊन आखाड्यांबरोबरील सुशोभित ट्रॅक्टर, भव्य ध्वज, बॅण्ड पथक हे कुशावर्तावरून मेनरोडमार्गे मंदिरात न नेता पाटील गल्लीच्या मधल्या मार्गानेच पाठवून देण्यात आल्याने सर्व आखाड्यांचे शाहीस्नान शांततेत व निर्धारित वेळेत पार पडले.सजवलेले ट्रॅक्टर, बॅण्ड आदि लवाजम्यासह आखाड्यातील साधू-महंत निघाले असले तरी, अर्ध्या रस्त्यात ट्रॅक्टर, बॅण्ड दुसऱ्यामार्गे आणि साधू, संत, महंत देवी-देवतांसह पायी कुशावर्तावर आल्याने प्रत्येक आखाड्यातील अंतर कमी झाले. धक्काबुक्की, ट्रॅक्टरमुळे ट्रॅफिक जाम आदि गोष्टी यंदाच्या पर्वणीत टाळता आल्या. एकेक आखाड्याबरोबर असणाऱ्या अनेक बॅण्ड्सचा आवाज न झाल्याने साधू-महंतांना सोबतच्या भाविकांना, प्रशासनाला, ग्रामस्थांना आणि देशभरातून आलेल्या भाविकांना शाही पर्वणीवर आपले लक्ष चांगल्या प्रकारे केंद्रित करता आले. प्रत्येक आखाड्याचा जथ्था शांततेत पायी येत असल्याने पोलिसांनाही फारसे परिश्रम न घेता ‘होल्ड अ‍ॅण्ड रिलीज’ पद्धतीने त्यांना सोडता आले. प्रशासनाने केलेल्या विनंतीला मान देऊन आखाड्यांनी दाखविलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे शाहीस्नान यशस्वी होऊ शकले. तिसऱ्या पर्वणीत आणि भविष्यात होणाऱ्या कुंभमेळ्यांमध्येही हा पॅटर्न राबविण्यास हरकत नाही, असा निष्कर्ष आता काढला जात आहे. या प्रकारामुळे भाविकांचे, प्रसार माध्यमांचे बॅण्ड, डीजे, रथांची संख्या यापेक्षा विविध आखाड्यांचे साधू, महंत, नागा साधू, त्यांच्या देवता, त्यांच्या हातातील शस्त्रास्त्रे आदिंवर अधिक लक्ष केंद्रित होऊ शकले. कुंभमेळ्याकडे गांभीर्याने बघण्याचा हेतूही सफल झाला. आखाड्यांनीही ट्रॅक्टर आणि बॅण्ड पथकांची संख्या कमी केल्याने त्र्यंबकसारख्या छोट्या गावात होणारी वाहतूक कोंडी टळली.