शहरं
Join us  
Trending Stories
1
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
2
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
3
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
4
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
5
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
6
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
7
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
8
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
9
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
10
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
11
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
12
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
13
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
14
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
15
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
16
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
17
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
18
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
19
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
20
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?

शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

By admin | Updated: March 18, 2015 23:38 IST

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात ठेंगा?

नाशिक : राज्याचा अर्थसंकल्प काल (दि. १८) अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. त्यात जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या नुकसानीसाठी काही विशेष अशी तरतूद केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे. अर्थसंकल्पाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ठेंगाच दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केला आहे.मागील आठवड्यात शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी दिवसभर गारपिटीने जिल्ह्यातील द्राक्ष व कांदा पिकांसह रब्बीच्या गहू पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामेही करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलेले असले, तरी शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याची अपेक्षा होती. शेतकऱ्यांनी माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांनाच विद्यमान पालकमंत्री गिरीश महाजन यांना बोलविण्याची मागणी करीत त्यांचे वाहन अडविले होते. जिल्ह्णातील २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक आणि ३५ हजार शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या आर्थिक नुकसानभरपाईसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात काही ठोस तरतूद ठेवण्यात येईल, अशी जिल्ह्णातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अपेक्षा होती. प्रत्यक्षात या शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात ठेंगाच दाखविण्यात आल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)