शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
3
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
4
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
5
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
6
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
7
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
8
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
9
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
10
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
11
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
12
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
13
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
15
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
16
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
17
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
18
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
19
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
20
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

अतिवृष्टी मोजण्याचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 00:27 IST

बदलत्या वातावरणामुळे पावसाचा मूळ स्वभावच बदलून गेल्याने ठराविक क्षेत्रात धोधो बरसणाऱ्या अतिवृष्टीने होणाºया नुकसानीचे निकष कसे पडताळून पहावेत, असा पेच जिल्हा प्रशासनालाही पडू लागला आहे. परंपरागत पावसाचे सर्व ठोकताळे लहरी पावसामुळे केव्हाच वाहून गेल्याने पावसामुळे होणाºया नुकसानीचे निकष लावताना प्रशासनाचीही दमछाक होताना दिसत आहे.

ठळक मुद्देपावसाचे बिघडले तंत्र ठराविक क्षेत्रातच पाऊस; मोजणी यंत्रणेच्याही मर्यादा

नाशिक : बदलत्या वातावरणामुळे पावसाचा मूळ स्वभावच बदलून गेल्याने ठराविक क्षेत्रात धोधो बरसणाऱ्या अतिवृष्टीने होणाºया नुकसानीचे निकष कसे पडताळून पहावेत, असा पेच जिल्हा प्रशासनालाही पडू लागला आहे. परंपरागत पावसाचे सर्व ठोकताळे लहरी पावसामुळे केव्हाच वाहून गेल्याने पावसामुळे होणाºया नुकसानीचे निकष लावताना प्रशासनाचीही दमछाक होताना दिसत आहे.राज्यात यंदा सर्वत्र पावसाने कहर केला. अगदी मुंबई, पुणे यांसारख्या मेट्रो शहरात आणि दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्येदेखील धोधो पाऊस बरसला. हवामान खात्याचे सर्व अंदाज फोल ठरवत राज्यातील सर्व धरणे भरून वाहू लागली आहेत. अगदी परतीच्या पावसानेदेखील धुमाकूळ घातला असून, आॅक्टोबरच्या अखेरच्या चरणातही पावसाने झोडपून काढले आहे. पडणाºया एकूण पावसावर आणि क्षेत्रानुसार नुकसानीचा अंदाज काढला जातो. परंतु पावसाचे एकूणच ताळतंत्र पाहता भरपाईसाठी अतिवृष्टीचा निकष लावण्याचे मापदंडदेखील पडताळून पाहण्याची वेळ आली आहे.हवामान खात्याच्या मानांकानुसार ६५ मि.मी.च्या पुढे पडणारा पाऊस अतिवृष्टी म्हणून गणला जातो. जिल्ह्यात जुलैमध्ये एकदा, आॅगस्टमध्ये तीनदा, सप्टेंबरमध्येही तीनदा आणि आॅक्टोबरमध्ये दोनदा अतिवृष्टी झाली. यामध्ये शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्यांना मदत करण्यासाठीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. काहींना मदतही करण्यात आली आहे. शासकीय नियमाप्रमाणे एकाच दिवशी अथवा ठराविक काळात ६५ मि.मी. पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी असले संबोधले जाते किंबहुना अशावेळी नुकसानीचे निकष लागू होतात. खरेतर भौगोलिकदृष्ट्या किती क्षेत्रावर ६५ मि.मी. मीटरच्या पुढे पाऊस झाला याचे मोजमाप करण्याचे तंत्रच कार्यान्वित नाही किंबहुना त्याबाबतची कोणतीही स्पष्टता नाही. जिल्ह्यात सर्कल लेव्हलखाली अतिवृष्टी मोजण्याचे परिमाण नाही. त्यामुळे अतिवृष्टी मोजण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे.भरपाईचा पेच : पावसाची विषमताएका सर्कलच्या क्षेत्रात ८ ते १० गावे येतात. परंतु या सर्वच गावांमध्ये पाऊस होतो असे नाही तर एखाद्या गावातच तास-दीडतास धुवाधार पाऊस होतो आणि तेथेच नुकसान होते. त्या एका गावातील पावसाच्या नुकसानीसाठी अतिवृष्टीचा निकष लावणे कठीण होते. संपूर्ण सर्कलचा पाऊस मोजला जातो तेव्हा सरासरी ३० ते ४० मि.मी. इतकाच पाऊस मोजला जातो. अशावेळी भरपाई देणार कशी, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयRainपाऊसfloodपूर