शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

बेदाणे उत्पादक शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 22:16 IST

द्राक्ष शेतीबरोबर जोडधंदा म्हणून बेदाणे निर्मिती मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र, अवकाळी, बेमोसमी पाऊस यासह आता कोरोना विषाणूचा परिणाम द्राक्षशेती व बेदाणे उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शासनाने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : शासनाने उपाययोजना करण्याची मागणीे

दिंडोरी : तालुक्यात द्राक्ष शेतीबरोबर जोडधंदा म्हणून बेदाणे निर्मिती मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र, अवकाळी, बेमोसमी पाऊस यासह आता कोरोना विषाणूचा परिणाम द्राक्षशेती व बेदाणे उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शासनाने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील शेतकरी दीपक गायकवाड व संतोष गायकवाड अनेक वर्षांपासून बेदाणे उत्पादनाचे काम करत असून सध्या अवकाळी पावसाचा व कोरोना विषाणूमुळे निर्यातबंदीचा फटका बसत असल्याने त्यांचे लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे. साधारणत: जानेवारी-फेब्रुवारीमध्येच शेतकरी लाखो रु पये खर्च करून बेदाण्यासाठी शेडची उभारणी करतात. त्यानंतर तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडे जाऊन हिरवे मणी तसेच काळीचे मणी विकत घेऊन त्यावर प्रक्रि या करून हा बेदाण्याचा माल तयार करतात. बेदाणे तयार करण्यासाठी मजुरांनाही रोजगार उपलब्ध होतो. यासाठी बँक सोसायटी यांच्याकडून कर्ज घेऊन बेदाणे व्यवसाय केला जातोे. गेल्या काही दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने या बेदाण्या मालाचे नुकसान झाले आहे. त्यातच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्याने संचारबंदी, निर्यातबंदी व लॉकडाउन याचा फटका बेदाणा उत्पादक शेतकºयांना बसला आहे.

बेदाण्याचा माल तयार करूनही व्यापारीच नसल्याने हा माल विकायचा कसा व झालेल्या खर्चाचे करायचे काय? त्यातच सद्य:स्थिती पाहता मजूरही मिळत नसल्याने व व्यापारीही फिरकत नसल्याने बेदाणे उत्पादक शेतकºयांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. बँक व सोसायटीचे कर्ज फेडायचे कसे आणि शेतकºयांकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे द्यायचे कोठून, असा प्रश्न बेदाणे उत्पादकांना पडला आहे. शासनाने यावर त्वरित उपाययोजना करून लवकरात लवकर निर्यातबंदी उठून शेतकºयांचे होणारे आर्थिक हाल थांबवावे, अशी मागणी बेदाणे उत्पादकांनी केली आहे.अवकाळी पाऊस पडत असल्याने द्राक्षशेतीबरोबर खरबूज या पिकाचेही नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी दिवसोंदिवस मेटाकुटीस आला आहे. शेतकºयांनी जगायचे कसे? दरवर्षी कोणती ना कोणती नैसर्गिक आपत्ती येत असल्याने कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न पडला आहे.- वैभव गायकवाड, बेदाणा उत्पादक

कोरोना या विषाणूमुळे सध्या सर्वत्र निर्यातबंदी करण्यात आल्यामुळे याचा सर्वात जास्त फटका हा शेतकºयांना बसला आहे. शेतकºयांचे जगणे मुश्कील झाले आहे. अनेक वर्षांपासून आम्ही बेदाणे तयार करण्याचे काम करत असल्याने दोन पैसे मिळतील या आशेपोटी बँकेकडून कर्ज घेऊन बेदाण्याचे शेड उभारले. मात्र व्यवसाय संकटात आला आहे. शासनाने याची तत्काळ दखल घेऊन निर्यातबंदी उठवावी.- संतोष गायकवाड, बेदाणा उत्पादक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAgriculture Sectorशेती क्षेत्र