शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

अतिवृष्टी मोजण्याचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 00:27 IST

बदलत्या वातावरणामुळे पावसाचा मूळ स्वभावच बदलून गेल्याने ठराविक क्षेत्रात धोधो बरसणाऱ्या अतिवृष्टीने होणाºया नुकसानीचे निकष कसे पडताळून पहावेत, असा पेच जिल्हा प्रशासनालाही पडू लागला आहे. परंपरागत पावसाचे सर्व ठोकताळे लहरी पावसामुळे केव्हाच वाहून गेल्याने पावसामुळे होणाºया नुकसानीचे निकष लावताना प्रशासनाचीही दमछाक होताना दिसत आहे.

ठळक मुद्देपावसाचे बिघडले तंत्र ठराविक क्षेत्रातच पाऊस; मोजणी यंत्रणेच्याही मर्यादा

नाशिक : बदलत्या वातावरणामुळे पावसाचा मूळ स्वभावच बदलून गेल्याने ठराविक क्षेत्रात धोधो बरसणाऱ्या अतिवृष्टीने होणाºया नुकसानीचे निकष कसे पडताळून पहावेत, असा पेच जिल्हा प्रशासनालाही पडू लागला आहे. परंपरागत पावसाचे सर्व ठोकताळे लहरी पावसामुळे केव्हाच वाहून गेल्याने पावसामुळे होणाºया नुकसानीचे निकष लावताना प्रशासनाचीही दमछाक होताना दिसत आहे.राज्यात यंदा सर्वत्र पावसाने कहर केला. अगदी मुंबई, पुणे यांसारख्या मेट्रो शहरात आणि दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्येदेखील धोधो पाऊस बरसला. हवामान खात्याचे सर्व अंदाज फोल ठरवत राज्यातील सर्व धरणे भरून वाहू लागली आहेत. अगदी परतीच्या पावसानेदेखील धुमाकूळ घातला असून, आॅक्टोबरच्या अखेरच्या चरणातही पावसाने झोडपून काढले आहे. पडणाºया एकूण पावसावर आणि क्षेत्रानुसार नुकसानीचा अंदाज काढला जातो. परंतु पावसाचे एकूणच ताळतंत्र पाहता भरपाईसाठी अतिवृष्टीचा निकष लावण्याचे मापदंडदेखील पडताळून पाहण्याची वेळ आली आहे.हवामान खात्याच्या मानांकानुसार ६५ मि.मी.च्या पुढे पडणारा पाऊस अतिवृष्टी म्हणून गणला जातो. जिल्ह्यात जुलैमध्ये एकदा, आॅगस्टमध्ये तीनदा, सप्टेंबरमध्येही तीनदा आणि आॅक्टोबरमध्ये दोनदा अतिवृष्टी झाली. यामध्ये शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्यांना मदत करण्यासाठीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. काहींना मदतही करण्यात आली आहे. शासकीय नियमाप्रमाणे एकाच दिवशी अथवा ठराविक काळात ६५ मि.मी. पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी असले संबोधले जाते किंबहुना अशावेळी नुकसानीचे निकष लागू होतात. खरेतर भौगोलिकदृष्ट्या किती क्षेत्रावर ६५ मि.मी. मीटरच्या पुढे पाऊस झाला याचे मोजमाप करण्याचे तंत्रच कार्यान्वित नाही किंबहुना त्याबाबतची कोणतीही स्पष्टता नाही. जिल्ह्यात सर्कल लेव्हलखाली अतिवृष्टी मोजण्याचे परिमाण नाही. त्यामुळे अतिवृष्टी मोजण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे.भरपाईचा पेच : पावसाची विषमताएका सर्कलच्या क्षेत्रात ८ ते १० गावे येतात. परंतु या सर्वच गावांमध्ये पाऊस होतो असे नाही तर एखाद्या गावातच तास-दीडतास धुवाधार पाऊस होतो आणि तेथेच नुकसान होते. त्या एका गावातील पावसाच्या नुकसानीसाठी अतिवृष्टीचा निकष लावणे कठीण होते. संपूर्ण सर्कलचा पाऊस मोजला जातो तेव्हा सरासरी ३० ते ४० मि.मी. इतकाच पाऊस मोजला जातो. अशावेळी भरपाई देणार कशी, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयRainपाऊसfloodपूर