शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

‘ओखी’ने रोखली कोट्यवधींची निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:31 IST

सटाणा : वेळ : सकाळी ११ वाजता ठिकाण : पिंगळवाडे राज्यात अर्ली द्राक्ष पिकाची पंढरी म्हणून ओळख निर्माण झालेल्या नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात यंदा ‘ओखी’ या अस्मानी संकटामुळे मोठा तडाखा बसला आहे.

ठळक मुद्दे द्राक्ष पिकाची मोठ्या प्रमाणात हानी बिग बागायतदाराला दृष्ट

सटाणा : वेळ : सकाळी ११ वाजता ठिकाण : पिंगळवाडे राज्यात अर्ली द्राक्ष पिकाची पंढरी म्हणून ओळख निर्माण झालेल्या नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात यंदा ‘ओखी’ या अस्मानी संकटामुळे मोठा तडाखा बसला आहे. सातासमुद्रपार अवीट गोडीने भुरळ घालणाºया द्राक्षाची यंदा ओखीने मात्र निर्यात रोखली आहे. या अस्मानी संकटामुळे द्राक्ष पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून, तब्बल पंधराशे हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष पीक बाधित होऊन सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांहून अधिक नुकसान होऊन द्राक्ष उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाल्याचे वास्तव चित्र बागलाणमध्ये बघायला मिळत आहे. कसमादे पट्ट्यात एेंशीच्या दशकाअखेरीस द्राक्ष पीक आले. प्रयोगशील शेतकरी म्हणून बागलाणच्या शेतकºयाची सर्वदूर ख्याती आहे. या प्रयोगशील शेतकºयामुळे नव्वदच्या दशकात हे पीक अधिक फोफावले. दोन एकर द्राक्ष पिकाचे क्षेत्र असलेल्या शेतकºयाची गणनादेखील ‘बिग बागायतदार’ म्हणून होऊ लागली; मात्र १९९० ते १९९९ या काळात अवकाळी पाऊस, गारपीट, पाणीटंचाई या अस्मानी संकटामुळे बिग बागायतदाराला दृष्ट लागली. सातत्याने येणाºया या संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अक्षरश: देशोधडीला लागला. यामुळे द्राक्ष पिकाचे शेतकºयांनी बागलाणमधून उच्चाटनच केले.दरम्यानच्या काळात सन २००० ते २००२ मध्ये करंजाडी खोºयातील शेतकºयांनी विदेश दौरे करून परदेशातील बाजारपेठेचा अंदाज करून ‘अर्ली द्राक्ष’ पीक घेण्याची संकल्पना पुढे आणली. भरमसाठ पैसा देणारे पीक म्हणून डाळिंब पीक पर्याय म्हणून द्राक्ष पीक पुन्हा फोफावले.करंजाडी खोरे, हत्ती, कान्हेरी, आरम आणि मोसम खोºयासह काटवन, मालेगाव तालुक्यातील माळमाथा, मालेगाव पश्चिम, दक्षिण, देवळा, कळवण पूर्व, उत्तर, दक्षिण मध्ये हे पीक घेतले जात असल्यामुळे आज बागलाण अर्ली द्राक्षाची पंढरी म्हणून नावारूपाला आले आहे; मात्र या द्राक्ष पंढरीला पुन्हा अस्मानीचे ग्रहण लागल्याने शेतकरी पुरता धास्तावला आहे.यंदा ‘मोअर रिस्क, नो मनी, गो मनी’अर्ली द्राक्ष हंगाम जून महिन्यापासून सुरू होतो. जून, जुलै महिन्यात द्राक्षाची गोडी छाटणी करून बहार घेतला जातो. जून ते आॅक्टोबर या पावसाच्या वातावरणावर मात करून कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा अत्यल्प प्रमाणात वापर करून निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. याला रशियन आणि आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे पैसाही चांगला मिळतो. अडचणींचा सामना करून जास्त पैसा देणारे पीक म्हणून अर्ली द्राक्षाकडे बघितले जाते. म्हणूनच इंग्रजीत ‘’मोअर रिस्क, मोअर मनी’’ म्हटले जाते. आदल्या दिवशी दीडशे रु पये किलोने झालेले सौदे दुसºया दिवसी अवकाळी पाऊस आणि ओखीच्या वादळाने होत्याचे नव्हते झाले. द्राक्षाचे घड सडल्याने अक्षरश: मजुरांना खिशातून पैसे देऊन त्याची विल्हेवाट लावावी लागली. त्यामुळे यंदा ‘मोअर रिस्क, नो मनी, गो मनी’ अशीच भयावह परिस्थिती राहिली. या अस्मानी संकटामुळे यंदा द्राक्षाचा ‘बिग बागायतदार‘ कमालीचा धास्तावला असून, आर्थिक फटका बसून कर्जबाजारी झाला आहे.