शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

बेदाणे उत्पादक शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 22:16 IST

द्राक्ष शेतीबरोबर जोडधंदा म्हणून बेदाणे निर्मिती मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र, अवकाळी, बेमोसमी पाऊस यासह आता कोरोना विषाणूचा परिणाम द्राक्षशेती व बेदाणे उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शासनाने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : शासनाने उपाययोजना करण्याची मागणीे

दिंडोरी : तालुक्यात द्राक्ष शेतीबरोबर जोडधंदा म्हणून बेदाणे निर्मिती मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र, अवकाळी, बेमोसमी पाऊस यासह आता कोरोना विषाणूचा परिणाम द्राक्षशेती व बेदाणे उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शासनाने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील शेतकरी दीपक गायकवाड व संतोष गायकवाड अनेक वर्षांपासून बेदाणे उत्पादनाचे काम करत असून सध्या अवकाळी पावसाचा व कोरोना विषाणूमुळे निर्यातबंदीचा फटका बसत असल्याने त्यांचे लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे. साधारणत: जानेवारी-फेब्रुवारीमध्येच शेतकरी लाखो रु पये खर्च करून बेदाण्यासाठी शेडची उभारणी करतात. त्यानंतर तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडे जाऊन हिरवे मणी तसेच काळीचे मणी विकत घेऊन त्यावर प्रक्रि या करून हा बेदाण्याचा माल तयार करतात. बेदाणे तयार करण्यासाठी मजुरांनाही रोजगार उपलब्ध होतो. यासाठी बँक सोसायटी यांच्याकडून कर्ज घेऊन बेदाणे व्यवसाय केला जातोे. गेल्या काही दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने या बेदाण्या मालाचे नुकसान झाले आहे. त्यातच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्याने संचारबंदी, निर्यातबंदी व लॉकडाउन याचा फटका बेदाणा उत्पादक शेतकºयांना बसला आहे.

बेदाण्याचा माल तयार करूनही व्यापारीच नसल्याने हा माल विकायचा कसा व झालेल्या खर्चाचे करायचे काय? त्यातच सद्य:स्थिती पाहता मजूरही मिळत नसल्याने व व्यापारीही फिरकत नसल्याने बेदाणे उत्पादक शेतकºयांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. बँक व सोसायटीचे कर्ज फेडायचे कसे आणि शेतकºयांकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे द्यायचे कोठून, असा प्रश्न बेदाणे उत्पादकांना पडला आहे. शासनाने यावर त्वरित उपाययोजना करून लवकरात लवकर निर्यातबंदी उठून शेतकºयांचे होणारे आर्थिक हाल थांबवावे, अशी मागणी बेदाणे उत्पादकांनी केली आहे.अवकाळी पाऊस पडत असल्याने द्राक्षशेतीबरोबर खरबूज या पिकाचेही नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी दिवसोंदिवस मेटाकुटीस आला आहे. शेतकºयांनी जगायचे कसे? दरवर्षी कोणती ना कोणती नैसर्गिक आपत्ती येत असल्याने कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न पडला आहे.- वैभव गायकवाड, बेदाणा उत्पादक

कोरोना या विषाणूमुळे सध्या सर्वत्र निर्यातबंदी करण्यात आल्यामुळे याचा सर्वात जास्त फटका हा शेतकºयांना बसला आहे. शेतकºयांचे जगणे मुश्कील झाले आहे. अनेक वर्षांपासून आम्ही बेदाणे तयार करण्याचे काम करत असल्याने दोन पैसे मिळतील या आशेपोटी बँकेकडून कर्ज घेऊन बेदाण्याचे शेड उभारले. मात्र व्यवसाय संकटात आला आहे. शासनाने याची तत्काळ दखल घेऊन निर्यातबंदी उठवावी.- संतोष गायकवाड, बेदाणा उत्पादक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAgriculture Sectorशेती क्षेत्र