शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

By admin | Updated: March 18, 2015 23:38 IST

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात ठेंगा?

नाशिक : राज्याचा अर्थसंकल्प काल (दि. १८) अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. त्यात जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या नुकसानीसाठी काही विशेष अशी तरतूद केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे. अर्थसंकल्पाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ठेंगाच दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केला आहे.मागील आठवड्यात शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी दिवसभर गारपिटीने जिल्ह्यातील द्राक्ष व कांदा पिकांसह रब्बीच्या गहू पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामेही करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलेले असले, तरी शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याची अपेक्षा होती. शेतकऱ्यांनी माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांनाच विद्यमान पालकमंत्री गिरीश महाजन यांना बोलविण्याची मागणी करीत त्यांचे वाहन अडविले होते. जिल्ह्णातील २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक आणि ३५ हजार शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या आर्थिक नुकसानभरपाईसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात काही ठोस तरतूद ठेवण्यात येईल, अशी जिल्ह्णातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अपेक्षा होती. प्रत्यक्षात या शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात ठेंगाच दाखविण्यात आल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)