शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

उन्हाळी सुटीसाठी जादा बसगाड्या

By admin | Updated: April 3, 2017 01:23 IST

नाशिक : उन्हाळी सुटीसाठी गावाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नाशिक विभागाकडून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले.

नाशिक : दहावी, बारावीच्या परीक्षा आटोपल्या असून, माध्यमिक शाळांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत, तर काही शाळांच्या परीक्षा संपल्यादेखील आहेत. त्यामुळे उन्हाळी सुटीसाठी गावाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नाशिक विभागाकडून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती एसटी महामंडळ नाशिक विभागाकडून देण्यात आली. हंगामी भाडेवाढीबद्दल अद्याप कोणतेही संकेत नसल्याने चालू दराप्रमाणेच प्रवाशांना तिकिटासाठी पैसे मोजावे लागणार आहे. यंदा लग्नसराईत एप्रिलमध्ये ४, मेमध्ये १४, जूनमध्ये १५ जुलैमध्ये एकही लग्नतिथी नसल्याने प्रवाशांची त्या दृष्टीनेही प्रवाशांची बससाठी गर्दी वाढणार आहे. उन्हाळी सुटी, पर्यटन, लग्नमौंजी, चैत्र नवरात्र आदि विविध कारणांसाठी नाशिकहून राज्य आणि देशभर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात ४ ते ११ एप्रिल दरम्यान सप्तशृंग गडावर होणाऱ्या चैत्र नवरात्रासाठी पायथा ते गड दररोज ७५ बसेस, प्रत्येक तालुका ते गड २०० बसेस सोडण्यात येणार आहे. दर दीड तासाला निमाणी ते स्वारगेट सकाळी ६ ते संध्याकाळी या वेळेत बस सोडण्यात येणार आहे. दर तासाला निमाणी ते कसारा, दर अर्ध्या तासाला महामार्ग ते शिर्डी अशाप्रकारे बसेस सोडण्यात येणार आहेत. दर पंधरा मिनिटांनी प्रवाशांच्या संख्येनुसार औरंगाबाद, धुळेसाठी बसेस सोडण्यात येणार आहेत. दर मंगळवार, शुक्रवार, रविवारी सप्तशृंग गडासाठी, दर सोमवार व रविवारी त्र्यंबकेश्वरसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. याशिवाय नियमित बस व्यतिरिक्त १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत दररोज नाशिक ते शेगाव, नाशिक ते बुलढाणा या बसेस सोडण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)