शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

By admin | Updated: March 18, 2015 23:38 IST

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात ठेंगा?

नाशिक : राज्याचा अर्थसंकल्प काल (दि. १८) अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. त्यात जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या नुकसानीसाठी काही विशेष अशी तरतूद केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे. अर्थसंकल्पाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ठेंगाच दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केला आहे.मागील आठवड्यात शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी दिवसभर गारपिटीने जिल्ह्यातील द्राक्ष व कांदा पिकांसह रब्बीच्या गहू पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामेही करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलेले असले, तरी शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याची अपेक्षा होती. शेतकऱ्यांनी माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांनाच विद्यमान पालकमंत्री गिरीश महाजन यांना बोलविण्याची मागणी करीत त्यांचे वाहन अडविले होते. जिल्ह्णातील २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक आणि ३५ हजार शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या आर्थिक नुकसानभरपाईसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात काही ठोस तरतूद ठेवण्यात येईल, अशी जिल्ह्णातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अपेक्षा होती. प्रत्यक्षात या शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात ठेंगाच दाखविण्यात आल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)