शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

गतवर्षीच्या संमेलनाचा अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : उस्मानाबाद येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजकांची नाशिकच्या लोकहितवादी मंडळाच्या सदस्यांनी भेट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : उस्मानाबाद येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजकांची नाशिकच्या लोकहितवादी मंडळाच्या सदस्यांनी भेट घेतली. या संमेलनातील अधिक-उणे समजून घेत नाशिकच्या समितीने त्यांचे अनुभवाचे बोल जाणून घेतले.

नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे सदस्य प्रा. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर आणि सुभाष पाटील यांनी उ्स्मानाबाद संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे, कार्यवाह रवि केसकर, कोषाध्यक्ष माधव इंगळे यांनी संमेलनाच्या आयोजनाबाबत अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी अवगत केल्या. संमेलन यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचारधारा ठेवा. सतत नवोपक्रम राबवा, हे संमेलन नाशिककरांना आपले वाटावे यासाठी सर्वांना सहभाग द्या, निधी जमा करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करा, असे यशाचे सूत्र होते, याची माहिती संयोजन समितीने दिली. संमेलनानिमित्त अतिशय सुंदर स्मरणिका प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामागची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिकदृष्टीदेखील संयोजकांनी समजावून सांगितली. संमेलनाचे यश हे एकट्यादुकट्याचे नसते त्यासाठी सतत राबणारे सेवाभावी, कल्पक कार्यकर्त्यांची गरज असते. संमेलनाचे यश टीम वर्कमध्ये असते. टीममध्ये अधिकाधिक राबणारी माणसे प्रसिद्धीपासून दूर असतात. त्यांना संमेलनाच्या संयोजनात महत्त्वाचे स्थान असावे, असेही यावेळी सुचविण्यात आले. तसेच काय करावे, हे सांगतानाच काय करू नये, याबाबतही उस्मानाबादच्या आयोजकांनी मौलीक सल्ले दिले आहेत.